शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
4
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
5
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
6
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
7
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
8
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
9
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
10
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
11
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
12
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
13
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
14
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
15
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
16
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
17
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
18
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
19
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
20
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना

कृत्रिम पावसाचे हवेतच बार; अहवालातही पाऊस शुन्यच

By admin | Updated: August 27, 2015 00:23 IST

! लातूर : मराठवाड्यासह लातुरात कृत्रिम पावसाचा गाजावाजा झाला होता़ अखेर हा प्रयोग लातूर जिल्ह्यात राबविण्यात आला असून,

!लातूर : मराठवाड्यासह लातुरात कृत्रिम पावसाचा गाजावाजा झाला होता़ अखेर हा प्रयोग लातूर जिल्ह्यात राबविण्यात आला असून, १२ फ्लेअर्सचा मारा करुनही पावसाचा एक थेंबही पडला नसल्यामुळे भ्रमनिरास झाला आहे़ ४, ६ आणि ७ आॅगस्ट या तीन दिवसांत लातूर, औसा, रेणापूर तालुक्यातील काही गावांचा परिसर असलेल्या भागात फ्लेअर्सचा मारा केला़ परंतू पाऊस पडला नाही़ प्रयोगानंतर किमान एका घंट्यात पाऊस पडतो़ परंतू लातुरात हा अनुभव आला नाही़लातूर जिल्ह्यात गेल्या तीन-चार वर्षांपासून पर्जन्यमान कमी झाले आहे़ यंदाचा तर खरीप हंगाम उद्ध्वस्त झाला आहे़ त्यामुळे मराठवाड्यात कृत्रिम पावसाचा प्रयोग शासनाने हाती घेतला आहे़ या प्रयोगाचा मोठा गाजावाजाही करण्यात आला़ दस्तुरखुद्द महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी फ्लेअर्सचा मारा करणाऱ्या विमानात बसून मराठवाड्याचा फेरफटका मारला होता़ लातूर तालुक्यातील मुरुड, जायफळ, बोरगाव या परिसरात ४ आॅगस्ट रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास १८़४०२४ अक्षांश व ७६़२४१३ च्या रेखांशावर विमानाद्वारे फ्लेअर्स फायर्ड करण्यात आले़ दोन वेळा फ्लेअर्सचा मारा करण्यात आला़ परंतु, ढगाचा छेद या फ्लेअर्सला झाला नाही़ तज्ञांच्या मते फ्लेअर्स झाल्यानंतर किमान एका तासात पाऊस पडतो़ परंतू मुरुड, जायफळ, बोरगाव परिसरात या फ्लेअर्सद्वारे पावसाचा थेंबही पडला नाही़ त्यानंतर ६ आॅगस्ट रोजी सकाळी ११़४३ वाजण्याच्या सुमारास रेणापूर तालुक्यातील म्हणजे १८़५४४२ अक्षांश व ७६़४१९४ रेखांशावरील गांजूर, रुई, रामेश्वर, सारसा परिसरात दोन फ्लेअर्सचा मारा करण्यात आला़ ६ आॅगस्ट रोजी सकाळी १२ वाजण्याच्या सुमारास औसा तालुक्यातील रिंगणी, शिवली, बिरवली, मासुर्डी परिसरात म्हणजे १८़२०५८ अक्षांश व ७६़३४८२ च्या रेखांशावर दोन फ्लेअर्सचा मारा करण्यात आला़ हा प्रयोगही फसला़ रिंगणी, शिवली, बिरवली, मासुर्डी परिसरातही पाऊस झाला नाही़ परत याच परिसरात परंतु, १८़१८७८ अक्षांश व ७६़३६६५ रेखांशावर पुन्हा दोन फ्लेअर्स उडविण्यात आले़ परंतू यावेळेही शुन्य मि.मी. पाऊस झाला़ परत तिसरा प्रयोग १२़११ मिनिटांनी १८़२०१७ अक्षांश व ७६़४१३२ रेखांशवर म्हणजे सिंधाळा, बेलकुंड, एकंबी परिसरात झाला़ ६ आॅगस्ट रोजी एकाच दिवशी ८ फ्लेअर्सद्वारे मारा करण्यात आला़ परंतू यश आले नाही़ शेवटचा प्रयोग ७ आॅगस्ट रोजी राबविण्यात आला़ १८़२२१७ अक्षांश व ७६़३००८ रेखांशवर दोन फ्लेअर्सचा मारा करण्यात आला़ शिवली, वडजी, बिरवली परिसरात हा मारा झाला़ प्रशासनाचा हाही प्रयत्न फसल्याने पावसाचा थेंबही या भागात बरसला नाही़ (प्रतिनिधी)