शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

५२ गावांत साथीच्या आजारांचा उद्रेक

By admin | Updated: October 31, 2014 00:36 IST

बीड : केवळ धूर फवारणी करणे म्हणजे साथीच्या आजाराला प्रतिबंध असे होत नाही. यासाठी जाणीव जागृती बरोबरच साथ रोगाचा फैलाव होण्यापूर्वी जिल्ह्यातील अबेटिंग करणे,

बीड : केवळ धूर फवारणी करणे म्हणजे साथीच्या आजाराला प्रतिबंध असे होत नाही. यासाठी जाणीव जागृती बरोबरच साथ रोगाचा फैलाव होण्यापूर्वी जिल्ह्यातील अबेटिंग करणे, स्वच्छतेसाठी उपक्रम राबविणे, आरोग्य यंत्रणा व जिल्हा हिवताप कार्यालय यांनी सतर्क रहाणे आवश्यक आहे. मात्र यापैकी कोणतीही उपाय योजना बीड जिल्हयातील अकरा तालुक्यांमध्ये झालेली नाही. याचाच परिणाम म्हणून जिल्हयात ५२ पेक्षा जास्त गावे तापीने फणफणलेले आहेत. साथ रोगांचा फैलाव झाल्यावर आरोग्य विभाग व जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले. यामध्ये जिल्हयातील चार जणांचा डेंग्यू चिकुन गुनियाने बळी गेला आहे. जिल्हयातील साथीचे आजार व आरोग्य यंत्रणा यांचा घेतलेला आढावा़अनिल महाजन ल्ल धारूरतालुक्यातील आरोग्य यंत्रणेचा कारभार प्रभारी अधिकाऱ्यांवरच सुरू आहे. तीन ते चार महिन्यापूर्वी साथीचे आजार येऊ नयेत, यासाठी जाणीव जागृती करण्याचे काम होणे आवश्यक होते. मात्र तालुक्यातील आरोग्य विभागाने त्यावेळी दुर्लक्ष केले. परिणामी डेंग्यूमुळे तालुक्यातील सोनीमोहा येथील पुनम लहू तोंडे या ७ वर्ष वयाच्या चिमुकलीचा बळी गेला.तालुक्यातील आरणवाडी, चोरंबा, घागरवडा, सोनीमोहा, धुनकवड, पहाडी पारगाव, काठेवाडी, कचरवाडी, सुरनवाडी, कारी आदी गावांमध्ये मागील अनेक दिवसापासून डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने साथ रोगांनी डोके वर काढले आहे. तालुक्यातील दहा जणांच्या रक्ताचे नुमने तपासणीसाठी पाठविण्यात आलेले आहे. धारूर शहरासह अन्य ठिकाणच्या प्रा. आ. केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे प्रभारी आहेत. याचा परिणाम आरोग्य सेवेवर होत आसल्याचे पहावयास मिळत आहे. भोगलवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी देखील प्रभारी आहेत. यामुळे या भागात मागील दोन महिन्यात साथीच्या आजारांचा फैलाव होऊ नये यासाठी कसलीच उपायोजना झालेली नाही.तालुक्यातील ग्रामीण भागातील ग्रामस्थांना प्राथमिक आरोग्य केंद्रावर दर्जेदार उपचार मिळत नसल्याने खाजगी दवाखान्यांचा सहारा गोर-गरीब रूग्णांना घ्यावा लागत आहे.विलास भोसले ल्ल पाटोदातालुक्यातील सहा रूग्णांचे रक्त नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे दिले होते. यामध्ये सहा पैकी चार जणांना डेंग्यूची लागण झाली असल्याचे समोर आले आहे. लागण झालेले रूग्ण करंजवन, येवलवाडी, पाटोदा व सोनेगांव येथील रहिवाशी आहेत. पाटोदा तालुक्यात चार प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. यामध्ये आमळनेर, वाहली, नायगाव व डोंगरकिन्हीचा समावेश आहे. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रावर दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे मंजूर आहेत. परंतु पाटोदा तालुक्यातील चारही प्राथमिक आरोग्य केंद्रावर प्रत्येक एक वैद्यकीय अधिकाऱ्याचे पद मागील अनेक महिन्यांपासून रिक्त आहेत. यामुळे ग्रामीण भागातील जनतेला चांगली आरोग्य सेवा मिळत नसल्याची तक्रार तालुक्यातील ग्रामस्थांनी केली आहे़