शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित शर्मा रुग्णालयात; 'हिटमॅन'ला अचानक काय झालं? Viral Video मुळे फॅन्स चिंतेत
2
Tariff: अमेरिकेच्या टॅरिफवर भारताचा तोडगा! शेती व दुग्धव्यवसाय क्षेत्र खुले करण्यास दिला ठाम नकार
3
कुर्डूतील मुरुम उपसा बेकायदाच, IPS अंजना कृष्णा यांनी केलेली कारवाई योग्य; जिल्हाधिकाऱ्यांनीच सांगितलं सत्य
4
अमेरिकेतील दुकानात चोरी करताना पकडली गेली गुजराती महिला? चौकशीवेळी ढसाढसा रडू लागली, त्यानंतर...
5
सी. पी. राधाकृष्णन की बी. सुदर्शन रेड्डी, भारताचे १५ वे उपराष्ट्रपती कोण होणार? आज निवडणूक
6
GEN-Z च्या आंदोलनापुढे नेपाळ सरकार झुकले; सोशल मीडियावरील बंदी उठवली
7
केंद्र सरकारने रोखले पीएम किसानचे मानधन; दोघांच्या नावे शेती असल्यास पत्नीलाच मिळेल लाभ
8
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५, नशिबाची साथ लाभेल, परदेशातून शुभ समाचार मिळतील
9
अग्रलेख: चिमुकल्यांच्या जिवाशी खेळ; प्रश्नांकडे दुर्लक्ष ही धोरणात्मक चूक
10
नेपाळच्या संसदेत घुसली तरुणाई, प्रचंड तोडफोड-जाळपोळ; सैन्याचा आंदोलकांवर गोळीबार
11
विशेष लेख:बिहारचे मैदान तापले; सर्वांच्या अस्तित्वाची लढाई!
12
हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी १७ सप्टेंबरपूर्वी करा, अन्यथा...; जरांगेंनी थोपटले दंड, ओबीसी समाज आक्रमक
13
लेख: माणूस १०० वर्षांपलीकडे आपले आयुष्य वाढवू शकतो का?
14
आधार हा नागरिकत्वाचा नाही तर ‘ओळखी’चा पुरावा; १२ वे दस्तावेज म्हणून ग्राह्य धरा, सुप्रीम कोर्टाचे निर्देश 
15
जीपच्या धडकेत तिघे ५० फूट फेकले, पती-पत्नीसह एक वर्षाचा चिमुकला ठार
16
Navratri 2025: तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्रीला १४ सप्टेंबरपासून सुरुवात
17
संयम अन् सकारात्मकतेमुळे इथवर आलो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उलगडले गुपित
18
जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथे चकमक; दोन अतिरेकी ठार
19
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
20
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!

शहरात दीड हजार कोटींचा डेव्हलपमेंट ट्रँगल!

By admin | Updated: August 20, 2014 00:57 IST

विकास राऊत, औरंगाबाद शहरासाठी २०१४ हे साल भाग्यदायी ठरले आहे. केंद्र व राज्य शासनाच्या निधीतून शहरात एक- दोन नव्हे तर तब्बल दीड हजार कोटींच्या विकासकामांची मुहूर्तमेढ रोवली गेली आहे.

विकास राऊत, औरंगाबादशहरासाठी २०१४ हे साल भाग्यदायी ठरले आहे. केंद्र व राज्य शासनाच्या निधीतून शहरात एक- दोन नव्हे तर तब्बल दीड हजार कोटींच्या विकासकामांची मुहूर्तमेढ रोवली गेली आहे. पायाभूत सेवा- सुविधांची ती कामे असून पाणीपुरवठा, रस्त्यांच्या कामाचा त्यात प्रामुख्याने समावेश आहे. ही कामे आगामी काळात पूर्ण झाल्यास शहराच्या वाहतुकीचा आणि पाण्याचा, ड्रेनेजचा प्रश्न मार्गी लागणार आहे. केंद्र शासन, राज्य शासन निधीतील ती कामे आहेत. केंद्र शासनाने दिलेल्या निधीतून समांतर जलवाहिनी आणि भुयारी गटार या दोन महत्त्वपूर्ण योजनेसह शहरातील रस्त्यांची उड्डाणपुलांची कामे होत आहेत. समांतर जलवाहिनीच्या कामाचा मार्ग मोकळा झाला आहे. १ सप्टेंबरपासून या योजनेचे काम सुरू होणार असून आगामी तीन वर्षांत शहराला या योजनेअंतर्गत पाणी मिळणार आहे. समांतर जलवाहिनीसाठी केंद्र आणि राज्याने २०११ सालीच १६२ कोटींचा निधी दिला आहे. या निधीवर तब्बल ६० कोटींचे व्याज आता जमा झाले आहे.औरंगाबादचा चेहरा-मोहरा बदलणाऱ्या भूमिगत गटार योजनेची वर्कआॅर्डर दिली आहे. ४६४ कोटी खर्चून तीन वर्षांत ही योजना पूर्ण केली जाईल. तब्बल ८० टक्के अनुदान शासनाचे असून राज्य शासन आणि पालिकेला प्रत्येकी दहा टक्के रक्कम उभारायची आहे. शहरात सार्वजनिक बांधकाम आणि मनपाच्या रस्त्यांची कामे सुरू आहेत, तसेच सिडको बसस्थानक ते रामगिरी आणि अमरप्रीत ते मोंढा नाका, महावीर चौक या उड्डाणपुलाचे कामही सुरू झाले आहे.