शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
4
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
5
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
6
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
7
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
8
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
9
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
10
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
11
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
12
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
13
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
14
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
15
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
16
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
17
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
18
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
19
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
20
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल

धरपकड मोहिमेत ५० जण ताब्यात

By admin | Updated: June 10, 2014 00:59 IST

औरंगाबाद : आगामी विधानसभा आणि महापालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून महापुरुष तसेच देवदेवतांची विटंबना करण्याचा हा काही जणांचा पूर्वनियोजित कट असल्याचा अंदाज पोलीस सूत्रांनी वर्तविला आहे.

औरंगाबाद : आगामी विधानसभा आणि महापालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून महापुरुष तसेच देवदेवतांची विटंबना करण्याचा हा काही जणांचा पूर्वनियोजित कट असल्याचा अंदाज पोलीस सूत्रांनी वर्तविला आहे.फेसबुक, व्हॉटस्अप, टिष्ट्वटर, यू-ट्यूब यासारख्या सोशल मीडियाबाबत आता नागरिक जागरूक झाले आहेत. कायदा व सुव्यवस्था बिघडवून शहरातील शांततेला गालबोट लावण्याचे समाजकंटकांचे षड्यंत्र नागरिक ओळखून आहेत. परिणामी, आपले ईप्सित साध्य करण्यासाठी आगामी काळात सोशल मीडियाशिवाय अन्य कोणत्या तरी दुसऱ्या माध्यमातून विटंबनेची मोठी घटना करून शहरात जातीय तणाव निर्माण केला जाऊ शकतो. त्यादृष्टीने शहरात पोलीस यंत्रणा अलर्ट करण्यात आली आहे. सर्व पोलीस ठाण्यांचे अधिकारी आपल्या हद्दीतील सर्व पक्ष-संघटनांचे कार्यकर्ते व प्रतिष्ठित नागरिकांची बैठक घेऊन शांतता अबाधित ठेवण्याचे आवाहन करीत आहेत. समाजकंटकांचे षड्यंत्र हाणून पाडण्यासाठी पोलीस आयुक्त राजेंद्र सिंह यांनी नागरिकांना शहरात संयम राखण्याचे आवाहन केले आहे. इंटरनेटवरून विटंबनेचे प्रकार केले जात आहेत. त्याचे मूळ शोधणे अवघड असले तरी समाजकंटकांचा हेतू काय आहे, तो आपण ओळखला पाहिजे. प्रतिक्रिया व्यक्त करण्यापेक्षा त्याकडे दुर्लक्ष करणेच समाजहितासाठी योग्य राहील, असे ते म्हणाले.फेसबुकवर महापुरुषांचे बदनामीकारक चित्र व मजकूर प्रसारित केल्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून शहरात दगडफेक व बळजबरीने दुकाने बंद करण्याचे प्रयत्न झाले. शहरातील अनेक भागांत पोलिसांनी शनिवारी रात्रीपासून बंदोबस्त लावला होता. सलग दोन दिवस पोलिसांनी खडा पहारा देऊन गडबड करणाऱ्या कार्यकर्त्यांवर पाळत ठेवली. तरीही काल रविवारी दिवसभर विविध भागांत कार्यकर्ते रस्त्यावर येऊन घोषणाबाजी करीत होते. संपूर्ण शहरात अफवांचे पेव फुटले होते. काल रात्री ११.४५ वाजेच्या सुमारास पंचवटी चौकात वाहनांवर दगडफेकही झाली. पोलिसांनी विविध भागांतून गोंधळ घालणाऱ्या ५० कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. फेसबुकवर महापुरुषांची विटंबना केल्याच्या निषेधार्थ शहर व परिसरातील वातावरण बिघडविणाऱ्या ५० पेक्षा जास्त तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस आयुक्त राजेंद्र सिंह यांनी दिली. दरम्यान, आज सोमवारी छावणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जांभाळा येथील एक घटना वगळता शहरात सर्वत्र शांतता होती. जांभाळा येथे काही स्थानिक कार्यकर्त्यांनी आठवडी बाजार उधळून लावला. गावातील दुकाने बळजबरीने बंद केली. या प्रकरणी छावणी पोलिसांनी घटनास्थळी वेळीच पोहोचून ७ कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध कारवाई केली.