शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
सारा तेंडुलकर 'या' बॉलिवूड अभिनेत्याला करतेय 'डेट'? दीपिका पदुकोणसोबत दिलेत भरपूर 'किसिंग सीन'
3
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
4
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
5
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
6
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
7
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
8
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
9
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
10
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
11
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
12
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

अन् नानांनी दिली कर्तव्याची आठवण...

By admin | Updated: November 28, 2014 01:16 IST

औरंगाबाद : ‘मराठवाडा शिक्षण हक्क व कर्तव्य परिषदेत’ राज्य शिक्षण संस्था महामंडळांच्या नेत्यांनी हक्काचा पाढा वाचला, तर विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे (नाना) यांनी

औरंगाबाद : ‘मराठवाडा शिक्षण हक्क व कर्तव्य परिषदेत’ राज्य शिक्षण संस्था महामंडळांच्या नेत्यांनी हक्काचा पाढा वाचला, तर विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे (नाना) यांनी उपस्थित संस्थाचालक व शिक्षकांना त्यांच्या कर्तव्याची आठवण करून दिली. येथील रुख्मिणी सभागृहात गुरुवारी आयोजित शिक्षण परिषदेचे ‘हक्क व कर्तव्य’ अशा पद्धतीने पार पडले. गावातील शाळा सोडून पालक त्यांच्या पाल्यांना गाडी करून १५ ते २० किलोमीटर दूरच्या शाळेत का पाठवीत आहेत, त्यातून शाळेतील विद्यार्थी संख्या कमी होऊन शिक्षक अतिरिक्त ठरत आहेत. विद्यार्थी संख्या कमी होण्याला समाज व सरकार जबाबदार आहे का? असा थेट प्रश्न हरिभाऊ बागडे यांनी उपस्थित केला. तेव्हा उपस्थित शिक्षकांना टाळ्या वाजवून प्रतिसाद देण्याशिवाय गत्यंतर राहिले नाही. याचे उत्तर आपणास माहिती आहे, असे सांगून बागडे म्हणाले की, याला जबाबदार तुम्हीच (शिक्षक- संस्थाचालक) आहात. पहिल्या वर्गापासून मुले तुमच्याकडे शिकतात. चौथ्या वर्गात जाईपर्यंत त्यांना वाचता-लिहिता येत नाही. मग अशा विद्यार्थ्यांना तुम्हीच ‘ढ’ ठरविता. तो ‘ढ’ असल्याचे सतत त्याच्यावर बिंबविता. त्यातून मुलाचा निरुत्साह वाढतो व तो शाळा सोडतो. विद्यार्थी शाळेतून बाहेर पडण्यास शिक्षकच जबाबदार आहेत. तुम्ही मनाने व मायेने शिकविले, तर विद्यार्थ्यांची गळती थांबेल. गुणवत्ता वाढून मुलांचा आत्मविश्वास वाढेल. पर्यायाने शिक्षक अतिरिक्त ठरणार नाहीत. तुम्हाला अशा मागण्याही कराव्या लागणार नाहीत. त्यामुळे शिक्षकांनी प्रथम प्रामाणिकपणे मुलांना शिकविले पाहिजे. विद्यार्थी नापास होणे हे पाप शिक्षकांचेच आहे, हे स्पष्ट करून बागडे म्हणाले की, शिक्षकांच्या ज्या काही समस्या आहेत, त्या सोडविण्यासाठी मी शिक्षणमंत्री, शिक्षण सचिव आदी संबंधितांशी महामंडळाच्या नेत्यांची बोलणी करून देतो. माझी भूमिका तेवढीच मर्यादित आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. परिषदेचे अध्यक्ष विजय नवल पाटील म्हणाले की, सरकारी शाळा गुणवत्तेअभावी बंद पडत आहेत. या शाळांतील प्रत्येक विद्यार्थ्यावर सरकार दरमहा ५ हजार रुपये खर्च करते; परंतु संस्थेच्या शाळांमधून एका विद्यार्थ्यावर दीड हजार रुपये खर्च येतो. हा खर्चही सरकार देत नाही. यासह शिक्षण संस्थासमोर अनेक प्रश्नांचा ऊहापोह त्यांनी केला. ४आ. विक्रम काळे यांनी आपल्या ४० मिनिटांच्या भाषणात शिक्षक व शाळांसमोरील समस्या पोटतिडकीने मांडल्या. ते म्हणाले की, शिक्षण संस्थाचालक म्हणजे चोरच असल्याच्या आविर्भावात प्रत्येक जण त्याच्याकडे पाहतो आहे. आमच्या सरकारने शक्य तेवढे चांगले निर्णय घेतले. आता उर्वरित निर्णय नव्या सरकारने घ्यायचे आहेत. नाना, तुम्ही शिक्षणात चांगले दिवस आणा, असे साकडेही त्यांनी हरिभाऊ बागडे यांना घातले. ४यावेळी मंचावर प्रा. एच.एम. देसरडा, सर्जेराव ठोंबरे, उद्धव भवलकर, फादर रॉड्रिग्ज, सुशीला मोराळे, मिलिंद पाटील, वाल्मीक सुरासे, आनंद खरात, सूर्यकांता गाडे, अनिल नखाते, मनोज पाटील, शिल्पा दुशिंगे, मिर्झा सलीम, मिलिंद पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती. ४स्वागताध्यक्ष एस.पी. जवळकर यांनी मनोगत व्यक्त करून पाहुण्यांचे स्वागत केले. प्रा. शिवानंद भानुसे यांनी सूत्रसंचालन केले. मिलिंद पाटील यांनी आभार मानले.