शहरं
Join us  
Trending Stories
1
"...मग बाकीच्या मराठ्यांचं काय? त्यांचा विचार कोण करणार?", विनोद पाटलांनी दाखवले आकडे
2
"राजवटींचा काळ संपला; तुम्ही भारत, चीनसोबत असं बोलू शकत नाही"; पुतीन यांनी ट्रम्प यांना सुनावलं
3
"...यापुढे दक्षिण मुंबईत आंदोलनावर निर्बंध आणावेत"; शिंदेसेनेच्या खासदाराचं CM देवेंद्र फडणवीसांना पत्र
4
Shikhar Dhawan Summoned By ED : शिखर धवन ईडीच्या रडारवर; Betting App प्रकरणात होणार कसून चौकशी
5
'बेकायदेशीरपणे झाडे तोडल्यामुळे आपत्ती आली', पूर आणि भूस्खलनावर सर्वोच्च न्यायालयाची कडक टिप्पणी
6
४२ दिवसांत तब्बल १२ वेळा मुलीला चावला साप; पण नेमकं कारण तरी काय? डॉक्टर म्हणाले...
7
Palmistry: नशिबात राजयोग आहे की नाही, हे तळहाताच्या 'या' चिन्हावरुन ओळखू शकता!
8
राहुल गांधी यांच्या हायड्रोजन बॉम्बमध्ये नेमकं आहे काय? तो फुटणार कुठे, समोर येतेय अशी माहिती  
9
GST Rate Change: Activa, स्प्लेंडर, पल्सर.., GST बदलल्यानं कोणती बाईक-स्कुटी होणार स्वस्त, कोणती महागणार? जाणून घ्या
10
काँग्रेसने सर्वात आधी GST सुधारणांची मागणी केली; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
11
रात्रभर अभ्यास केला, सकाळी मृतावस्थेत आढळला; IIT च्या विद्यार्थ्याचा परिक्षेच्या आदल्या दिवशी मृत्यू
12
GST मधील कपातीमुळे शैक्षणिक फीसुद्धा कमी होणार?; शालेय साहित्य स्वस्त दरात मिळणार
13
'WhatsApp' वर मोठा धोका! केंद्र सरकारने दिला इशारा, अपडेट करण्याचा दिला सल्ला
14
GST Rate Cut: कार आणि बाईक झाल्या स्वस्त; पण Anand Mahindra यांनी केली आणखी एक मागणी...
15
मृत्यू पंचक २०२५: अनंत चतुर्दशी, चंद्रग्रहणात अशुभाची छाया; चुकूनही ‘ही’ कामे करू नका!
16
Anant Chaturdashi 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी अनंत चतुर्दशीपासून २१ दिवस म्हणा 'हे' पॉवरफुल स्तोत्र!
17
Duleep Trophy 2025 Semi Final : यशस्वीचा अयशस्वी डाव; ऋतुराजच्या भात्यातून दिलासा देणारी 'फिफ्टी'
18
Video: पैज लागली, 500 रुपयांसाठी तरुणाची यमुनेच्या पुरात उडी; नंतर बघा काय घडलं?
19
मराठवाड्यातील ८५५० पैकी १५१६ गावांतच सापडल्या ‘कुणबी’च्या नोंदी
20
Pitru Paksha 2025: यंदा पितृपक्षाची सुरुवात आणि शेवट ग्रहणाने; श्राद्धविधिवर होणार परिणाम?

वाहतूक नियमांची ऐशीतैशी

By admin | Updated: May 30, 2016 01:14 IST

औरंगाबाद : मोटार वाहन कायद्यातील विविध नियमांचे पालन करणे सर्व वाहनचालकांना बंधनकारक आहे. असे असताना जानेवारीपासून कालपर्यंत शहरातील

औरंगाबाद : मोटार वाहन कायद्यातील विविध नियमांचे पालन करणे सर्व वाहनचालकांना बंधनकारक आहे. असे असताना जानेवारीपासून कालपर्यंत शहरातील तब्बल ९० हजार नागरिकांनी वाहतूक नियम तोडल्याचे समोर आले आहे. नियमभंग करणाऱ्या या वाहनचालकांकडून १ कोटी १५ लाखांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती वाहतूक शाखेकडून मिळाली.शहरात सुमारे ८ लाख दुचाकी, २५ हजार आॅटोरिक्षांसह १२ लाख वाहने आहेत. यासोबतच बाहेरगावाहून ये-जा करणाऱ्या वाहनांची संख्या वेगळी आहे. शहरातील वाहतुकीचे नियमन करण्यासाठी शहर, सिडको आणि छावणी, असे तीन विभाग आहेत. सहायक पोलीस आयुक्त, तीन पोलीस निरीक्षक आणि फौजदारांसह सुमारे २६५ कर्मचारी वाहतूक शाखेत कार्यरत आहेत. जानेवारीपासून शहरात हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी सुरू झाली. विविध चौकांत बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे वाहतूक नियमभंग करणाऱ्यांविरोधात कारवाई केली जात आहे. आजही शहरातील २० टक्के नागरिक विनाहेल्मेट दुचाकी चालवितात. शिवाय ट्रीपल सीट दुचाकी चालविणे, वाहतूक सिग्नल तोडून पळणे, नो एंट्रीतून वाहने नेणे, वाहन चालविताना सोबत लायसन्स आणि वाहनाची कागदपत्रे जवळ न बाळगणे, क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसवून रिक्षा चालविणे, वाहतुकीला अडथळा होईल अशा प्रकारे रस्त्यावर वाहन उभे करून वाहतूक नियमांचा भंग केला जातो. वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्या वाहनचालकांविरोधात शहर वाहतूक शाखेचे अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून नियमित कारवाई केली जाते. जानेवारीपासून तर हेल्मेट सक्तीबाबत सतत मोहीम राबविण्यात येते. या मोहिमेत वाहतूक शाखेसोबत विविध ठाण्यांतील पोलिसांना रस्त्यावर उतरविण्यात येते. जानेवारीपासून आतापर्यंत ९० हजार नागरिकांनी वाहतूक नियम तोडल्याचे समोर आले. त्यांच्या विरोधात दंडात्मक कारवाई करून १ कोटी १५ लाख ३ हजार ३०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांचे वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी, यास प्राधान्य आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहनचालकांकडून दंड वसूल करण्याची ही पहिलीच वेळ आहे, अशी माहिती सहायक पोलीस आयुक्त सी. डी. शेवगण यांनी दिली. हेल्मेटसक्ती लागू झाल्यापासून कालपर्यंत ७९ हजार ११७ नागरिकांवर विनाहेल्मेट दुचाकी चालविल्याप्रकरणी केसेस करण्यात आल्या. त्यांच्याकडून ८४ लाख ८६ हजार ९०० रुपये दंड वसूल करण्यात आला.