शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
3
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
4
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
5
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
6
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
7
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
8
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
9
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
10
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
11
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
12
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
13
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
14
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
15
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
16
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
17
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
18
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
19
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
20
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी

एकाच दिवसात उभारले २८९ वनराई बंधारे

By admin | Updated: September 19, 2014 00:59 IST

जालना : जिल्हा परिषदेच्या वतीने ग्रामीण भागात लोकसहभागातून वनराई बंधारे तयार करण्याची विशेष मोहीम राबविली जात आहे. १७ सप्टेंबर रोजी या मोहिमेच्या पहिल्याच दिवशी २८९ वनराई बंधारे

जालना : जिल्हा परिषदेच्या वतीने ग्रामीण भागात लोकसहभागातून वनराई बंधारे तयार करण्याची विशेष मोहीम राबविली जात आहे. १७ सप्टेंबर रोजी या मोहिमेच्या पहिल्याच दिवशी २८९ वनराई बंधारे तयार झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. सन २०१२-१३ मधील जिल्ह्यातील दुष्काळजन्य परिस्थिती व चालू वर्षी सुरूवातीच्या कालावधीत कमी झालेला पाऊस लक्षात घेता पाणी अडविणे अगत्याचे असल्याने वनराई बंधाऱ्याचा मोहीम स्वरूपात मागील वर्षीप्रमाणे कामे घेणे आवश्यक असल्याचे जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी या विशेष मोहिमेसंबंधी १५ सप्टेंबर रोजी काढलेल्या आदेशात म्हटले आहे.मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या निमित्ताने १७ सप्टेंबर पासून या विशेष मोहिमेस प्रारंभ झाला असून समारोप २ आॅक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंतीदिनी होणार आहे.प्रत्येक गावात किमान पाच ते दहा वनराई बंधारे तयार करण्यात येणार आहेत. संबंधित गावात मुख्याध्यापक, शिक्षक, ग्रामसेवक, अंगणवाडी कार्यकर्ता, आशा, रोजगार सेवक, सेवाभावी संस्थांचे प्रतिनिधी, बचतगट, शासनाचे अधिकृत कर्मचारी तथा सेवक अशांना प्रत्येकी एक ते दोन वनराई बंधारे आस्थापित करण्याची जबाबदारी देण्यात येणार आहे. लोकसहभागातून वनराई बंधारा स्थापन करण्यासाठी जागेची प्रथमत: निवड करण्यात येत आहे. लोकांना प्रोत्साहित करून वनराई बंधारा साधारणत: १० ते १५ लोकांच्या श्रमदानातून करण्यात येत आहे. बांधकामाच्या रिकाम्या गोण्या, अंगणवाडीकडील आहाराच्या रिकाम्या गोण्या वापरात येत आहेत. वनराई बंधाऱ्यासाठी लागणाऱ्या रिकाम्या गोण्या गोळा करण्यासाठी शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यास आवाहन करण्यात आले आहे. वनराई बंधारे उभारणी मोहिमेचा शुभारंभ बुधवारी जालना तालुक्यातील गोंदेगाव येथून करण्यात आला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे, कृषी विकास अधिकारी आनंद गंजेवार आदींची उपस्थिती होती. तालुकानिहाय उभारण्यात आलेल्या बंधाऱ्यांची संख्या जालना १२, अंबड ३०, परतूर २३३, मंठा ११, भोकरदन ०३, एकूण २८९ अशी आहे. जास्तीत जास्त वनराई बंधारे उभारण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)आॅगस्टच्या शेवटच्या आठवड्यात व सप्टेंबरमधील पहिल्या पंधरवाड्यात काही प्रमाणात पावसाने दिलासा दिल्याने नाला ओढ्यातून पाणी वाहत आहे. तेव्हा आताच ग्रामपंचायतींना आपल्या परिसरातील अंतर्गत जीवंत नाले, ओढे शोधून त्यावर वनराई बंधारे आस्थापित केल्यास मोठ्या प्रमाणात जलसाठा भुगर्भांतर्गत पुनर्भरण होऊन त्रूाची परिणती पाण्याच्या मुबलक उपलब्धतेत होण्यास मदत होणार आहे. ४त्यामुळे त्वरित नाले, ओढे यावर होणाऱ्या लोकसहभागातून वनराई बंधाऱ्याचे नियोजन करण्याच्या सूचना सर्व ग्रामपंचायतींना देण्यात आल्याचे जि.प.चे कृषी विकास अधिकारी आनंद गंजेवार यांनी सांगितले. ग्रामपंचायतनिहाय विविध कामाअंतर्गत उपलब्ध होणाऱ्या बॅगची उपलब्धता घेऊन हे नियोजन करण्यात येत आहे.