शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

४४६ शाळा संरक्षक भिंतीविना

By admin | Updated: May 8, 2014 23:30 IST

उस्मानाबाद : शिक्षणाचा हक्क कायद्यानुसार (आरटीई) प्रत्येक शाळेने दहा निकषाची पूर्तता करणे बंधनकारक आहे.

 उस्मानाबाद : शिक्षणाचा हक्क कायद्यानुसार (आरटीई) प्रत्येक शाळेने दहा निकषाची पूर्तता करणे बंधनकारक आहे. असे असले तरी जिल्हा परिषदेच्या सुमारे ४६६ शाळांना आजही संरक्षक भिंती नसल्याने अशा शाळांचा परिसर मोकाट जनावंरासाठी कुरण बनला आहे. त्याचप्रमाणे २८३ शाळांमध्ये कीचन शेडच नसल्याने पोषण आहार उघड्यावर शिजविण्याची वेळ सर्व संबंधितांवर ओढावली आहे. शिक्षणाचा हक्क कायद्यानुसार प्रत्येक शाळेला पक्की इमारत, मुख्याध्यापकांसाठी स्वतंत्र खोली, प्रत्येक शिक्षकासाठी एक वर्गखोली, अपंगाकरिता रॅम्पची सोय, मुला-मुलींसाठी स्वतंत्र प्रसाधनगृह, पाणी, कीचनशेड, संरक्षक भिंत आणि क्रीडांगण या दहा भौतिक सुविधा असणे बंधनकारक आहे. गतवर्षी अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याची सुविधा नव्हती. ही बाब शासनाने गांभिर्याने घेतल्यानंतर तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी एस.एल. हरिदास यांनी युद्ध पातळीवर ही कामे पूर्ण करुन घेतली होती. त्यामुळेच यावेळी जिल्ह्यातील सर्वच्या सर्व १ हजार १२९ शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची सुविधा निर्माण होवू शकली. असे असले तरी अन्य निकष मात्र शंभर टक्के शाळांनी पूर्ण केल्याचे दिसत नाही. मध्यंतरी बिहारसह काही राज्यात पोषण आहारातून विषबाधा झाल्याच्या घटना घडल्या होत्या. त्यावेळी जिल्ह््यातील शाळांच्या कीचनशेडचा प्रश्न ऐरणीवर आला होता. काही दिवस यावर चर्चा झाली. उपाययोजना करण्याचे ठरले. मात्र हा प्रश्न कालांतराने मागे पडला. त्यामुळेच की काय आजही जिल्ह्यातील २८३ शाळांमध्ये कीचनशेडची सुविधा नाही. तसेच एका शाळेला इमारत नाही. मुख्याध्यापकांसाठी स्वतंत्र खोली बंधनकारक आहे. असे असले तरी २११ शाळांमध्ये मुख्याध्यापकांसाठी स्वतंत्र खोली नसल्याचे समोर आले आहे. त्याचप्रमाणे २१० शिक्षकांसाठी स्वतंत्र वर्ग खोली नाही. (प्रतिनिधी) वर्गामध्ये जाताना अपंगांना त्रास होऊ नये, म्हणून प्रत्येक शाळेला रॅम्प बांधणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र आजही ४६ शाळांमध्ये रॅम्पची सुविधा नाही. ८ शाळांमध्ये मुलींसाठी तर ४ शाळांमध्ये मुलांसाठी स्वतंत्र प्रसाधनगृह बांधलेले नाही. एका शाळेला क्रीडा मैदान नाही.