शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
2
India Pakistan War : भारताने लाहोर ते कराचीपर्यंतच्या ९ शहरांवर इस्रायली ड्रोनने हल्ला केला; घाबरलेल्या पाकिस्तानचा दावा
3
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
4
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
5
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी
6
कधी काजल, कधी स्वीटी; २१ वर्षीय गुलशानाचं १२ वेळा लग्न; तरुणांना ‘अशी’ अडकवायची जाळ्यात
7
बारामतीच्या महिलेचे पाचोऱ्याच्या तरुणावर जडलं प्रेम; पण असं काही घडलं की तिघांनी केली आत्महत्या
8
घराजवळ बाँबचा आवाज ऐकल्याने पाकिस्तानी अभिनेता बिथरला, म्हणाला- "आम्हाला शांतता हवी आहे..."
9
Pakistan Video: "इतके नालायक आहेत, ड्रोन हल्ला, पण सांगताहेत की वीज कोसळली", पाकिस्तानी नागरिकाचा व्हिडीओ व्हायरल
10
Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त
11
भारत-पाकिस्तान तणावामुळे बाजारात दबाव; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण
12
ऑपरेशन सिंदूरः भारताने पाकिस्तानला दाखवलेत 'तारे', वाहतील का युद्धाचे वारे?; ग्रहस्थिती काय सांगतेय बघा!
13
'ऑपरेशन सिंदूर' भारतीय शौर्याचे प्रतीक, हा शब्द आता.. ट्रेडमार्कवर रिलायन्सचे स्पष्टीकरण
14
"दहशतवादी हल्ल्यामुळे आम्हाला प्रत्युत्तर द्यावं लागलं!"; इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांसमोर एस जयशंकर काय म्हणाले?
15
India pakistan : दोन राज्यात पोलिसांच्या सुट्ट्या रद्द, शाळा बंद; राजस्थान, पंजाबमध्ये हायअलर्ट
16
चहा, डायपर ते सॅनिटायझिंग.. डाबर अनेक प्रॉडक्ट बंद करणार; सीईओंनी स्वतः सांगितलं कारण
17
Sophia Qureshi: बहीण असावी तर अशी! “मी तिच्याद्वारे माझं स्वप्न जगतेय”, कर्नल सोफिया यांचा कुटुंबीयांना अभिमान
18
भारत-पाक तणावादरम्यान सोन्या-चांदीचे दर आपटले; झाली मोठी घसरण, काय आहेत नवे दर?
19
Sanjay Singh : “पाकिस्तानने अमृतसर, होशियारपूरमध्ये क्षेपणास्त्रे डागण्याचा प्रयत्न केला, जो सैन्याने हाणून पाडला”

अंबडचा पाणीप्रश्न पुन्हा पेटला...

By admin | Updated: October 29, 2014 00:43 IST

अंबड : शहराचे पाणी पुन्हा एकदा पेटु लागले आहे. शहरास अवघे काही दिवस पुरेल एवढाच जलसाठा अंबड पालिकेकडे शिल्लक असून जायकवाडी-जालना पाणीपुरवठा योजनेतून

