शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूक नियमांची ऐशीतैशी

By admin | Updated: May 30, 2016 01:14 IST

औरंगाबाद : मोटार वाहन कायद्यातील विविध नियमांचे पालन करणे सर्व वाहनचालकांना बंधनकारक आहे. असे असताना जानेवारीपासून कालपर्यंत शहरातील

औरंगाबाद : मोटार वाहन कायद्यातील विविध नियमांचे पालन करणे सर्व वाहनचालकांना बंधनकारक आहे. असे असताना जानेवारीपासून कालपर्यंत शहरातील तब्बल ९० हजार नागरिकांनी वाहतूक नियम तोडल्याचे समोर आले आहे. नियमभंग करणाऱ्या या वाहनचालकांकडून १ कोटी १५ लाखांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती वाहतूक शाखेकडून मिळाली.शहरात सुमारे ८ लाख दुचाकी, २५ हजार आॅटोरिक्षांसह १२ लाख वाहने आहेत. यासोबतच बाहेरगावाहून ये-जा करणाऱ्या वाहनांची संख्या वेगळी आहे. शहरातील वाहतुकीचे नियमन करण्यासाठी शहर, सिडको आणि छावणी, असे तीन विभाग आहेत. सहायक पोलीस आयुक्त, तीन पोलीस निरीक्षक आणि फौजदारांसह सुमारे २६५ कर्मचारी वाहतूक शाखेत कार्यरत आहेत. जानेवारीपासून शहरात हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी सुरू झाली. विविध चौकांत बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे वाहतूक नियमभंग करणाऱ्यांविरोधात कारवाई केली जात आहे. आजही शहरातील २० टक्के नागरिक विनाहेल्मेट दुचाकी चालवितात. शिवाय ट्रीपल सीट दुचाकी चालविणे, वाहतूक सिग्नल तोडून पळणे, नो एंट्रीतून वाहने नेणे, वाहन चालविताना सोबत लायसन्स आणि वाहनाची कागदपत्रे जवळ न बाळगणे, क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसवून रिक्षा चालविणे, वाहतुकीला अडथळा होईल अशा प्रकारे रस्त्यावर वाहन उभे करून वाहतूक नियमांचा भंग केला जातो. वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्या वाहनचालकांविरोधात शहर वाहतूक शाखेचे अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून नियमित कारवाई केली जाते. जानेवारीपासून तर हेल्मेट सक्तीबाबत सतत मोहीम राबविण्यात येते. या मोहिमेत वाहतूक शाखेसोबत विविध ठाण्यांतील पोलिसांना रस्त्यावर उतरविण्यात येते. जानेवारीपासून आतापर्यंत ९० हजार नागरिकांनी वाहतूक नियम तोडल्याचे समोर आले. त्यांच्या विरोधात दंडात्मक कारवाई करून १ कोटी १५ लाख ३ हजार ३०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांचे वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी, यास प्राधान्य आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहनचालकांकडून दंड वसूल करण्याची ही पहिलीच वेळ आहे, अशी माहिती सहायक पोलीस आयुक्त सी. डी. शेवगण यांनी दिली. हेल्मेटसक्ती लागू झाल्यापासून कालपर्यंत ७९ हजार ११७ नागरिकांवर विनाहेल्मेट दुचाकी चालविल्याप्रकरणी केसेस करण्यात आल्या. त्यांच्याकडून ८४ लाख ८६ हजार ९०० रुपये दंड वसूल करण्यात आला.