शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईला ऑरेंज अलर्ट जारी, उपनगरात जोरदार हजेरी; अंधेरी सबवे बंद!
2
गुड न्यूज! चाकरमान्यांना बाप्पा पावला; गणेशोत्सवासाठी कोकणात STच्या जादा ५ हजार बस धावणार
3
Raigad Rain: रायगडमध्ये पावसाचा कहर! सहा तालुक्यांमधील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी
4
पत्नीला जाळून मारल्याप्रकरणी पतीला अटक, पण ती प्रियकरासोबत सापडली जिवंत, सोलापूरातील धक्कादायक प्रकार
5
Accident Video: मृत्यूचा थरार कॅमेऱ्यात कैद! दोन तरुणांना कारने उडवले, एकाचा जागीच मृत्यू
6
...तर निम्मे होतील टोलचे दर, 'अशा' रस्त्यांवर वाहन चालवणाऱ्यांना दिलासा; सरकारनं बनवला नवा प्लॅन
7
Ramayana : तब्बल ४ हजार कोटींमध्ये बनतोय रणबीरचा 'रामायण'; निर्माते म्हणाले, "हॉलिवूडच्या जवळपासही..."
8
संपत्तीवरून वाढला वाद, पत्नीने अवघी १० लाख लावली पतीच्या जीवाची बोली! सुपारी दिली अन्...  
9
नवजात बाळाला मालिश करणं का महत्त्वाचं, कोणतं तेल आहे सर्वात बेस्ट?
10
Bitcoin Return Chart: ५ वर्षांत बनवलं राजा! तुम्हीही १००-२०० रुपयांत खरेदी करू शकता बिटकॉईन
11
जयशंकर यांनी चीनच्या राष्ट्राध्यक्षांना दिला पीएम मोदींचा संदेस; पाकिस्तानला लागणार मिरची..!
12
सरकार बदलणार MRP चा फॉर्म्युला; वस्तूंच्या किंमती कमी होणार की महागणार? ग्राहकांवर होणार परिणाम
13
धक्कादायक! हरवलेला क्रिकेटचा बॉल शोधत होता, बंद घरात मानवी सांगाडा पाहून हादरला
14
Video - जीवघेणा प्रवास! शाळेत जाण्यासाठी चिमुकलीची धडपड; पाय घसरून चिखलात पडली अन्...
15
व्रत-वैकल्यांचा राजा श्रावणमास, प्रत्येक दिवसाचे महत्त्व खास; पाहा, सण-उत्सवांचे महात्म्य
16
वय ३५? काळजी करू नका! 'या' ३ सोप्या स्टेप्सने कमवू शकता १ कोटीचा फंड, गुंतवणुकीचा सिक्रेट रोडमॅप!
17
WI vs AUS: अब्रूचं खोबरं! कॅरेबियन संघ २७ धावांवर ऑल आउट! ७ फलंदाजांच्या पदरी पडला भोपळा
18
Video: पॅराग्लायडिंग करण्यासाठी 'तो' धावत गेला अन् दरीत कोसळला! व्हिडीओ बघून चुकेल काळजाचा ठोका
19
मुंबई: घरातील सगळे झोपले अन् वाहतूक पोलीस अधिकाऱ्याने आयुष्य संपवले, साडीनेच घेतला...
20
१३८ दिवस शनि वक्री: ५ राशींवर शनिची वक्र दृष्टी कायम, ‘हे’ रामबाण उपाय कराच; शनि शुभ करेल!

६२ ग्रामपंचायतींना मिळणार घंटागाडी

By admin | Updated: January 5, 2015 00:36 IST

जालना : जिल्हा परिषदेच्या वतीने ६२ ग्राामपंचायतींना कचरा वाहून नेण्यासाठी घंटागाडी नेण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यासंबंधीचा ठराव शनिवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत मंजुर करण्यात आला.

जालना : जिल्हा परिषदेच्या वतीने ६२ ग्राामपंचायतींना कचरा वाहून नेण्यासाठी घंटागाडी नेण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यासंबंधीचा ठराव शनिवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत मंजुर करण्यात आला. जिल्हा नियोजन समिती (सर्वसाधारण) च्या नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत दरास मान्यता मिळण्याचा ठराव या सभेत मांडण्यात आला. तीन व चारचाकी अशा आवश्यकतेनुसान वाहनांची खरेदी त्यासाठी करण्यात येणार आहे. तीनचाकी घंटागाडीसाठी प्रत्येकी ३ लाख ११ हजार रुपये तर चारचाकी घंटागाडीसाठी प्रत्येकी ३ लाख ९८ हजार ७०० रुपयांच्या अंदाजपत्रकास मंजुरी देण्यात आली आहे. घंटागाडी खरेदीसंदर्भात जिल्हा परिषदेने काढलेल्या ई-टेंडरमध्ये चार एजन्सींनी सहभाग नोंदविला. मात्र त्यापैकी कमी दराच्या एका एजन्सीला मान्यता देण्यात आली. ग्रामीण भागात अनेक गावांनी स्वच्छता अभियानात क्रमांक पटकावलेला आहे. मात्र काही ग्रामपंचायतींमध्ये आजही कचरा वाहून नेण्याची सुविधा नाही. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील अन्य ग्रामपंचायतींमध्येही ही सुविधा नसल्याने कचरा गाव परिसरातच कुठेतरी टाकला जातो. पावसाळ्यात हाच कचरा वाहून परत गावात येतो. अशा समस्येमुळे अनेक ठिकाणी दुर्गंधी पसरून नागरिकांना विविध साथरोगांना सामोरे जावे लागते. याबाबत गेल्या काही दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेने घंटागाड्यांसाठी जिल्हा नियोजन समितीने नाविन्यपूर्ण योजनेतून निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. समितीने ती मान्य करून निधी उपलब्ध करून दिला. त्यानुसार ६२ गावांमध्ये घंटागाडी खरेदी करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला.ही वाहने खरेदी करण्यासाठी ई-निविदा काढण्यात आली. त्यात चार एजन्सींनी सहभाग नोंदविला होता. त्यापैकी कमी दराच्या एजन्सीला निश्चित करण्यात आले. (प्रतिनिधी)जिल्हा परिषदेच्या वतीने ६२ ग्रामपंचायतींना निधी उपलब्ध करून देण्यात आला असला तरी अन्य ग्रामपंचायतींनाही टप्प्याटप्प्याने हा निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती जि.प. अध्यक्ष तुकाराम जाधव यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली. ४स्वच्छता अभियानाच्या दृष्टीने या घंटागाड्यांचा वापर होऊन कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची सुविधा ग्रामपंचायतींना उपलब्ध करून देण्यात आल्याचेही जाधव यांनी सांगितले.