शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

वर्षभरात ४३ अर्भक रस्त्यावर

By admin | Updated: December 15, 2014 00:50 IST

औरंगाबाद ; जन्मदाते जिवंत असूनही मागील वर्षभरात ४३ बाळांना अनाथ म्हणून जगावे लागत आहे.

औरंगाबाद ; जन्मदाते जिवंत असूनही मागील वर्षभरात ४३ बाळांना अनाथ म्हणून जगावे लागत आहे. त्या अभागी मातेच्या पोटी जन्म घेतला यात त्या बालकांचा काय दोष; पण आई असूनही तिच्या दुधाला ही बालके आज मुकली आहेत. एवढा निष्ठुरपणा, की बाळाला कचराकुंडी, रस्त्यावर, शेतात, घाटीत बेवारस अवस्थेत टाकून १८ मातांनी पळ काढला, तर २५ मातांनी आपली जबाबदारी झटकत पोटच्या गोळ्याला शासनाच्या पदरात टाकून दिले. अनैतिक संबंधातून जन्माला आलेल्या बाळांना टाकून दिल्याच्या या घटना कोणत्या मेट्रो सिटीत नव्हे, तर औरंगाबाद जिल्ह्यात घडल्या आहेत. आणखी धक्कादायक बाब म्हणजे वर्षभरात १५ मुलींवर विवाहापूर्वीच मातृत्व लादले गेले आहे. पण पोलिसात तक्रार नसल्याने आजही दोषी उजळ माथ्याने समाजात वावरत आहेत. शालेय मुलगी, तरुणी, महिला मग ती शहरातच काय ग्रामीण भागातही सुरक्षित नाही हे या घटनांवरून प्रखरतेने जाणवत आहे. प्रेमाच्या जाळ्यात ओढून किंवा लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केल्याच्या काही घटनाच समोर येतात; पण कुटुंबाच्या इज्जतीपायी अनेक प्रकरणे दाबली जात आहेत. गर्भधारणा झाल्यावर ‘तो मी नव्हेच’ असे प्रियकराने हात झिडकारेपर्यंत वेळ निघून गेलेली असते. जन्म दिल्यानंतर आईने बाळाला कमीत कमी ६ महिने तरी दूध पाजणे गरजेचे असते; पण कुटुंबाची बदनामी होईल या भीतीने नवजात अर्भकांना टाकून दिले जात आहे. मागील वर्षभरात जिल्ह्यात विविध ठिकाणी १८ बालके बेवारस अवस्थेत टाकून दिलेली पोलिसांना आढळून आली.