घनसावंगी : तालुक्यातील कुंभारपिंपळगाव परिसरातील सोनेतारण कर्जावर कमी रक्कम मिळत असल्याने शेतकरी हतबल झाले असल्याचे पहावयास मिळत आहे.फेब्रुवारी-मार्चमध्ये तालुक्यात मोठ्या प्रमाणावर गारपीट झाली होती. त्यातील कुंभार पिंंपळगाव सर्कल नुकसान भरपाईतून वगळण्यात आल्याने शेतकऱ्यांना नुकसानीचा मोबदला मिळाला नाही. त्यातच सोने तारण कर्जावरील एकूण रक्कमेच्या ८० टक्के रक्कम मिळत असून मुळ रक्कमही अत्यल्प ग्राह्य धरण्यात येत आहे. त्यामुळे शेतकरी याचा त्रास सहन करावा लागत आहे.सध्या सोन्याचे भाव ज्वेलर्स मध्ये २७०० रूपये प्रतिगॅ्रम भाव असून सोने तारण कर्जासाठी खाजगी सहकारी पतसंस्था ह्या २२०० रू. भाव ठरवून त्यातुनही ८० टक्के रक्कम शेतकऱ्यांच्या हाती देत आहेत. त्यामुळे शेतकऱ्याला कवडीमोल भावाने सोने बँकेत ठेवून व्याजाचे पैसे मिळत आहेत. त्यामुळे भविष्यकाळात शेतकऱ्याला सावकराचे दार ठोठावण्याची वेळ येणार असल्याचे चित्र आहे.गारपीट झालेल्या भागातील शेतकऱ्यांचे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. भरपाई न मिळाल्याने शेतकरी वर्ग अडचणीत सापडला होता. त्यातच आता खाजगी बँकाही सोनेतारणाचा कमी भाव ठरवून सोने तारण होत असल्याने शेतकरी मात्र दुहेरी कात्रीत सापडलेला आहे. त्यातच बियाणेचाही भाव कडाकले असल्याने शेतकरी आणखीनच कोंडीत सापडला आहे.त्यातच सोने तारण कर्जावर बँक तोकडी रक्कम देत असल्यानेही रक्कम ही रक्कम वाढून देण्याच मागणी शेतकरी करीत आहे.सोने तारण कर्जाची रक्कम ही दुकानाच्या भावाने ठरवून त्यातील काही अंशी रक्कम देण्यात यावी. जेणेकरून शेतकऱ्यांची आर्थिक अडचण कमी होईल, सोने तारण कर्जाला योग्य भाव देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात होत आहे. (वार्ताहर)शेतकरी प्रतीक्षेतसोने तारण कर्जावर बँकेकडून रक्कम वाढवून मिळेल, या प्रतीक्षेत शेतकरी आहेत. खरीप हंगाम जवळ आला असून त्यापूर्वी ही रक्कम वाढवून मिळावी, अशी अपेक्षा शेतकऱ्यांमधून होत आहे.
सोने तारण कर्जावर तोकडी रक्कम
By admin | Updated: June 9, 2014 00:10 IST