शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
2
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
6
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
7
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
8
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
9
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
10
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
11
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
12
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
13
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
14
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
15
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
16
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
17
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
18
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
19
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
20
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!

ग्रामीण भागातील कलावंतांना राजाश्रय मिळावा

By admin | Updated: August 6, 2015 00:02 IST

जालना : ग्रामीण भाग हा कलावंतांची खाण आहे. मात्र, त्यांना राजाश्रय मिळत नसल्याने अनेक कलावंत प्रकाशझोतात येऊ शकले नाहीत. त्यांना न्याय मिळत नाही.

जालना : ग्रामीण भाग हा कलावंतांची खाण आहे. मात्र, त्यांना राजाश्रय मिळत नसल्याने अनेक कलावंत प्रकाशझोतात येऊ शकले नाहीत. त्यांना न्याय मिळत नाही. म्हणूनच अशा कलावतांना राजाश्रय मिळावा अशी अपेक्षा अभिनेता कैलास वाघमारे याने बुधवारी येथे व्यक्त केली. देशभरात माझा अनेक ठिकाणी सत्कार झाला. मात्र, आज घरच्या माणसाकडून झालेला सत्कार माझ्यासाठी विशेष महत्त्वाचा आहे, असे भावनिक उद्गार कैलासने याप्रसंगी काढले.आ. अर्जुन खोतकर यांनी बुधवारी जालना शहरातील एका चित्रपटगृहात ह्यमनातल्या उन्हातह्ण या चित्रपटाच्या विशेष खेळाचे आयोजन केले होते. या चित्रपटात अभिनेता कैलास वाघमारे, ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’ या नाटकाचे लेखक राजकुमार तांगडे, संभाजी तांगडे आदी उपस्थित होते. अस्सल ग्रामीण बाज असलेल्या या चित्रपटाला राज्यभरात प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे कैलासने सांगितले. यावेळी कैलासची आई, भाऊ यांचा सत्कार करण्यात आला. भोकरदन तालुक्यातील चांदई ठोंबरेसारख्या छोट्याशा गावातून आलेल्या कैलासचा अभिनय क्षेत्रातील आतापर्यंतच प्रवास थक्क करणारा असल्याचे सांगून आपल्या जिल्ह्यातील कलावतांच्या चित्रपटाला अमेरिकेतील ग्लोब फेस्टमध्ये नामांकन मिळते, ही बाब गौरवास्पद असल्याचे आ. खोतकर म्हणाले. यावेळी अनिरुद्ध खोतकर, पंडित भुतेकर, शिवसेना शहरप्रमुख विष्णू पाचफुले, अनुराग कपूर, शिवसेनेच्या महिला आघाडी जिल्हा संघटक सविता किवंडे, गंगूबाई वानखेडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)