शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसेची ताकद मुंबईत जास्त; राज ठाकरेंच्या दाव्यावर CM फडणवीसांनी आकेडवारीच दिली
2
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
3
ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून आली...! अ‍ॅप्पल, टेस्लानंतर या कंपनीची भारतात एन्ट्री, बिग टेकने घोषणा केली...
4
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
5
राहुल गांधींवर खोटी साक्ष दिल्याचा आरोप, सावरकरांच्या पणतूने  कोर्टात दिलेल्या अर्जाने अडचणी वाढणार? 
6
गोकुळाष्टमीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status ला शेअर करा;कृष्ण भक्तांना द्या हार्दिक शुभेच्छा!
7
सचिन तेंडुलकरहून ५ वर्षांनी मोठी अंजली; आता अर्जुनची होणारी पत्नीही मोठीच...किती आहे अंतर?
8
बाजारात संमिश्र कल! विप्रो-इन्फोसिस वधारले; पण, टाटासह 'या' स्टॉक्समध्ये मोठी घसरण
9
मतदार यादीतून काढलेल्या ६५ लाख लोकांची नावे सार्वजनिक करा; SC चे निवडणूक आयोगाला निर्देश
10
Rapido देणार Zomato, Swiggy ला टक्कर, पोहोचवणार जेवण; काय आहे कंपनीचा प्लान?
11
'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लान सांगितला
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मुळे कंपनीची चांदी! शेअरमध्ये १०% वाढ, ३ महिन्यात ६२ टक्के परतावा
13
ट्रम्प यांनी डेड इकॉनॉमी म्हटलेलं, आता अमेरिकेच्याच एजन्सीनं भारताचं रेटिंग केलं अपग्रेड
14
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
15
'लव्ह अँड वॉर', 'अल्फा'च नाही तर आलिया भट आणखी एका सिनेमाच्या तयारित, वाचा सविस्तर
16
गोकुळाष्टमी स्पेशल: गोकुळाष्टमीला करा सात्त्विक चवीचा पंचामृत केक; घरचे बालगोपाळ होतील खुश
17
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
18
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
19
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
20
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...

५७ ग्रा.पं.ना ‘रेडकार्ड’!

By admin | Updated: June 30, 2014 00:37 IST

संजय तिपाले , बीड जिल्ह्यातील तब्बल ३१४ गावांमधील ग्रामस्थांना दूषित पाण्यावरच तहान भागवावी लागते़ त्यापैकी ५७ ग्रामपंचायती तीव्र जोखमीच्या असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे़

