शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
2
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
3
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
4
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
5
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
6
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
7
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
8
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
9
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
10
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
11
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
12
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
13
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
14
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
15
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
16
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
17
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
18
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
19
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
20
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...

६ वर्षांत स्वाईन फ्लूने ५८ रुग्णांचा मृत्यू

By admin | Updated: January 23, 2015 00:57 IST

औरंगाबाद : शहरात गेल्या वर्षभरानंतर पुन्हा एकदा स्वाईन फ्लूबाबत चर्चा सुरू झाली आहे. उपचार सुरू असताना एका स्वाईन फ्लू रुग्णाचा बुधवारी मृत्यू झाल्याने

औरंगाबाद : शहरात गेल्या वर्षभरानंतर पुन्हा एकदा स्वाईन फ्लूबाबत चर्चा सुरू झाली आहे. उपचार सुरू असताना एका स्वाईन फ्लू रुग्णाचा बुधवारी मृत्यू झाल्याने स्वाईन फ्लूने पुन्हा एकदा डोके वर काढल्याची भीती व्यक्त केली जात आहे. २००९ ते २०१४ या सहा वर्षांच्या कालावधीत १६५ रुग्णांपैकी ५८ रुग्णांचा मृत्यू झाला होता, तर १०७ रुग्ण पूर्णपणे बरे झाले होते. ९५ टक्के रुग्ण बरे होत असल्याने स्वाईन फ्लूबाबत घाबरण्याचे कारण नसल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.वातावरणातील बदलामुळे सर्दी, पडसे, खोकला असा त्रास होण्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता अधिक निर्माण होते. थंड वातावरण स्वाईन फ्लू होण्यास हातभार लावत असल्याचे दिसून येते. स्वाईन फ्लू पॉझिटिव्ह असतानाही वेळेवर उपचार मिळाल्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अधिक असल्याचे चित्र गेल्या काही वर्षांतील आकडेवारीवरून दिसून येते. ४ ते ५ दिवसांच्या कालावधीतील उपचारात रुग्ण ठणठणीत बरे होतात. गंभीर अवस्थेत दाखल झालेल्या रुग्णांना व्हेंटिलेटर लावावे लागते. अशा वेळी रुग्णाचे प्राण वाचविण्यासाठी डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करतात आणि त्यात त्यांना यशही येते.४स्वाईन फ्लूबाबत घाबरण्याचे कारण नसून वेळीच योग्य ती खबरदारी घेतली पाहिजे. स्वाईन फ्लूचे ९५ टक्के रुग्ण बरे होतात. सर्दी, खोकला, धाप लागणे, अशी लक्षणे असतील तर वेळीच डॉक्टरांकडे जाऊन उपचार घ्यावेत. स्वत:ला किंवा आजूबाजूंच्या लोकांना खोकला येत असेल, तर अशा वेळी तोंडावर रुमाल धरावा, असे आवाहन घाटी रुग्णालयाच्या मेडिसीन विभागप्रमुख डॉ. मंगला बोरकर यांनी केले.