शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
2
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
3
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
4
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
5
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
6
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
7
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
8
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
9
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
10
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
11
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी
12
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट
13
Tejasvee Ghosalkar : "भाजपात जाण्याबाबत मी..."; तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट
14
Surya Gochar 2025: सूर्य होणार अधिक प्रखर, मात्र 'या' राशींसाठी ठरणार सुखकर; कसा ते पहा!
15
'तुझा मुलगा जिन्न आहे' मांत्रिकाचं ऐकून १२ वर्षांनी झालेल्या मुलाला कालव्यात फेकलं!
16
भारतात Trump Towerचा जलवा, ८ ते १५ कोटींचे फ्लॅट्स; १२५ कोटींचं पेंटहाऊस, पहिल्याच दिवशी सोल्ड आऊट
17
ICC Test Rankings : 'तलवारबाज' जड्डूचा मोठा पराक्रम! टेस्टमध्ये अव्वलस्थान कायम राखत सेट केला नवा विक्रम
18
३६ युद्धनौका, ७ विनाशिका, फ्रिगेट आणि पाणबुड्या..., त्या रात्री नौदलाने केली होती कराची बेचिराख करण्याची तयारी   
19
Mumbai: मुंबईतील महिलेची सातव्या मजल्यावरून उडी, सुसाईड नोटमध्ये लिहिले मृत्युचे कारण
20
दहशतवादी मसूद अजहरला पाकिस्तानी सरकार १४ कोटी रुपये देणार? कारण ऐकून व्हाल हैराण!

सर्व शेतकरी संघटनांचे एकत्रिकरण आवश्यक

By admin | Updated: March 29, 2016 00:44 IST

लातूर : राज्यात शेतकरी संघटनेची शकले खूप झाली आहेत. आर. पी. आयसारखी दशा झालेल्या शेतकऱ्यांच्या विविध संघटनेच्या सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन एकच संघटना मजबूत

लातूर : राज्यात शेतकरी संघटनेची शकले खूप झाली आहेत. आर. पी. आयसारखी दशा झालेल्या शेतकऱ्यांच्या विविध संघटनेच्या सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन एकच संघटना मजबूत करणे ही काळाची गरज आहे. परंतु मोठ्या नेत्यांच्या वैयक्तिक इगोमुळेच या दुफळ्या झाल्या असून यातून शेतकऱ्यांचे प्रश्न सुटण्यास अडचणी येत असल्याचे मत मांडून भाजपाने स्वामीनाथ समितीच्या शिफारसीबाबत घेतलेला ‘यु टर्न’ ही सर्वात धक्कादायक असल्याचे बळीराजा शेतकरी संघटनेचे प्रवक्ते संजय पाटील घाटणेकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना मांडले. घाटणेकर हे बळीराजा शेतकरी संघटनेच्या कार्यक्रमानिमित्ताने लातूर येथे आले असता ‘लोकमत’शी बोलत होते. ते पुढे म्हणाले की, शरद जोशींची शेतकरी संघटना ही शेतकऱ्यांचे सर्वात मोठे संघटन होते. या संघटनेच्या मुशीत तावून-सुलाखून निघालेल्या कार्यकर्त्यांची फळी तयार झाली. परंतु महत्त्वकांक्षेपोटी पुढे शेट्टींची स्वाभीमानी वेगळी झाली. रघुनाथदादा वेगळे झाले. आमची बळीराजा आली. त्यानंतर आता अनेक छोट्या-मोठ्या संघटनांची निर्मिती होत आहे. भविष्यात अशा संघटना वाढण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांच्या संघटना वाढणे ही बाब जमेची असली तरी पार अनेक शकलांमध्ये विभागणे ही बाब शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी चांगली नाही. केवळ काहींच्या इगोमुळेच हे घडते आहे. स्वत:चे राजकीय अस्तित्व स्वतंत्र ठेवून शेतकऱ्यांच्या हिताच्या मुद्यांवर सर्व शेतकरी संघटना एक झाल्या तर सरकारला पळता भुई थोडी होईल आणि शेतकऱ्यांच्या मुद्यांकडे दुर्लक्ष करता येणार नाही. परंतु खुर्चीचे मोह अनेकांना असे करु देत नाहीत. अशा पध्दतीने जर कुणी पुढे येत असेल तर आमची बळीराजा शेतकरी संघटना पहिला पुढाकार घेईल, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)