शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

सर्व शेतकरी संघटनांचे एकत्रिकरण आवश्यक

By admin | Updated: March 29, 2016 00:44 IST

लातूर : राज्यात शेतकरी संघटनेची शकले खूप झाली आहेत. आर. पी. आयसारखी दशा झालेल्या शेतकऱ्यांच्या विविध संघटनेच्या सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन एकच संघटना मजबूत

लातूर : राज्यात शेतकरी संघटनेची शकले खूप झाली आहेत. आर. पी. आयसारखी दशा झालेल्या शेतकऱ्यांच्या विविध संघटनेच्या सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन एकच संघटना मजबूत करणे ही काळाची गरज आहे. परंतु मोठ्या नेत्यांच्या वैयक्तिक इगोमुळेच या दुफळ्या झाल्या असून यातून शेतकऱ्यांचे प्रश्न सुटण्यास अडचणी येत असल्याचे मत मांडून भाजपाने स्वामीनाथ समितीच्या शिफारसीबाबत घेतलेला ‘यु टर्न’ ही सर्वात धक्कादायक असल्याचे बळीराजा शेतकरी संघटनेचे प्रवक्ते संजय पाटील घाटणेकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना मांडले. घाटणेकर हे बळीराजा शेतकरी संघटनेच्या कार्यक्रमानिमित्ताने लातूर येथे आले असता ‘लोकमत’शी बोलत होते. ते पुढे म्हणाले की, शरद जोशींची शेतकरी संघटना ही शेतकऱ्यांचे सर्वात मोठे संघटन होते. या संघटनेच्या मुशीत तावून-सुलाखून निघालेल्या कार्यकर्त्यांची फळी तयार झाली. परंतु महत्त्वकांक्षेपोटी पुढे शेट्टींची स्वाभीमानी वेगळी झाली. रघुनाथदादा वेगळे झाले. आमची बळीराजा आली. त्यानंतर आता अनेक छोट्या-मोठ्या संघटनांची निर्मिती होत आहे. भविष्यात अशा संघटना वाढण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांच्या संघटना वाढणे ही बाब जमेची असली तरी पार अनेक शकलांमध्ये विभागणे ही बाब शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी चांगली नाही. केवळ काहींच्या इगोमुळेच हे घडते आहे. स्वत:चे राजकीय अस्तित्व स्वतंत्र ठेवून शेतकऱ्यांच्या हिताच्या मुद्यांवर सर्व शेतकरी संघटना एक झाल्या तर सरकारला पळता भुई थोडी होईल आणि शेतकऱ्यांच्या मुद्यांकडे दुर्लक्ष करता येणार नाही. परंतु खुर्चीचे मोह अनेकांना असे करु देत नाहीत. अशा पध्दतीने जर कुणी पुढे येत असेल तर आमची बळीराजा शेतकरी संघटना पहिला पुढाकार घेईल, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)