औरंगाबाद : शहरातील १६ वॉर्डांना पाणीपुरवठा करणाऱ्या हर्सूल तलावातील १२ फूट पाणी आटले आहे. तलावात सध्या साडेसात फूट पाणी असून ते १५ मार्च २०१५ पर्यंत पुरेल. गेल्यावर्षी दुष्काळात तो तलाव पूर्णत: आटला होता. तलावातील २० टक्के गाळ काढल्यानंतर पावसाळ्यात तलावामध्ये १९ फूट पाणीसाठा झाला. तलावाची क्षमता सुमारे ३० फुटांपर्यंत आहे.
हर्सूल तलावात ७.५ फूट पाणी!
By admin | Updated: December 1, 2014 01:27 IST