शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
3
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
6
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
7
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
8
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
9
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
10
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
11
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
12
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
13
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
14
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
15
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल
16
एकनाथ शिंदेंनी ढासळवला जितेंद्र आव्हाडांचा बुरुज; शरद पवार गटाचे ४ माजी नगरसेवक शिवसेनेत
17
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
18
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
19
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
20
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा

वाहतूक नियमांची ऐशीतैशी

By admin | Updated: May 30, 2016 01:14 IST

औरंगाबाद : मोटार वाहन कायद्यातील विविध नियमांचे पालन करणे सर्व वाहनचालकांना बंधनकारक आहे. असे असताना जानेवारीपासून कालपर्यंत शहरातील

औरंगाबाद : मोटार वाहन कायद्यातील विविध नियमांचे पालन करणे सर्व वाहनचालकांना बंधनकारक आहे. असे असताना जानेवारीपासून कालपर्यंत शहरातील तब्बल ९० हजार नागरिकांनी वाहतूक नियम तोडल्याचे समोर आले आहे. नियमभंग करणाऱ्या या वाहनचालकांकडून १ कोटी १५ लाखांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती वाहतूक शाखेकडून मिळाली.शहरात सुमारे ८ लाख दुचाकी, २५ हजार आॅटोरिक्षांसह १२ लाख वाहने आहेत. यासोबतच बाहेरगावाहून ये-जा करणाऱ्या वाहनांची संख्या वेगळी आहे. शहरातील वाहतुकीचे नियमन करण्यासाठी शहर, सिडको आणि छावणी, असे तीन विभाग आहेत. सहायक पोलीस आयुक्त, तीन पोलीस निरीक्षक आणि फौजदारांसह सुमारे २६५ कर्मचारी वाहतूक शाखेत कार्यरत आहेत. जानेवारीपासून शहरात हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी सुरू झाली. विविध चौकांत बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे वाहतूक नियमभंग करणाऱ्यांविरोधात कारवाई केली जात आहे. आजही शहरातील २० टक्के नागरिक विनाहेल्मेट दुचाकी चालवितात. शिवाय ट्रीपल सीट दुचाकी चालविणे, वाहतूक सिग्नल तोडून पळणे, नो एंट्रीतून वाहने नेणे, वाहन चालविताना सोबत लायसन्स आणि वाहनाची कागदपत्रे जवळ न बाळगणे, क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसवून रिक्षा चालविणे, वाहतुकीला अडथळा होईल अशा प्रकारे रस्त्यावर वाहन उभे करून वाहतूक नियमांचा भंग केला जातो. वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्या वाहनचालकांविरोधात शहर वाहतूक शाखेचे अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून नियमित कारवाई केली जाते. जानेवारीपासून तर हेल्मेट सक्तीबाबत सतत मोहीम राबविण्यात येते. या मोहिमेत वाहतूक शाखेसोबत विविध ठाण्यांतील पोलिसांना रस्त्यावर उतरविण्यात येते. जानेवारीपासून आतापर्यंत ९० हजार नागरिकांनी वाहतूक नियम तोडल्याचे समोर आले. त्यांच्या विरोधात दंडात्मक कारवाई करून १ कोटी १५ लाख ३ हजार ३०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांचे वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी, यास प्राधान्य आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहनचालकांकडून दंड वसूल करण्याची ही पहिलीच वेळ आहे, अशी माहिती सहायक पोलीस आयुक्त सी. डी. शेवगण यांनी दिली. हेल्मेटसक्ती लागू झाल्यापासून कालपर्यंत ७९ हजार ११७ नागरिकांवर विनाहेल्मेट दुचाकी चालविल्याप्रकरणी केसेस करण्यात आल्या. त्यांच्याकडून ८४ लाख ८६ हजार ९०० रुपये दंड वसूल करण्यात आला.