अंबड : शहराचे पाणी पुन्हा एकदा पेटु लागले आहे. शहरास अवघे काही दिवस पुरेल एवढाच जलसाठा अंबड पालिकेकडे शिल्लक असून जायकवाडी-जालना पाणीपुरवठा योजनेतून ३१ आॅक्टोबरपर्यंत अंबड शहरास पाणीपुरवठा सुरु न केल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा अंबडच्या नगराध्यक्षा मंगल कटारे यांनी विभागीय आयुक्तांना निवेदनाव्दारे दिला आहे. तर त्याच्या प्रत्युत्तरात जालना नगरपालिकेत सत्ता असलेल्या काँगे्रसचे माजी आ.कैलास गोरंटयाल यांनी अंबड पालिकेने १५ कोटी रुपये भरल्याशिवाय अंबडला कोणत्याही परिस्थितीत पाणी सोडणार नसल्याची भूमिका पत्रकार परिषदेत जाहीर केली. साधारण दीड ते दोन वर्षापूर्वी गोरंट्याल यांनी अशीच भूमिका घेतल्यानंतर तत्कालिन आमदार संतोष सांबरे यांनी अंबड शहराचा जायकवाडी-जालना परियोजनेत समावेश करण्याच्या मागणीसाठी जल आंदोलन उभारले होते. त्यावेळी आंदोलनामुळे तालुक्यातील वातावरण ढवळून निघाले होते. आज या घडामोडी घडत असताना सर्व शहरवासीयांचे लक्ष बदनापूरचे नवनिर्वाचित आ. नारायण कुचे यांच्या भूमिकेकडे लागले आहे. सांबरे यांच्या कारकीर्दीत अधुरे राहिलेले जलआंदोलन नारायण कुचे पूर्ण करणार का याकडे सर्व तालुक्याचे लक्ष लागले आहे.शहराची एकुण लोकसंख्या ३१ हजार ५३१ आहे. शहरवासीयांची दररोजची पाण्याची गरज आजघडीला दीड ते दोन एमएलडी एवढी आहे. जायकवाडी-जालना पाणी पुरवठा योजनेची क्षमता ६५ एमएलडी असून योजनेतून सध्या दोन एमएलडी व भविष्यकाळात पाच एमएलडी पाणी देण्याची अंबडवासीयांची जुनी मागणी आहे. विशेष म्हणजे जायकवाडी-जालना पाणीपुरवठा योजनेचे जलशुध्दीकरण केंद्राची भव्य इमारत शहरातील मत्स्योदरी देवी मंदिराच्या पायथ्याशी आहे. दररोज या वाहिनीतून लाखो लिटर पाण्याचा पुरवठा जालना शहरास होत असल्याचे माहित असल्याने दिवसेंदिवस अंबडवासीयांची पाण्याची मागणी जोर धरत आहे. मागील वर्षी जायकवाडी-जालना पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झाल्यानंतर जुनी शहागड-अंबड-जालना योजनेतून जालना शहरास मिळणारे पाणी बंद करण्यात आले. मात्र अंबड शहराचा जायकवाडी-जालना योजनेत समावेश न केल्यामुळे आजही अंबड शहरातील जनता कालबाह्य झालेल्या शहागड-अंबड पाणीपुरवठा योजनेवर अवलंबून आहे. कालबाह्य झालेल्या या योजनेच्या डागडुजी तसेच इतर खर्च अंबड पालिकेस झेपत नसल्याचे अगोदरच स्पष्ट झाले आहे.अंबड शहरास केवळ ३१ आॅक्टोबर पर्यंत पुरु शकेल एवढाच जलसाठा शिल्लक आहे. ३१ आॅक्टोबर पर्यंत अंबड शहराचा जायकवाडी-जालना पाणीपुरवठा योजनेत समावेश न केल्यास आमरण उपोषण सुरु करण्याचा इशारा सोमवारी अंबड पालिकेच्या नगराध्यक्षा मंगल कटारे यांनी विभागीय आयुक्तांना दिलेल्या निवेदनाव्दारे दिला आहे.खुद्द नगराध्यक्षांना विभागीय आयुक्तांना भेटून पाण्यासारख्या मूलभूत गरजेसाठी आमरण उपोषणाचा इशारा द्यावा लागत असल्याने शहराच्या गंभीर पाणी संकटाची दाहकता सर्वांना जाणवू लागली आहे.दुसरीकडे जालना पालिकेचे सर्वेसर्वा माजी आ.कैलास गोरंटयाल यांनी १५ कोटी रुपये भरल्याशिवाय पाणी न देण्याची भूमिका पत्रकार परिषद घेऊन जाहीर केलेली आहे, हे विशेष . (वार्ताहर)