शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
2
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
3
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
4
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
5
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
6
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
7
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
8
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
9
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
10
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
11
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
12
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
13
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
14
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
15
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल
16
"अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना आणल्यानेच महायुतीला २३८ जागा मिळाल्या’’, सुनिल तटकरेंचा दावा   
17
मुंबईत शिवसेना-मनसेची ताकद जास्त, राज ठाकरेंचा दावा; CM फडणवीस म्हणाले...
18
War 2 Review: ॲक्शनच्या नादात कथेवर फेरलं पाणी, कसा आहे हृतिक रोशन-ज्यु. एनटीआरचा 'वॉर २'?
19
थरकाप उडवणारा व्हिडीओ! मृत्यूने घातली झडप, बापाने लेकीसमोर जागेवरच सोडला जीव; दिल्लीतील घटना
20
अर्जुन तेंडुलकर संदर्भात हवाई सुंदरीला झालेला गैरसमज! क्रिकेटच्या देवानं आधी गंमत केली; मग...

भिजव पांडुरंगा हे तहानलेले रान रे...!

By admin | Updated: June 29, 2014 23:40 IST

रोहिणी व मृग नक्षत्र कोरडे गेले. आर्द्राने आशा दाखविली. प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांनी गुरूवारी आलेल्या एका पावसावर पेरणीला सुरुवात केली अन् पुन्हा वरूण राजा रुसला.

वारकऱ्यांचे माऊलीला साकडे : पावसाची दडी, शेतकऱ्यांनी केली पेरणीला सुरुवातअमरावती : रोहिणी व मृग नक्षत्र कोरडे गेले. आर्द्राने आशा दाखविली. प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांनी गुरूवारी आलेल्या एका पावसावर पेरणीला सुरुवात केली अन् पुन्हा वरूण राजा रुसला. पेरणीचा कालावधी संपत आहे, मागील पाच वर्षांत पहिल्यांदा पाऊस कमी पडला. वास्तविक पेरण्या आटोपून शेतकरी, वारकरी हे विठूरायाच्या दर्शनासाठी पायी वारी करतात. पांडुरंगाला समृद्धीचे साकडे घालतात अन् वारी करून आल्यावर पीक हे चांगलंच वर आलेलं असतं. तेव्हा डवरणी, निंदण आदी सोपस्कार आटोपतात. परंतु यंदा मात्र याउलट झाले. वारकरी यंदा माऊलीकडे पेरणीयोग्य पाऊस पडावा म्हणून साकडे घालण्यासाठी निघाले आहे.नको पांडुरंगा मला सोन्या-चांदीचे दान रे।भिजव पांडुरंगा तहानलेले रान रे।।या काव्यात टाळ-मृदंगाच्या साथीने माऊलीच्या नामघोषात तल्लीन होऊन पांडुरंगाच्या दर्शनासाठी हजारो मैलाची पायपीट करीत शेतकरी, वारकरी पंढरीच्या वाटेने आहेत. माऊलीची दर्शनाची आस असलेला प्रत्येक शेतकरी पावसासाठी आर्जव करू लागला आहे. २० ते २५ जूनदरम्यान खरिपाची पेरणी व्हायला पाहिजे, त्याची आता जेमतेम सुरुवात झाली आहे. शेतकरी पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहत आहे.अमरावती जिल्ह्यात खरीप २०१४ हंगामासाठी ७०,२०,२०० हेक्टर क्षेत्र प्रस्तावित आहे. यापैकी ३,७३,००० हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी होणार आहे. कपाशीसाठी १,५९,००० हेक्टर क्षेत्र प्रस्तावित आहे. जिल्ह्याच्या एकूण सरासरी क्षेत्राच्या ७५ टक्के क्षेत्रावर कपाशी व सोयाबीनची पेरणी होणार आहे. तसे पाहता विदर्भातील खरिपाची पेरणी २० ते २५ जून दरम्यान दरवर्षी संपुष्टात येते अन् शेतकरी पांडुरंगाच्या दर्शनाला जातो. यंदा मात्र चित्र उलट आहे. जिल्ह्यात केवळ ४० मि.मी. सरासरी पाऊस पडला आहे. किमान ६५ मि.मी. पाऊस पडल्याशिवाय पेरणी करू नये, असा कृषी विभागाचा सल्ला आहे.