शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

६ वर्षांत स्वाईन फ्लूने ५८ रुग्णांचा मृत्यू

By admin | Updated: January 23, 2015 00:57 IST

औरंगाबाद : शहरात गेल्या वर्षभरानंतर पुन्हा एकदा स्वाईन फ्लूबाबत चर्चा सुरू झाली आहे. उपचार सुरू असताना एका स्वाईन फ्लू रुग्णाचा बुधवारी मृत्यू झाल्याने

औरंगाबाद : शहरात गेल्या वर्षभरानंतर पुन्हा एकदा स्वाईन फ्लूबाबत चर्चा सुरू झाली आहे. उपचार सुरू असताना एका स्वाईन फ्लू रुग्णाचा बुधवारी मृत्यू झाल्याने स्वाईन फ्लूने पुन्हा एकदा डोके वर काढल्याची भीती व्यक्त केली जात आहे. २००९ ते २०१४ या सहा वर्षांच्या कालावधीत १६५ रुग्णांपैकी ५८ रुग्णांचा मृत्यू झाला होता, तर १०७ रुग्ण पूर्णपणे बरे झाले होते. ९५ टक्के रुग्ण बरे होत असल्याने स्वाईन फ्लूबाबत घाबरण्याचे कारण नसल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.वातावरणातील बदलामुळे सर्दी, पडसे, खोकला असा त्रास होण्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता अधिक निर्माण होते. थंड वातावरण स्वाईन फ्लू होण्यास हातभार लावत असल्याचे दिसून येते. स्वाईन फ्लू पॉझिटिव्ह असतानाही वेळेवर उपचार मिळाल्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अधिक असल्याचे चित्र गेल्या काही वर्षांतील आकडेवारीवरून दिसून येते. ४ ते ५ दिवसांच्या कालावधीतील उपचारात रुग्ण ठणठणीत बरे होतात. गंभीर अवस्थेत दाखल झालेल्या रुग्णांना व्हेंटिलेटर लावावे लागते. अशा वेळी रुग्णाचे प्राण वाचविण्यासाठी डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करतात आणि त्यात त्यांना यशही येते.४स्वाईन फ्लूबाबत घाबरण्याचे कारण नसून वेळीच योग्य ती खबरदारी घेतली पाहिजे. स्वाईन फ्लूचे ९५ टक्के रुग्ण बरे होतात. सर्दी, खोकला, धाप लागणे, अशी लक्षणे असतील तर वेळीच डॉक्टरांकडे जाऊन उपचार घ्यावेत. स्वत:ला किंवा आजूबाजूंच्या लोकांना खोकला येत असेल, तर अशा वेळी तोंडावर रुमाल धरावा, असे आवाहन घाटी रुग्णालयाच्या मेडिसीन विभागप्रमुख डॉ. मंगला बोरकर यांनी केले.