शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
सारा तेंडुलकर 'या' बॉलिवूड अभिनेत्याला करतेय 'डेट'? दीपिका पदुकोणसोबत दिलेत भरपूर 'किसिंग सीन'
3
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
4
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
5
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
6
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
7
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
8
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
9
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
10
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
11
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
12
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

उद्यापासून ८५९ शाळांची घंटा वाजण्याची अपेक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:05 IST

कोवीडमुक्त गावे ४४६ : मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या सरपंच, मुख्याध्यापकांना सूचना औरंगाबाद : कोविडमुक्त गावांतील इयत्ता ८ वी ते १२ ...

कोवीडमुक्त गावे ४४६ : मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या सरपंच, मुख्याध्यापकांना सूचना

औरंगाबाद : कोविडमुक्त गावांतील इयत्ता ८ वी ते १२ वीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यास शालेय शिक्षण विभागाने मुभा दिली आहे. त्यानुसार शाळा उघडण्यासाठी पूर्वतयारी म्हणून मंगळवारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले यांनी जिल्ह्यातील कोविडमुक्त गावांतील मुख्याध्यापकांची ऑनलाईन बैठक घेतली व १५ जुलैपासून शाळा सुरू करण्याच्या सूचना केल्या.

जिल्ह्यातील इयत्ता ८ वी ते १२ वीपर्यंतच्या १,११२ शाळा कार्यरत असून यापैकी कोविडमुक्त ४४६ गावांत ८५९ माध्यमिक शाळा कार्यरत आहेत. मंगळवारी डॉ. गोंदावले यांनी आयोजित केलेल्या ऑनलाइन बैठकीत ६५० मुख्याध्यापक सहभागी झाले होते. शासनाने कोविडमुक्त गावांतील सरपंचांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यीय समिती स्थापन केली असून ग्रामसेवक हे त्या समितीचे सदस्य आहेत. मुख्याध्यापकांनी या समितीची संमती घेऊनच संबंधित गावांतील शाळा सुरू कराव्यात, अशा सूचना या बैठकीत शिक्षणाधिकारी डॉ. बी.बी. चव्हाण यांनी केल्या. एवढेच नव्हे, तर शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांची संमतीदेखील तेवढीच आवश्यक आहे. वर्ग क्षमतेच्या निम्म्या विद्यार्थी संख्येने शाळा सुरू कराव्यात, एका बाकावर एकच विद्यार्थी बसवावा, दुपारची जेवणाची सुटी न देता सलग ३-४ तास वर्ग घेतल्यानंतर शाळेला सुटी द्यावी व मंगळवारी आणि बुधवारी दोन दिवस सरपंच समितीची पूर्वपरवानगी घेऊन गुरुवारपासून शाळा सुरू कराव्यात, या सूचना मुख्याध्यापकांना या बैठकीत केल्या.

चौकट.....

प्राथमिक शाळाही सुरू झाल्या पाहिजे

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील वर्षांपासून राज्यातील शाळा बंद आहेत. शिक्षण विभागाने १५ जुलैपासून राज्यातील कोविडमुक्त गावांतील पहिल्या टप्प्यात ८ वी ते १२ वीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यासाठी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. त्यामुळे ८ वीच्या खालचे वर्ग सुरू करण्याबाबत अनेक पालक, शिक्षक हे शिक्षण विभागाकडे वारंवार विचारणा करत आहेत.

त्यानुसार राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने शाळा सुरू करण्याबाबत जनमत चाचणीद्वारे (सर्वेक्षण) पालकांची मते जाणून घेतली. यामध्ये ८५ टक्के पालकांनी १ ली ते ७ वीचेही वर्ग सुरू करण्याबाबत अनुकूलता दर्शवली आहे. या सर्वेक्षणात औरंगाबाद जिल्ह्यातील १२ हजार ९८८ पालकांचा समावेश आहे.

चौकट........

प्राथमिक शाळांबाबत सूचना नाहीत

शिक्षणाधिकारी डॉ. बी.बी. चव्हाण यांनी सांगितले की, गणेशवाडीचे सरपंच व ग्रामस्थांनी स्वत:च्या जबाबदारीवर प्राथमिक शाळा सुरू केली आहे. मात्र, पहिली ते सातवीपर्यंत वर्ग सुरू करण्यास शासनाच्या कोणत्याही मार्गदर्शक सूचना नाहीत. आता आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू केले जातील. दोन-तीन महिने वातावरणाचा आढावा घेतल्यानंतर प्राथमिक शाळांचा निर्णय अपेक्षित आहे. जिल्ह्यात १ ली ते १० वीपर्यंत ४ हजार ५५५ अनुदानित शाळा आहेत.