शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

उद्यापासून ८५९ शाळांची घंटा वाजण्याची अपेक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:05 IST

कोवीडमुक्त गावे ४४६ : मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या सरपंच, मुख्याध्यापकांना सूचना औरंगाबाद : कोविडमुक्त गावांतील इयत्ता ८ वी ते १२ ...

कोवीडमुक्त गावे ४४६ : मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या सरपंच, मुख्याध्यापकांना सूचना

औरंगाबाद : कोविडमुक्त गावांतील इयत्ता ८ वी ते १२ वीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यास शालेय शिक्षण विभागाने मुभा दिली आहे. त्यानुसार शाळा उघडण्यासाठी पूर्वतयारी म्हणून मंगळवारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले यांनी जिल्ह्यातील कोविडमुक्त गावांतील मुख्याध्यापकांची ऑनलाईन बैठक घेतली व १५ जुलैपासून शाळा सुरू करण्याच्या सूचना केल्या.

जिल्ह्यातील इयत्ता ८ वी ते १२ वीपर्यंतच्या १,११२ शाळा कार्यरत असून यापैकी कोविडमुक्त ४४६ गावांत ८५९ माध्यमिक शाळा कार्यरत आहेत. मंगळवारी डॉ. गोंदावले यांनी आयोजित केलेल्या ऑनलाइन बैठकीत ६५० मुख्याध्यापक सहभागी झाले होते. शासनाने कोविडमुक्त गावांतील सरपंचांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यीय समिती स्थापन केली असून ग्रामसेवक हे त्या समितीचे सदस्य आहेत. मुख्याध्यापकांनी या समितीची संमती घेऊनच संबंधित गावांतील शाळा सुरू कराव्यात, अशा सूचना या बैठकीत शिक्षणाधिकारी डॉ. बी.बी. चव्हाण यांनी केल्या. एवढेच नव्हे, तर शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांची संमतीदेखील तेवढीच आवश्यक आहे. वर्ग क्षमतेच्या निम्म्या विद्यार्थी संख्येने शाळा सुरू कराव्यात, एका बाकावर एकच विद्यार्थी बसवावा, दुपारची जेवणाची सुटी न देता सलग ३-४ तास वर्ग घेतल्यानंतर शाळेला सुटी द्यावी व मंगळवारी आणि बुधवारी दोन दिवस सरपंच समितीची पूर्वपरवानगी घेऊन गुरुवारपासून शाळा सुरू कराव्यात, या सूचना मुख्याध्यापकांना या बैठकीत केल्या.

चौकट.....

प्राथमिक शाळाही सुरू झाल्या पाहिजे

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील वर्षांपासून राज्यातील शाळा बंद आहेत. शिक्षण विभागाने १५ जुलैपासून राज्यातील कोविडमुक्त गावांतील पहिल्या टप्प्यात ८ वी ते १२ वीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यासाठी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. त्यामुळे ८ वीच्या खालचे वर्ग सुरू करण्याबाबत अनेक पालक, शिक्षक हे शिक्षण विभागाकडे वारंवार विचारणा करत आहेत.

त्यानुसार राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने शाळा सुरू करण्याबाबत जनमत चाचणीद्वारे (सर्वेक्षण) पालकांची मते जाणून घेतली. यामध्ये ८५ टक्के पालकांनी १ ली ते ७ वीचेही वर्ग सुरू करण्याबाबत अनुकूलता दर्शवली आहे. या सर्वेक्षणात औरंगाबाद जिल्ह्यातील १२ हजार ९८८ पालकांचा समावेश आहे.

चौकट........

प्राथमिक शाळांबाबत सूचना नाहीत

शिक्षणाधिकारी डॉ. बी.बी. चव्हाण यांनी सांगितले की, गणेशवाडीचे सरपंच व ग्रामस्थांनी स्वत:च्या जबाबदारीवर प्राथमिक शाळा सुरू केली आहे. मात्र, पहिली ते सातवीपर्यंत वर्ग सुरू करण्यास शासनाच्या कोणत्याही मार्गदर्शक सूचना नाहीत. आता आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू केले जातील. दोन-तीन महिने वातावरणाचा आढावा घेतल्यानंतर प्राथमिक शाळांचा निर्णय अपेक्षित आहे. जिल्ह्यात १ ली ते १० वीपर्यंत ४ हजार ५५५ अनुदानित शाळा आहेत.