शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
7
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
8
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
9
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
10
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
11
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
13
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
14
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
15
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
16
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
17
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
18
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
19
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
20
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO

अन् नानांनी दिली कर्तव्याची आठवण...

By admin | Updated: November 28, 2014 01:16 IST

औरंगाबाद : ‘मराठवाडा शिक्षण हक्क व कर्तव्य परिषदेत’ राज्य शिक्षण संस्था महामंडळांच्या नेत्यांनी हक्काचा पाढा वाचला, तर विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे (नाना) यांनी

औरंगाबाद : ‘मराठवाडा शिक्षण हक्क व कर्तव्य परिषदेत’ राज्य शिक्षण संस्था महामंडळांच्या नेत्यांनी हक्काचा पाढा वाचला, तर विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे (नाना) यांनी उपस्थित संस्थाचालक व शिक्षकांना त्यांच्या कर्तव्याची आठवण करून दिली. येथील रुख्मिणी सभागृहात गुरुवारी आयोजित शिक्षण परिषदेचे ‘हक्क व कर्तव्य’ अशा पद्धतीने पार पडले. गावातील शाळा सोडून पालक त्यांच्या पाल्यांना गाडी करून १५ ते २० किलोमीटर दूरच्या शाळेत का पाठवीत आहेत, त्यातून शाळेतील विद्यार्थी संख्या कमी होऊन शिक्षक अतिरिक्त ठरत आहेत. विद्यार्थी संख्या कमी होण्याला समाज व सरकार जबाबदार आहे का? असा थेट प्रश्न हरिभाऊ बागडे यांनी उपस्थित केला. तेव्हा उपस्थित शिक्षकांना टाळ्या वाजवून प्रतिसाद देण्याशिवाय गत्यंतर राहिले नाही. याचे उत्तर आपणास माहिती आहे, असे सांगून बागडे म्हणाले की, याला जबाबदार तुम्हीच (शिक्षक- संस्थाचालक) आहात. पहिल्या वर्गापासून मुले तुमच्याकडे शिकतात. चौथ्या वर्गात जाईपर्यंत त्यांना वाचता-लिहिता येत नाही. मग अशा विद्यार्थ्यांना तुम्हीच ‘ढ’ ठरविता. तो ‘ढ’ असल्याचे सतत त्याच्यावर बिंबविता. त्यातून मुलाचा निरुत्साह वाढतो व तो शाळा सोडतो. विद्यार्थी शाळेतून बाहेर पडण्यास शिक्षकच जबाबदार आहेत. तुम्ही मनाने व मायेने शिकविले, तर विद्यार्थ्यांची गळती थांबेल. गुणवत्ता वाढून मुलांचा आत्मविश्वास वाढेल. पर्यायाने शिक्षक अतिरिक्त ठरणार नाहीत. तुम्हाला अशा मागण्याही कराव्या लागणार नाहीत. त्यामुळे शिक्षकांनी प्रथम प्रामाणिकपणे मुलांना शिकविले पाहिजे. विद्यार्थी नापास होणे हे पाप शिक्षकांचेच आहे, हे स्पष्ट करून बागडे म्हणाले की, शिक्षकांच्या ज्या काही समस्या आहेत, त्या सोडविण्यासाठी मी शिक्षणमंत्री, शिक्षण सचिव आदी संबंधितांशी महामंडळाच्या नेत्यांची बोलणी करून देतो. माझी भूमिका तेवढीच मर्यादित आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. परिषदेचे अध्यक्ष विजय नवल पाटील म्हणाले की, सरकारी शाळा गुणवत्तेअभावी बंद पडत आहेत. या शाळांतील प्रत्येक विद्यार्थ्यावर सरकार दरमहा ५ हजार रुपये खर्च करते; परंतु संस्थेच्या शाळांमधून एका विद्यार्थ्यावर दीड हजार रुपये खर्च येतो. हा खर्चही सरकार देत नाही. यासह शिक्षण संस्थासमोर अनेक प्रश्नांचा ऊहापोह त्यांनी केला. ४आ. विक्रम काळे यांनी आपल्या ४० मिनिटांच्या भाषणात शिक्षक व शाळांसमोरील समस्या पोटतिडकीने मांडल्या. ते म्हणाले की, शिक्षण संस्थाचालक म्हणजे चोरच असल्याच्या आविर्भावात प्रत्येक जण त्याच्याकडे पाहतो आहे. आमच्या सरकारने शक्य तेवढे चांगले निर्णय घेतले. आता उर्वरित निर्णय नव्या सरकारने घ्यायचे आहेत. नाना, तुम्ही शिक्षणात चांगले दिवस आणा, असे साकडेही त्यांनी हरिभाऊ बागडे यांना घातले. ४यावेळी मंचावर प्रा. एच.एम. देसरडा, सर्जेराव ठोंबरे, उद्धव भवलकर, फादर रॉड्रिग्ज, सुशीला मोराळे, मिलिंद पाटील, वाल्मीक सुरासे, आनंद खरात, सूर्यकांता गाडे, अनिल नखाते, मनोज पाटील, शिल्पा दुशिंगे, मिर्झा सलीम, मिलिंद पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती. ४स्वागताध्यक्ष एस.पी. जवळकर यांनी मनोगत व्यक्त करून पाहुण्यांचे स्वागत केले. प्रा. शिवानंद भानुसे यांनी सूत्रसंचालन केले. मिलिंद पाटील यांनी आभार मानले.