संजय तिपाले , बीडजिल्ह्यातील तब्बल ३१४ गावांमधील ग्रामस्थांना दूषित पाण्यावरच तहान भागवावी लागते़ त्यापैकी ५७ ग्रामपंचायती तीव्र जोखमीच्या असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे़ त्यामुळे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने या ग्रामपंचायतींना ‘रेडकार्ड’ बजावले आहे़जून महिना संपला तरी अद्याप पुरेसा पाऊस नाही़ त्यामुळे पाणीटंचाईचा प्रश्न दिवसेंदिवस उग्र स्वरुप धारण करत आहे़ दुसरीकडे उपलब्ध पाण्याचे काही स्त्रोत दूषित आहेत़ त्यामुळे नाईलाजाने सामान्यांवर दूषित पाण्यावरच तहान भागविण्याची वेळ आली आहे़ मे महिन्यात आरोग्य विभागाने ग्रामीण भागात ११३ ठिकाणी पाणी नमुने घेतले़ त्यापैकी ३१४ नमूने दूषित असल्याचे आढळून आले़ त्याचे प्रमाण २८ टक्के इतके आहे़ पाणी नमूने दूषित आढळलेल्या ठिकाणी उपाययोजना करण्याच्या सूचना सर्व गटविकास अधिकाऱ्यांना दिल्या आहेत़ काय आहेत कार्ड?एखाद्या गावातील ७० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त लोक दूषित पाणी पित असतील तर अशा ग्रामपंचायतींना तीव्रजोखमीचे गाव समजले जाते़ त्यांना रेडकार्ड दिले जाते़ जिल्ह्यात ५७ ग्रा़पं़ ना रेडकार्ड दिले आहे़ ३१ ते ६० टक्के नागरिक दूषित पाणी पित असतील तर मध्यम जोखमीचे गाव मानले जाते़ अशा ग्रा़पं़ ना पिवळे कार्ड दिले जाते़ ० ते ३० टक्के लोक दूषित पाण्यावर तहान भागवत असतील तर अशी गावे सौम्य जोखीम या गटात मोडतात़ त्यांना हिरवे कार्ड दिले जाते, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ़ गोवर्धन डोईफोडे यांनी दिली़ या कार्डवर उपाययोजनांची माहिती असते़वैयक्तिक काळजी महत्त्वाचीजिल्हा प्रजनन व बालस्वास्थ्य अधिकारी डॉ़ एच़ व्ही़ वडगावे म्हणाले, पाणी दूषित असले तरी ते शुद्ध करुन पिण्यासाठी वैयक्तिक उपाययोजना कराव्यात़ गढूळ पाण्यात तुरटी फिरवावी़ १० लिटर पाण्यात पाच थेंब लिक्विड क्लोरिन टाकावे़ गरोदर माता, वृद्ध व एक वर्षांपर्यंतच्या बाळांना पाणी उकळून व गाळूनच द्यावे असा सल्लाही त्यांनी दिला़जलसुरक्षकांना सूचनाग्रामीण भागातील लोकांना शुद्ध पाणी पिण्यासाठी उपलब्ध करुन देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न आहेत़ जल सुरक्षकांना याबाबत सूचना दिल्या असून पाणीनमुने नियमित तपासण्यास सांगितले आहे़ ग्रामपंचायतींनीही योग्य ती काळजी घेणे आवश्यक असल्याची प्रतिक्रिया भारत निर्मल अभियानचे जिल कार्यक्रम व्यवस्थापक एस़ बी़ वाघमारे यांनी दिली़कार्यशाळांतून उपाययोजनापाणी गुणवत्तेच्या संदर्भाने नुकतीच जिल्हास्तरीय कार्यशाळा घेतली़ त्यानंतर आता १ जुलैपासून तालुकास्तरीय कार्यशाळा घेण्यात येतील़ ५७ ग्रा़पं़ ना लालकार्ड दिले आहेत़ त्यांना उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत़ प्रत्येक गटविकास अधिकाऱ्यांकडून अहवाल मागवून घेतला जाईल, असे पंचायतचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नईमोद्दीन कुरेशी यांनी सांगितले़ग्रा.पं.ने करावयाच्या उपाययोजना...!दूषित पाणी असलेल्या ग्रामपंचायतींनी शुद्धीकरणासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्हा साथरोग वैद्यकीय अधिकारी डॉ़ पी़ के़ पिंगळे यांनी दिल्या़ पाणी वाहते करावे, विंधनविहिरींमध्ये ब्लिचींग पावडर टाकावे, दुरुस्ती कामे करावीत, स्त्रोतांच्या ५० फूट अंतरापर्यंतचा परिसर स्वच्छ ठेवावा, तेथे पाणी साचू देऊ नये अशी खबरदारी घेण्याचे आवाहन त्यांनी केले़दूषित पाण्याने होणारे आजारदूषित पाणी शरीराला घातक आहे़ गॅस्ट्रो, कॉलरा, काविळ यासारखे जलजन्य आजार होण्याची दाट शक्यता असते़ यात एखाद्या रुग्णाचा मृत्यू होण्याचीही भीती असते़तालुका निहाय असे बजावले कार्डतालुकालाल कार्डपिवळे कार्ड हिरवे कार्डअंबाजोगाई१४५५ ३१आष्टी ००१९ १०३बीड०९५३ १११धारुर०० १९ ३६गेवराई१२९३ २७केज००२३ ९०माजलगाव१४५३ २३परळी००३९ ५२पाटोदा ०७१९ ३४शिरुर०१३९ १२वडवणी०० १३ २३एकूण ५७४२५ ५४२