शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळच्या माजी पंतप्रधानांना पत्नीसह बेदम मारले; जमावाच्या तावडीतून सैन्यानं कसं वाचवले?
2
फेसबुक, इन्स्टाग्राम की ट्विटर सर्वाधिक कमाई नेमकी कुठून होते? जाणून घ्या सविस्तर
3
चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...
4
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, देशभरातून ९ संशयित ISIS दहशतवादी ताब्यात!
5
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
6
दुधाचे भाव कमी होणार! अमूल-मदर डेअरीचे दूध किती रुपयांनी स्वस्त होणार? कंपनीकडून निर्णयाचं स्वागत
7
राहा फिट! वेट लॉससाठी व्हायरल होतंय ६-६-६ वॉकिंग चॅलेंज; बारीक होण्याचा सुपरहिट फॉर्म्युला?
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
9
भुजबळ म्हणाले, "हैदराबाद गॅझेटचा जीआर रद्द करा", विखे पाटलांनी दिलं उत्तर, म्हणाले "रद्द करण्याची गरज नाही"
10
वीज बिलाची चिंता सोडा, पिकांना भरपूर पाणी द्या; उपसा योजनांच्या वीज सवलतीस २ वर्षे मुदतवाढ
11
बाप बडा न भैया, सबसे बडा रुपैया! जमिनीच्या वाटणीसाठी मृतदेह २ दिवस ठेवला घरात
12
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न
13
समृद्धी महामार्गावर खिळे ठोकून दुरुस्ती की घातपाताचा प्रयत्न? अनेक वाहने पंक्चर, प्रवासी संतप्त
14
पितृपक्ष 2025: श्राद्धाचा नैवेद्य ठेवताना डावीकडून उजवीकडे पाणी फिरवतात; का ते माहितीय का?
15
नवी मुंबईतील 'त्या' बांधकामांना 'ओसी' देऊ नये; विधान परिषद सभापतींचे आदेश
16
Panvel: जेवताना चिकन कमी वाढले, पत्नीला जाळून मारले; फरार आरोपीला हैदराबादमध्ये अटक
17
नोकरी गेल्यानंतर पीएफमधील पैशांवर व्याज मिळते? काय आहे ईपीएफओचे नियम?
18
भारताच्या वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने दिली 'गुड न्यूज'; पत्नीच्या मॅटर्निटी फोटोशूटची चर्चा
19
फेसबुकचे मालक मार्क झुकरबर्ग यांची जबरदस्त ऑफर! फक्त हे काम करून दर तासाला ५ हजार रुपये मिळवा
20
तमाशातील नर्तकीवर प्रेम, पण ती टाळायला लागल्याने माजी उपसरपंच झाला वेडापिसा, त्यानंतर तिच्या घरासमोरच उचललं टोकाचं पाऊल

श्रद्धा डोळस असावी - मानव

By admin | Updated: January 5, 2015 00:36 IST

जालना : समाजात श्रद्धेचे रूपांतर अंधश्रद्धेमध्ये होत असल्याने अनेकजण या बुवांच्या थापांना व खोट्या चमत्कारांना बळी पडतात. श्रद्धा डोळस असावी,

जालना : समाजात श्रद्धेचे रूपांतर अंधश्रद्धेमध्ये होत असल्याने अनेकजण या बुवांच्या थापांना व खोट्या चमत्कारांना बळी पडतात. श्रद्धा डोळस असावी, असे सांगून सर्वसामान्यांच्या जीवनातून अंधश्रद्धा नष्ट करण्यासाठी जादूटोणा विरोधी कायद्याची ग्रामीण पातळीपर्यंत प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन पीआयएमसीचे सह अध्यक्ष तथा अंनिसचे संस्थापक संघटक प्रा. श्याम मानव यांनी येथे व्यक्त केले. येथील फुलंब्रीकर नाट्यगृहात समाजकल्याण कार्यालयाच्या वतीने रविवारी आयोजित जाहीर व्याख्यानात ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक, सुरेश झुरमुरे, समाजकल्याण विभागाचे सहाय्यक उपायुक्त बी.एन. वीर, तहसीलदार रेवननाथ लबडे, मधुकर कांबळे, सुनील वाघ, प्रवीण गांगूर्डे, मिलिंद सावंत, प्रा. रेणुका भावसार, दिलीप सोळुंके, पुष्कराज तायडे आदींची यावेळी उपस्थिती होती.जादूटोणा विरोधी कायदा जनजागृती प्रचार आणि प्रसार करण्यासाठी शासनाने निधी उपलब्ध करून दिला आहे. या कायद्याचा प्रसार सामाजिक न्याय व विशेष साह्य विभागाच्या वतीने करण्यात येत असून राज्यातील सहा विभागामध्ये वक्ता प्रशिक्षणाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. लवकरच दक्षता अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. नागरिकांनीही या प्रसार आणि प्रचार कार्यक्रमास सहभाग नोंदविल्यानंतर हा कायदा सर्वसामान्यांपर्यंत पोहचण्यास मदत होईल, असेही मानव यांनी सांगितले.जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत अनिष्ठ व अघोरी प्रथा व जादूटोणाची कामे करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीस व त्यास मदत करणाऱ्या व्यक्तींवर कार्यवाही होऊ शकते. त्याचबरोबर दोष सिद्ध झालेल्या व्यक्तीस सहा महिने ते सात वर्षे कारावास व पाच हजार रूपये ते पन्नास हजार रूपयांपर्यंत दंडाची शिक्षा होऊ शकते. शिक्षापात्र अपराध हे दखलपात्र व अजामिनपात्र गुन्हा असेल असेही प्रा. मानव यांनी सांगितले. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी नायक म्हणाले की, समाजामध्ये आपण जगत असताना अंधश्रद्धेसारख्या कुठल्याही गोष्टीवर विश्वास न ठेवता प्रत्येक बाबींची तपासणी करून पहावी. जादूटोणा विरोधी कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनामार्फत योग्य ती कार्यवाही केली जाईल. तसेच सर्वसामान्य जनतेनी अंधश्रद्धेला खतपाणी न घालता डोळसपणे जगण्याबरोबरच या अंधश्रद्धेपासून स्वत:ला, स्वत:च्या कुटुंबियाला तसेच आपल्या जवळच्या व्यक्तींना दूर ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. (प्रतिनिधी)मानव म्हणाले की, या आधुनिक युगात मानवाने गत १००-१५० वर्षात खूप प्रगती केली आहे. जगात विज्ञानाचा आधार न घेता कोणालाच चमत्कार करता येत नाही. जे चमत्कार सर्वसामान्यांना दाखविले जातात ते फक्त वेगवेगळ्या क्लृप्त्या किंवा वैज्ञानिक प्रयोगांचा आधार घेऊन दाखविले जातात. जीवनामध्ये जगताना विश्वास गरजेचा आहे.४परंतु त्याबाबतचा पुरावा समोर आल्यानंतर त्याची सत्यता पडताळून पाहणेही तितकेच गरजेचे आहे. समाजात वावरणाऱ्या अशा या भोंदूंपासून स्वत:बरोबरच आपल्या कुटुंबिय व शेजाऱ्यांना दूर ठेवण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.