शहरं
Join us  
Trending Stories
1
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
2
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
3
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
4
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
5
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
6
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
7
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
8
MS धोनीनं टाकला 'कॅप्टन कूल' नावावर 'रुमाल'! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
9
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
10
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
11
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
12
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
13
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
14
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
15
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
16
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
17
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
18
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
19
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
20
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज

अन् नानांनी दिली कर्तव्याची आठवण...

By admin | Updated: November 28, 2014 01:16 IST

औरंगाबाद : ‘मराठवाडा शिक्षण हक्क व कर्तव्य परिषदेत’ राज्य शिक्षण संस्था महामंडळांच्या नेत्यांनी हक्काचा पाढा वाचला, तर विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे (नाना) यांनी

औरंगाबाद : ‘मराठवाडा शिक्षण हक्क व कर्तव्य परिषदेत’ राज्य शिक्षण संस्था महामंडळांच्या नेत्यांनी हक्काचा पाढा वाचला, तर विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे (नाना) यांनी उपस्थित संस्थाचालक व शिक्षकांना त्यांच्या कर्तव्याची आठवण करून दिली. येथील रुख्मिणी सभागृहात गुरुवारी आयोजित शिक्षण परिषदेचे ‘हक्क व कर्तव्य’ अशा पद्धतीने पार पडले. गावातील शाळा सोडून पालक त्यांच्या पाल्यांना गाडी करून १५ ते २० किलोमीटर दूरच्या शाळेत का पाठवीत आहेत, त्यातून शाळेतील विद्यार्थी संख्या कमी होऊन शिक्षक अतिरिक्त ठरत आहेत. विद्यार्थी संख्या कमी होण्याला समाज व सरकार जबाबदार आहे का? असा थेट प्रश्न हरिभाऊ बागडे यांनी उपस्थित केला. तेव्हा उपस्थित शिक्षकांना टाळ्या वाजवून प्रतिसाद देण्याशिवाय गत्यंतर राहिले नाही. याचे उत्तर आपणास माहिती आहे, असे सांगून बागडे म्हणाले की, याला जबाबदार तुम्हीच (शिक्षक- संस्थाचालक) आहात. पहिल्या वर्गापासून मुले तुमच्याकडे शिकतात. चौथ्या वर्गात जाईपर्यंत त्यांना वाचता-लिहिता येत नाही. मग अशा विद्यार्थ्यांना तुम्हीच ‘ढ’ ठरविता. तो ‘ढ’ असल्याचे सतत त्याच्यावर बिंबविता. त्यातून मुलाचा निरुत्साह वाढतो व तो शाळा सोडतो. विद्यार्थी शाळेतून बाहेर पडण्यास शिक्षकच जबाबदार आहेत. तुम्ही मनाने व मायेने शिकविले, तर विद्यार्थ्यांची गळती थांबेल. गुणवत्ता वाढून मुलांचा आत्मविश्वास वाढेल. पर्यायाने शिक्षक अतिरिक्त ठरणार नाहीत. तुम्हाला अशा मागण्याही कराव्या लागणार नाहीत. त्यामुळे शिक्षकांनी प्रथम प्रामाणिकपणे मुलांना शिकविले पाहिजे. विद्यार्थी नापास होणे हे पाप शिक्षकांचेच आहे, हे स्पष्ट करून बागडे म्हणाले की, शिक्षकांच्या ज्या काही समस्या आहेत, त्या सोडविण्यासाठी मी शिक्षणमंत्री, शिक्षण सचिव आदी संबंधितांशी महामंडळाच्या नेत्यांची बोलणी करून देतो. माझी भूमिका तेवढीच मर्यादित आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. परिषदेचे अध्यक्ष विजय नवल पाटील म्हणाले की, सरकारी शाळा गुणवत्तेअभावी बंद पडत आहेत. या शाळांतील प्रत्येक विद्यार्थ्यावर सरकार दरमहा ५ हजार रुपये खर्च करते; परंतु संस्थेच्या शाळांमधून एका विद्यार्थ्यावर दीड हजार रुपये खर्च येतो. हा खर्चही सरकार देत नाही. यासह शिक्षण संस्थासमोर अनेक प्रश्नांचा ऊहापोह त्यांनी केला. ४आ. विक्रम काळे यांनी आपल्या ४० मिनिटांच्या भाषणात शिक्षक व शाळांसमोरील समस्या पोटतिडकीने मांडल्या. ते म्हणाले की, शिक्षण संस्थाचालक म्हणजे चोरच असल्याच्या आविर्भावात प्रत्येक जण त्याच्याकडे पाहतो आहे. आमच्या सरकारने शक्य तेवढे चांगले निर्णय घेतले. आता उर्वरित निर्णय नव्या सरकारने घ्यायचे आहेत. नाना, तुम्ही शिक्षणात चांगले दिवस आणा, असे साकडेही त्यांनी हरिभाऊ बागडे यांना घातले. ४यावेळी मंचावर प्रा. एच.एम. देसरडा, सर्जेराव ठोंबरे, उद्धव भवलकर, फादर रॉड्रिग्ज, सुशीला मोराळे, मिलिंद पाटील, वाल्मीक सुरासे, आनंद खरात, सूर्यकांता गाडे, अनिल नखाते, मनोज पाटील, शिल्पा दुशिंगे, मिर्झा सलीम, मिलिंद पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती. ४स्वागताध्यक्ष एस.पी. जवळकर यांनी मनोगत व्यक्त करून पाहुण्यांचे स्वागत केले. प्रा. शिवानंद भानुसे यांनी सूत्रसंचालन केले. मिलिंद पाटील यांनी आभार मानले.