शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारच ‘माळेगाव’चे नवे कारभारी; रंजनकुमार तावरे पराभूत, ९ उमेदवार विजयी घोषित
2
मनसे-उद्धवसेनेची संयुक्त पत्रकार परिषद; अरविंद सावंत, नितीन सरदेसाई हजर राहणार, चर्चांना उधाण
3
ब्रिटिश नेव्हीचे फायटर जेट अजूनही केरळमध्येच! घरवापसीसाठी का लागतोय इतका वेळ?
4
China Rare Earth Magnet: चीननं ठेंगा दाखवल्यानंतर सरकारला आली जाग; आता देशातच होणार रेअर अर्थ मॅग्नेटचं उत्पादन
5
इराणच्या मिसाईल हल्ल्यांनी इस्राइलमध्ये हाहाकार; ३० हजारांहून अधिक घरे झाली उद्ध्वस्त!
6
Ax-4 Mission: अवकाश भरारी घेण्यापूर्वी शुभांशू शुक्ला यांनी ऐकलं हृतिक रोशनचं गाणं, नेमकं काय आहे कनेक्शन?
7
एमबीए, नोकरी, मग संन्यास... पण, नशिबाने पुन्हा आणले संसारात; तरुणाने उभं केलं १२५ कोटींचं साम्राज्य!
8
१ जुलैपासून 'या' वाहनांना राजधानीत पेट्रोल, डिझेल, CNG मिळणे बंद; सरकारचा मोठा निर्णय
9
१२ लाख लोकसंख्या, भारतापासून ५ हजार किमी दूर...PM मोदी या छोट्या देशाला इतके महत्त्व का देताहेत?
10
अंतराळाच्या दिशेने रवाना झालेल्या शुभांशू शुक्ला यांनी पाठवला पहिला संदेश, म्हणाले, माझ्या देशवासियांनो...  
11
हेच पहायचे बाकी होते...! लॅपटॉपलाही चार्ज करणारा स्मार्टफोन भारतात लाँच; लेटेस्ट प्रोसेसर अन् किंमतही कमी, प्रश्नच मिटला...
12
राजा रघुवंशी हत्या प्रकरणात 'या' ५ गोष्टी अजूनही गायब! आरोपींपैकी कोणी केले महत्त्वाचे पुरावे नष्ट?
13
गाणी ऐकण्यापासून रोखताच मुलगा बनला राक्षस; जन्मदात्या आईलाच संपवले, त्यानंतर मृतदेह...
14
"सरकार येतील जातील पण...", हिंदी भाषा सक्तीवरुन सयाजी शिंदेंची प्रतिक्रिया चर्चेत
15
अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांची पत्नी आहे डॉक्टर, शाळेत शिकतानाच पडले प्रेमात, अशी आहे लव्हस्टोरी
16
दिग्गज फार्मा कंपनी १ शेअरवर देणार १६५ रुपयांचा बंपर डिविडेंड; कोणता आहे स्टॉक, काय आहे रेकॉर्ड डेट? चेक करा
17
ही AI मशीनगन चालवण्यासाठी माणसाची गरज नाही! स्वतःच शत्रूला ओळखणार अन् गोळ्याही घालणार
18
Google Chrome: डाउनलोड करणं दूरच राहिलं, साधं सर्चही करता येणार नाही; 'या' फोन वापरकर्त्यांना इशारा!
19
बापरे! इराणमधील ४०० किलो युरेनियम गायब; अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेन्सनी अखेर मान्य केले
20
Gautam Gambhir Jasprit Bumrah, IND vs ENG: जसप्रीत बुमराहबद्दल गौतम गंभीरने केलेल्या विधानामुळे वाढलं टीम इंडियाचे 'टेन्शन', आता पुढे काय?

चारशे गावांमध्ये ‘जलयुक्त शिवार’ला सुरुवातही नाही

By admin | Updated: April 1, 2015 01:04 IST

औरंगाबाद : राज्य सरकारचे महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार अभियान सुरूहोऊन दोन महिने उलटले; पण आतापर्यंत विभागातील १६८२ पैकी बाराशे गावांमध्ये जलसंधारणाच्या कामांना सुरुवात झाली

औरंगाबाद : राज्य सरकारचे महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार अभियान सुरूहोऊन दोन महिने उलटले; पण आतापर्यंत विभागातील १६८२ पैकी बाराशे गावांमध्ये जलसंधारणाच्या कामांना सुरुवात झाली आहे. चारशेपेक्षा जास्त गावांमध्ये अजूनही कोणतेही काम सुरू झालेले नाही. मराठवाड्यासह राज्यातील इतरही काही जिल्ह्यांमध्ये सातत्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे जलसंधारणाची जास्तीत जास्त कामे करून संपूर्ण राज्य दुष्काळमुक्त करण्यासाठी सरकारने जलयुक्त शिवार अभियान सुरू केले आहे. या अभियानासाठी पहिल्या टप्प्यात मराठवाड्यातील १६८२ गावांची निवड करण्यात आली आहे. हे अभियान सुरू होऊन दोन महिने उलटले तरी अद्याप चारशेपेक्षा जास्त गावांमध्ये जलसंधारणाची कामे प्रशासनाकडून सुरू झालेली नाहीत. उर्वरित बाराशे गावांमध्ये गाळ काढणे, कंपार्टमेंट बंडिंग, नालाबंडिंग, पाझर तलाव यांसारखी कामे सुरू झाली आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात या अभियानासाठी २२८ गावांची निवड करण्यात आली आहे. त्यापैकी ३२ गावांमध्ये अजून एकही काम सुरू झालेले नाही. जालना जिल्ह्यात याहीपेक्षा वाईट परिस्थिती आहे. येथे २०९ गावांपैकी १०६ गावांमध्येच कामे सुरू होऊ शकली आहेत. बीड जिल्ह्यातही २७८ पैकी ६३ गावांमध्ये कोणतीही कामे सुरू झालेली नाहीत. परभणी जिल्ह्यात १७० गावे निवडण्यात आलेली आहेत. याठिकाणी मात्र सर्व गावांमध्ये कामे सुरू झालेली आहेत. लातूर जिल्ह्यातही अभियानासाठी निवडलेल्या सर्व २०२ गावांमध्ये कामे सुरू झाली आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यात २१७ गावे निवडली असून येथे सर्व गावांमध्ये जलसंधारणाची कामे हाती घेण्यात आली आहेत.