शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
3
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
4
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
5
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
6
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
7
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
8
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
9
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
10
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
11
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
12
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
13
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
14
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
15
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
16
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
17
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
18
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
19
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
20
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली

आष्टी, गेवराई रात्रीपासून अंधारात

By admin | Updated: June 6, 2014 01:03 IST

आष्टी/कडा/ गेवराई: बुधवारी सायंकाळी आष्टी तालुक्यासह गेवराई शहराला वादळी वार्‍याने झोडपले. यामुळे अनेक ठिकाणचे विद्युत खांब पडले.

आष्टी/कडा/ गेवराई: बुधवारी सायंकाळी आष्टी तालुक्यासह गेवराई शहराला वादळी वार्‍याने झोडपले. यामुळे अनेक ठिकाणचे विद्युत खांब पडले. तर झाडेही उन्मळून पडली. खांब पडल्याने अनेक ठिकाणचा विद्युत पुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे नागरिकांना रात्र अंधारातच काढावी लागली.आष्टी तालुक्यात बुधवारी सायंकाळी ४ च्या सुमारास वादळी वार्‍यासह पाऊस झाला. वार्‍यामुळे अनेक ठिकाणचे विद्युत खांब पडले. तालुक्यात तब्बल पन्नास ते साठ खांब पडल्याने तालुक्यातील विद्युत पुरवठा खंडीत झाला होता. यामुळे बुधवारी रात्री आष्टी शहरासह तालुक्यातील १७७ गावे व ८०० वाड्यांवरील ग्रामस्थांना रात्र अंधारात काढावी लागली, आष्टी, कड्यासह बीडसांगवी, कारखेल, गौखेल, गंगादेवी, शेडाळा, सावरगाव, घाटापिंप्री, धामणगाव, देवळाली या परिसरातही विद्युत खांब पडले असून अनेक ठिकाणी तारा एकमेकांना चिकटलेल्या आहेत. यामुळे स्पार्र्कींग होऊन विद्युत पुरवठा खंडीत झालेला आहे. बुधवारी सायंकाळपासून बंद असलेला विद्युत पुरवठा गुरुरवारी सायंकाळी ४ पर्यंतही सुरू करण्यात आला नव्हता.गांभिर्याची बाब म्हणजे तालुक्यातील एकाही गावात विद्युत पुरवठा दुरूस्त करण्यासाठी किंवा नेमका बिघाड कोठे झाला याची माहिती घेण्यासाठी महावितरणचा एकही अधिकारी फिरकला नसल्याचे महावितरणचे म्हणणे आहे. यामुळे विद्युत पुरवठा सुरळीत होत नसल्याने ग्रामस्थांना दिवसभर अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. तालुक्यात ज्यावेळी विद्युत बिघाड होतो. त्यावेळी संबंधित अधिकारी बिघाड वेळेवर दुरूस्त करीत नसल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब जगताप यांनी केला आहे. विद्युत पुरवठा बंद असल्याने नागरिकांना पिण्याचे पाणीही मिळणे दुरापास्त झाले होते. यामुळे बंद असलेला विद्युत पुरवठा तात्काळ सुरू करण्याची मागणी सचिन वाघुले, संजय खंडागळे, शिवा शेकडे यांनी केली आहे. या संदर्भात कनिष्ठ अभियंता रणधीर खंडागळे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून वारंवार संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही. बुधवारी सायंकाळी वादळी वार्‍यासह पावसाने गेवराई शहरालाही झोडपले. शहरातील अनेक भागातील ताराही तुटल्या होत्या. वार्‍यामुळे अनेकांच्या घरावरील पत्रेही उडाले तर काही ठिकाणी रस्त्यावर वृक्ष उन्मळून पडले. यामुळे गेवराई शहरात रात्रभर विद्युत पुरवठा बंद होता. त्यामुळे नागरिकांना रात्र उकाड्यात काढावी लागली. शहरातील बंद असलेला विद्युत पुरवठा गुरुवारी सकाळी सुरू करण्यात आला. या नैसर्र्गिक आपत्तीने सामान्यांसह महावितरणचे मोठे नुकसान झाले आहे. कोलमडलेले विद्युत खांब लवकरच दुरूस्त करण्यात येणार असल्याचे सहायक अभियंता एस.आर. सारडा यांनी सांगितले. (वार्ताहर)