शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक युद्ध थांबविणारे ट्रम्प कोण? दाल में कुछ तो काला है : राहुल गांधी
2
आजचे राशीभविष्य २४ जुलै २०२५: धनलाभ होऊन प्राप्तीत वाढ होईल, विचारात एकदम बदल होतील
3
बनावट दूतावास उघडले, ४ खोटे देशही बनविले; गाझियाबादमध्ये कारवाई; ४४ लाख रुपये, शिक्के जप्त
4
पाच वर्षांनंतर भारताचा मोठा निर्णय; चिनी पर्यटकांना पुन्हा व्हिसा, चीनकडूनही स्वागत
5
‘ग्रीन इंडिया’मध्ये महाराष्ट्राला सहा वर्षांपासून निधीच नाही; देशभरात एकूण ७४५ कोटी रुपये निधी उपलब्ध
6
कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारीनंतर दोन महिने अटक करता येणार नाही; कायद्याचा गैरवापर टाळण्यासाठी कोर्टाचा उपाय
7
पाकिस्तान दहशतवादात बुडालेला कट्टरपंथी देश; भारताने सुरक्षा परिषदेच्या बैठकीत सुनावले खडे बोल
8
६० टक्के महामंडळांचे वाटप ठरले, ‘मलईदार’ मंडळांबाबत रस्सीखेंच
9
खासगी विनाअनुदानित वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आता १०% ईडब्लूएस कोटा; ‘एमबीबीएस’च्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर
10
उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक घेण्यासाठी पूर्वतयारी सुरू; निवडणूक आयोग लवकरच जाहीर करणार वेळापत्रक
11
चीन अन् पाकिस्तानमुळे शेतकरी संकटात;  कांद्याची आखातातील निर्यात ४०% घसरली
12
IND vs ENG 4th Test Day 1 Stumps : साईच्या 'फिफ्टी'सह मोठा तिढा सुटला, पण...
13
डिजिटल अरेस्ट करणाऱ्या गँगवर मोठी कारवाई, कंबोडियामध्ये १०५ भारतीयांसह ३०७५ अटकेत
14
पूजा खेडकर यांना धक्का! नॉन क्रिमीलेयर रद्द, ओबीसी प्रमाणपत्र मात्र कायम राहणार
15
'देशाच्या राजकारणातील आशादायी नेतृत्व...'; संजय राऊत यांची नितीन गडकरींसाठी खास पोस्ट
16
उड्डाण करत असतानाच विमानाच्या इंजिनाला आग, पायलटने दिला मेडे कॉल, अहमदाबादमध्ये मोठा अपघात टळला  
17
छेड काढणाऱ्या संभाजी ब्रिगेडच्या माजी प्रदेशाध्यक्षांना महिलेने चपलेने मारले 
18
कॉलेजमध्ये मराठीत बोलल्याने विद्यार्थ्याला हॉकी स्टिकने मारहाण, जिवे मारण्याची धमकी देऊन आरोपी फरार
19
बापरे! टीम इंडियाला मोठा धक्का; उलटा फटका मारताना पंतला दुखापत; लंगडत लंगडत सोडलं मैदान (VIDEO)
20
"महायुती सरकारने महाराष्ट्राचा बनवला तमाशा, विधानसभेत क्लब तर बाहेर WWF चा आखाडा’’, काँग्रेसची बोचरी टीका  

२ महिन्यांत २२ तास वीजपुरवठा खंडित!

By admin | Updated: May 26, 2014 01:16 IST

औरंगाबाद : महावितरणकडून अखंड वीजपुरवठा होत नसल्याने शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. आज पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक थोड्याफार प्रमाणात सुरळीत झाले होते.

औरंगाबाद : महावितरणकडून अखंड वीजपुरवठा होत नसल्याने शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. आज पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक थोड्याफार प्रमाणात सुरळीत झाले होते. मागील दोन महिन्यांत अंदाजे २२ तास वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे पालिकेला पंप बेअरिंग, जलवाहिन्या गळत्यांच्या दुरस्तीसाठी लाखो रुपयांचा खर्च करावा लागला आहे. महावितरणकडून अखंड वीजपुरवठा होत नसल्यामुळे हा भुर्दंड पालिकेला बसला आहे, तर नागरिकांना ऐन कडाक्याच्या उन्हात पाण्यासाठी भटकंती करावी लागली आहे. आज रविवारी अनेक भागांना कमी दाबाने पाणी आले. आज बहुतांश वसाहतींमध्ये सुरळीत पाणीपुरवठा झाल्याचा दावा मनपाने केला. वीज गेल्यास काय होते? जायकवाडी येथील पम्पिंग सुरू असताना अचानक वीज गेल्यास पंप स्ट्रेप होऊन बंद पडतात. त्यामुळे काही पार्ट खराब होण्याची शक्यता असते. तसेच जलवाहिनीतून प्रेशरने पाणीपुरवठा सुरू असतो, तो अचानक बंद पडल्यामुळे जलवाहिन्यांना गळती लागते. याच कारणामुळे फारोळ्यातील जलवाहिनीला २ फुटांचे भगदाड पडले होते, असे यांत्रिकी विभागाचे उपअभियंता यू.जी. शिरसाठ यांनी सांगितले. चार दिवस वीज गुल गेल्या आठवड्यात चार दिवस वीज गुल झाली. शनिवारी मध्यरात्रीनंतर ३ तास वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे १,४०० मि.मी. आणि ७०० मि.मी. व्यासाच्या जलवाहिन्यांचा पाणीपुरवठा बंद होता. चार दिवसांपासून विजेचा लपंडाव होत असल्यामुळे शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला. २२ मे रोजी रात्री १० वाजता पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आला. २३ मे रोजी दुपारी २.३५ ते ३ वाजून १५ मिनिटांपर्यंत फारोळा जुन्या व नवीन पंपाची वीज गेली. फारोळा उपकेंद्रातून होणारा वीजपुरवठा खंडित झाला होता. २४ मे रोजी ३ तास वीजपुरवठा खंडित झाला होता. सोमवारी महावितरणला पत्र उद्या सोमवारी महावितरणचे मुख्य अभियंता शंकर शिंदे यांना भेटून अखंड पुरवठ्याच्या मागणीसाठी पत्र देण्यात येणार आहे, असे उपअभियंता शिरसाठ यांनी सांगितले. काही सबस्टेशनवरील यंत्रणेची दुरुस्ती करायची असल्यास ती करून घेण्यात यावी. पावसाळ्यापूर्वी महावितरणने अखंड वीजपुरवठा द्यावा. जेणेकरून पालिकेला नागरिकांच्या रोषाचा सामना करावा लागणार नाही, अशी मागणी मनपा महावितरणकडे करणार आहे.