शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
2
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
3
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
4
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
5
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
6
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
7
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
8
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
9
"त्यांनी माझे गाल ओढले, दंडाला चिमटे काढले...", हळदीकुंकूच्या कार्यक्रमाला गेलेल्या प्रिया बेर्डेंना चाहत्यांकडून आलेला धक्कादायक अनुभव
10
क्रिकेटरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी दिसणार सलमान खानच्या 'बिग बॉस १९'मध्ये?, जाणून घ्या याबद्दल
11
"भारत-पाक संघर्ष अणुयुद्धात बदलला असता, मी होतो म्हणून..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा 'तो' दावा कायम
12
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
13
जन्माष्टमी २०२५: ‘या’ राशींवर श्रीकृष्ण कृपा, पैसे कमी पडत नाहीत; सुबत्ता-वैभव-भरभराट लाभते!
14
राजा रघुवंशीच्या घरी अचानक पोहोचला पोलिसांच्या वेशातील व्यक्ती; कुटुंबाला आला संशय, तपास करताच धक्कादायक सत्य उघड
15
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
16
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
17
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
18
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
19
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
20
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ

५०५ जण तापाने फणफणले !

By admin | Updated: August 8, 2014 00:33 IST

कळंब : जिल्हाभरात साथीच्या आजाराने लहान बालकांसोबतच वृद्धही हैराण झाले आहेत. कन्हेरवाडी येथील चिकुन गुणियाची साथ आटोक्यात येते

कळंब : जिल्हाभरात साथीच्या आजाराने लहान बालकांसोबतच वृद्धही हैराण झाले आहेत. कन्हेरवाडी येथील चिकुन गुणियाची साथ आटोक्यात येते ना येते तोच शेळका धानोरा येथील एका मुलीचा डेंग्युसदृश्य आजाराने गुरूवारी बळी घेतला. त्यामुळे आरोग्य यंत्रणा हादरली आहे. तालुक्यातील सहा प्राथमिक आरोग्य केंद्रात मिळून बुधवारी दिवसभर सर्दी, खोकला आणि तापाचे तब्बल ५०५ रूग्ण दाखल झाल्याची माहिती आरोग्य यंत्रणेकडून मिळाली.कळंब तालुक्यात गत महिनाभरात एकही मोठा पाऊस झालेला नाही. शिवाय सततच्या ढगाळ हवामानामुळे पुरेसा सूर्यप्रकाशही राहिलेला नाही. त्यामुळे वातावरण कोंदट बनले असून डासांची उत्पत्तीही वाढली आहे. स्थानिक ग्रामपंचायतींकडून उपाययोजनांकडे दुर्लक्ष केले जात असल्यामुळेच आता साथीच्या आराने डोके वर काढले आहे. कन्हेरवाडी येथे तीन-चार दिवसांपूर्वीच चिकुन गुनियाचा उद्रेक झाला होता. अनेक रूग्ण या आजाराने त्रस्त झाले आहेत. असे असतानाच गुरूवारी शेळका धानोरा येथे डेंग्यूसदृश्य आजाराने पूजा किसण पांचाळ या पंधरा वर्षीय तरूणीचा मृत्यू झाला. मंगळवारी सदर मुलीला ताप आला होता. लागलीच उपचारासाठी तिला एका खाजगी रूग्णालयात भर्ती करण्यात आले. परंतु, बुधवारी तिच्या अजारात वाढ झाल्याने अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय रूग्णालयात दाखल केले. या ठिकाणी तिचा मृत्यु झाला. दरम्यान, दिवसागणिक साथीच्या आजाराने त्रस्त झालेल्या रूग्णांची संख्या वाढू लागली आहे. यामध्ये सर्दी, खोकला आणि तापाच्या रूग्णांची संख्या अधिक असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे. तालुुक्यातील सहा प्राथमिक आरोग्य केंद्रात बुधवारी ५०५ बाह्य रूग्णांची नोंद झाली आहे. यामध्ये शिराढोण प्राथमिक आरोग्य केंद्रात १४१, ईटकूर १०४, येरमाळा १०८, दहिफळ ७१, मोहा ४५ तर मंगरूळ केंद्रात ३६ बाह्य रूग्णांची नोंद झाली आहे. (वार्ताहर)कन्हेरवाडी येथे सोमवारपासून चिकुन गुणियाची साथ गुरूवारी आटोक्यात आली आहे. ३३ रूग्णांव्यतिरिक्त अन्य एकही नवीन रूग्ण आढळून आला नसल्याने ही साथ आटोक्यात आल्याचा दावा आरोग्य विभागाने केला आहे. असे असले तरी आणखी तीन दिवस डॉक्टरांचे पथक गावामध्ये तैनात असणार आहे, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.साथीच्या आजाराची लागण होवू नये, यासाठी डासांचे निर्मुलन करणे फार गरजेचे आहे. यासाठी प्रत्येकाने आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळवा, असे आवाहन डॉ. पुरूषोत्तम पाटील यांनी केले. तसेच जास्त पाणीसाठा करू नये, नाल्या व परिसराची साफसफाई करावी, असेही ते म्हणाले.