शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
3
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
4
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
5
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
6
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
7
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
8
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
9
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
10
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
11
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
12
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
13
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
14
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
15
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
16
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
17
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
18
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
19
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
20
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  

१५६ ग्रामपंचायती करणार हायटेक

By admin | Updated: December 31, 2014 01:01 IST

जालना : जिल्ह्यात १५६ ग्रामपंचायतींना हायटेक करण्याचा प्रयत्न जिल्हा परिषदेच्या माध्यमातून होत आहे. या ग्रामपंचायतींना ९० टक्के कर वसुलीचे बंधन घालण्यात येणार

जालना : जिल्ह्यात १५६ ग्रामपंचायतींना हायटेक करण्याचा प्रयत्न जिल्हा परिषदेच्या माध्यमातून होत आहे. या ग्रामपंचायतींना ९० टक्के कर वसुलीचे बंधन घालण्यात येणार असून तेथे ई-मेल सुविधाही देण्याची प्रशासनाची संकल्पना आहे.आतापर्यंत जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती कार्यालयांमध्येच हायटेक सुविधा निर्माण करून देण्यात येत होत्या. मात्र आता जि.प. प्रशासनाने ग्रामपंचायतींनाही हायटेक करण्याचा निर्णय घेतला आहे. तेथे सुविधा देण्यासाठी कर वसुलीचा मुद्दा महत्त्वाचा आहे. जी ग्रामपंचायत ९० टक्के कर वसुली देईल, अशा ग्रामपंचायतीचा यात समावेश केला जाणार आहे. गावात शंभर टक्के घरपट्टी भरणाऱ्यांची एक लाखाची विमा पॉलिसी उतरविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे ग्रामपंचायत सदस्याने आपल्या वॉर्डातील वसुली अधिकाअधिक भरणा करून देण्यास सहकार्य केले तर त्यांच्या सूचनांप्रमाणे त्याच वॉर्डात प्राधान्याने विविध कामे हाती घेण्याचाही विचार प्रशासनाने केला आहे. गावात ग्रामपंचायतीमार्फत पिठाची गिरणी चालविण्याचाही उपक्रम राबविण्यात येणार असून जे कुटुंबप्रमुख कराचा भरणा शंभर टक्के करतील, त्यांना मोफत दळून देण्यात येणार आहे. याशिवाय आणखी काही सोयी, सवलती देण्याचा जिल्हा परिषद प्रशासनाचा विचार सुरू असल्याची माहिती जि.प.चे पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पी.टी. केंद्रे यांनी दिली. (प्रतिनिधी)