व्यंकटेश वैष्णव , बीडबारावीपाठोपाठ दहावीच्या परीक्षेतही बीड जिल्ह्याने आपला दबदबा कायम राखला़ गतवर्षी विभागात अव्वलस्थान पटकावणाऱ्या बीडने यावर्षी ९१ टक्के गुणांसह क्रमांक एकचे स्थान कायम राखले़ त्यामुळे मंगळवारी जाहीर झालेल्या निकालात बीडचेच विद्यार्थी भारी ठरले आहेत़महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने मार्च २०१४ मध्ये परीक्षा पार पडल्या़ बीड जिल्ह्यातील ३५ हजार ५४८ मुलामुलींनी ही परीक्षा दिली होती. त्यापैकी ३२ हजार ६६० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. बीडच्या निकालाचा टक्का ९१़८८ इतका आहे़ ही टक्केवारी विभागात सर्वाधिक आहे. विभागात बीड खालोखाल जालना जिल्ह्याचा निकाल ८८.४५ टक्के, औरंगाबाद ८८.१४ टक्के, हिंगोली ८०.८३ व परभणी ७९़१६ टक्के इतका लागला. विशेष म्हणजे विभागाची एकून टक्केवारी ८७.०६ इतकी असून त्यापेक्षाही बीड चार टक्क्यांनी पुढे आहे़ त्यामुळे जिल्ह्यातीलच विद्यार्थी हुशार असल्याचे सिद्ध झाले़ मुलींनी पटकावले अव्वलस्थानजिल्ह्यातील १९ हजार ३४३ मुले व १३ हजार ३१७ मुली असे एकूण ३२ हजार ६६० विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले़ उत्तीर्ण होण्याची मुलांची टक्केवारी ९०़७१ इतकी आहे तर मुलींची टक्केवारी ९३़६२ टक्के इतकी आहे़ जिल्ह्यातील १४ हजार २२४ मुलींनी तर २१ हजार ३२४ मुलांनी ही परीक्षा दिली़जिल्ह्यात मुलांच्या तुलनेत मुलीच सरस ठरल्या. बीडमध्ये मुलांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९०़७१ तर मुलींची ९३़६२ इतकी आहे़ औरंगाबाद जिल्ह्यातील मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९१.०२ टक्के, परभणीची टक्केवारी ८३.१० , जालन्याची ८८.४५ व हिंगोलीतील मुलींची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ८४.०९ इतकी आहे. मुलींनी वाढविली जिल्ह्याची शानविभागाची टक्केवारीऔरंगाबाद८८.१४बीड९१.८८परभणी७९.१६जालना८८.४५हिंगोली८०.८३एकूण८७.०६तालुका निहायनिकालाची टक्केवारीबीड९४़२९पाटोदा९३.९७आष्टी९४.२७गेवराई९३.७१माजलगाव८३.५३अंबाजोगाई८८.८२केज९३.७०परळी९०.४८धारूर८८.२२शिरूर९३.३३वडवणी९५.७१
पुन्हा बीडच भारी!
By admin | Updated: June 18, 2014 01:41 IST