शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
2
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
3
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
4
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
5
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
6
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
7
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
8
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
9
"त्यांनी माझे गाल ओढले, दंडाला चिमटे काढले...", हळदीकुंकूच्या कार्यक्रमाला गेलेल्या प्रिया बेर्डेंना चाहत्यांकडून आलेला धक्कादायक अनुभव
10
क्रिकेटरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी दिसणार सलमान खानच्या 'बिग बॉस १९'मध्ये?, जाणून घ्या याबद्दल
11
"भारत-पाक संघर्ष अणुयुद्धात बदलला असता, मी होतो म्हणून..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा 'तो' दावा कायम
12
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
13
जन्माष्टमी २०२५: ‘या’ राशींवर श्रीकृष्ण कृपा, पैसे कमी पडत नाहीत; सुबत्ता-वैभव-भरभराट लाभते!
14
राजा रघुवंशीच्या घरी अचानक पोहोचला पोलिसांच्या वेशातील व्यक्ती; कुटुंबाला आला संशय, तपास करताच धक्कादायक सत्य उघड
15
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
16
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
17
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
18
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
19
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
20
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ

उद्यापासून ८५९ शाळांची घंटा वाजण्याची अपेक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:05 IST

कोवीडमुक्त गावे ४४६ : मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या सरपंच, मुख्याध्यापकांना सूचना औरंगाबाद : कोविडमुक्त गावांतील इयत्ता ८ वी ते १२ ...

कोवीडमुक्त गावे ४४६ : मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या सरपंच, मुख्याध्यापकांना सूचना

औरंगाबाद : कोविडमुक्त गावांतील इयत्ता ८ वी ते १२ वीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यास शालेय शिक्षण विभागाने मुभा दिली आहे. त्यानुसार शाळा उघडण्यासाठी पूर्वतयारी म्हणून मंगळवारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले यांनी जिल्ह्यातील कोविडमुक्त गावांतील मुख्याध्यापकांची ऑनलाईन बैठक घेतली व १५ जुलैपासून शाळा सुरू करण्याच्या सूचना केल्या.

जिल्ह्यातील इयत्ता ८ वी ते १२ वीपर्यंतच्या १,११२ शाळा कार्यरत असून यापैकी कोविडमुक्त ४४६ गावांत ८५९ माध्यमिक शाळा कार्यरत आहेत. मंगळवारी डॉ. गोंदावले यांनी आयोजित केलेल्या ऑनलाइन बैठकीत ६५० मुख्याध्यापक सहभागी झाले होते. शासनाने कोविडमुक्त गावांतील सरपंचांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यीय समिती स्थापन केली असून ग्रामसेवक हे त्या समितीचे सदस्य आहेत. मुख्याध्यापकांनी या समितीची संमती घेऊनच संबंधित गावांतील शाळा सुरू कराव्यात, अशा सूचना या बैठकीत शिक्षणाधिकारी डॉ. बी.बी. चव्हाण यांनी केल्या. एवढेच नव्हे, तर शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांची संमतीदेखील तेवढीच आवश्यक आहे. वर्ग क्षमतेच्या निम्म्या विद्यार्थी संख्येने शाळा सुरू कराव्यात, एका बाकावर एकच विद्यार्थी बसवावा, दुपारची जेवणाची सुटी न देता सलग ३-४ तास वर्ग घेतल्यानंतर शाळेला सुटी द्यावी व मंगळवारी आणि बुधवारी दोन दिवस सरपंच समितीची पूर्वपरवानगी घेऊन गुरुवारपासून शाळा सुरू कराव्यात, या सूचना मुख्याध्यापकांना या बैठकीत केल्या.

चौकट.....

प्राथमिक शाळाही सुरू झाल्या पाहिजे

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील वर्षांपासून राज्यातील शाळा बंद आहेत. शिक्षण विभागाने १५ जुलैपासून राज्यातील कोविडमुक्त गावांतील पहिल्या टप्प्यात ८ वी ते १२ वीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यासाठी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. त्यामुळे ८ वीच्या खालचे वर्ग सुरू करण्याबाबत अनेक पालक, शिक्षक हे शिक्षण विभागाकडे वारंवार विचारणा करत आहेत.

त्यानुसार राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने शाळा सुरू करण्याबाबत जनमत चाचणीद्वारे (सर्वेक्षण) पालकांची मते जाणून घेतली. यामध्ये ८५ टक्के पालकांनी १ ली ते ७ वीचेही वर्ग सुरू करण्याबाबत अनुकूलता दर्शवली आहे. या सर्वेक्षणात औरंगाबाद जिल्ह्यातील १२ हजार ९८८ पालकांचा समावेश आहे.

चौकट........

प्राथमिक शाळांबाबत सूचना नाहीत

शिक्षणाधिकारी डॉ. बी.बी. चव्हाण यांनी सांगितले की, गणेशवाडीचे सरपंच व ग्रामस्थांनी स्वत:च्या जबाबदारीवर प्राथमिक शाळा सुरू केली आहे. मात्र, पहिली ते सातवीपर्यंत वर्ग सुरू करण्यास शासनाच्या कोणत्याही मार्गदर्शक सूचना नाहीत. आता आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू केले जातील. दोन-तीन महिने वातावरणाचा आढावा घेतल्यानंतर प्राथमिक शाळांचा निर्णय अपेक्षित आहे. जिल्ह्यात १ ली ते १० वीपर्यंत ४ हजार ५५५ अनुदानित शाळा आहेत.