शहरं
Join us  
Trending Stories
1
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
2
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
3
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
4
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
5
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
6
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
7
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
8
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
9
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
10
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
11
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
12
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
13
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
14
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
15
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
16
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
17
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
18
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
19
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
20
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?

साखरेपेक्षा गुळाला ‘भाव’

By admin | Updated: April 24, 2016 00:14 IST

औरंगाबाद : ऊस व पाण्याच्या कमतरतेमुळे गुऱ्हाळाची संख्या घटली असून, परिणामी गुळाचे भाव कडाडले आहेत.

औरंगाबाद : ऊस व पाण्याच्या कमतरतेमुळे गुऱ्हाळाची संख्या घटली असून, परिणामी गुळाचे भाव कडाडले आहेत. मागील १० वर्षांनंतर पहिल्यांदाच लातूर येथील गावरान गुळाच्या भावाने क्विंटलमागे ४००० रुपयांची सीमा गाठली आहे. किरकोळ ते मध्य ४२ रुपये किलोने गूळ विकल्या जात आहे. अशीच परिस्थिती राहिली तर आणखी भाववाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. गूळ आरोग्यास लाभदायक असल्याने साखरेपेक्षा गूळ ‘भाव’ खाऊ लागला आहे. उसापासून साखरही तयार होते व गूळही तयार होतो. गूळ आरोग्यास लाभकारक असतो. म्हणूनच तर पूर्वी उन्हातून घरी आलेल्या पाहुण्यांना गूळ व पाणी देत असत. आताही अनेक परिवारांनी जुन्या पद्धतीनुसार पाहुण्यांना खास गूळ व पाणी देणे सुरू केले आहे. अनेक डॉक्टर रुग्णांना गूळ खाण्याचा सल्ला देत असतात. यामुळे मागील चार ते पाच वर्षांत गुळाला मागणी वाढली आहे. औरंगाबादेत कराड, सांगली, पुणे या भागातून गूळ येत असतो. मात्र, लातूरच्या गावरान गुळाला औरंगाबादकर जास्त पसंत करतात. गूळ तयार करण्यासाठी जसा ऊस लागतो तसेच पाणीही मोठ्या प्रमाणात लागते. यंदा लातूर जिल्ह्यात भयंकर दुष्काळ पडला आहे. यामुळे उसाचे क्षेत्रही घटले आहे. ऊस कमी व पाणीही कमी, त्यामुळे यंदा फक्त ३० टक्केच गुऱ्हाळ सुरू झाले आहेत. यात हे गुऱ्हाळही बंद होण्याच्या मार्गावर आहे. परिणामी गुळाचे उत्पादन घटल्याने मागील साडेतीन महिन्यांत गुळाचे भाव क्विंटलमागे एकदम ९०० ते १००० रुपयांनी वाढले. सध्या ३७०० ते ४००० रु. क्विंटलपर्यंत गूळ विकला जात आहे. लातूर बाजारपेठेतून मागील आठवडाभरात ५० टन गुळाची आवक झाली. यासंदर्भात गुळाचे व्यापारी सुमतीशेठ ब्रह्मेचा यांनी सांगितले की, दरवर्षी दसऱ्यानंतर सांगली, कराड, कोल्हापूर तसेच उत्तर प्रदेशातील हापूड येथून गुळाची आवक होते. तर लातूरच्या गुळाचा हंगाम डिसेंबरपासून सुरूहोतो.