शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
3
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
4
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
5
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
6
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
7
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
8
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
9
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
10
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
11
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
12
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
13
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
14
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
15
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
16
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
17
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
18
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
19
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी

खरिपात १४२ कोटींची उलाढाल

By admin | Updated: May 22, 2016 00:35 IST

औरंगाबाद : मागील तीन वर्षांत कपाशीने अपेक्षित उत्पन्न न मिळवून दिल्याने शेतकऱ्यांचा कल यंदा मूग, तूर, मका बियाणे खरेदीकडे दिसून येत आहे.

औरंगाबाद : मागील तीन वर्षांत कपाशीने अपेक्षित उत्पन्न न मिळवून दिल्याने शेतकऱ्यांचा कल यंदा मूग, तूर, मका बियाणे खरेदीकडे दिसून येत आहे. परिणामी बीटी बियाणाच्या किमती ३० रुपयांनी उतरल्या आहेत, तर डाळींचे गगनाला भिडलेले भाव लक्षात घेता कंपन्यांनी मूग, तूर बियाणांचे भाव दुप्पट करून टाकले आहे. यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात बी-बियाणे विक्रीत १४२ कोटींची उलाढाल होईल, असा होरा बियाणे विक्रेत्यांनी व्यक्त केला आहे. यंदा समाधानकारक पाऊस पडणार असल्याचा हवामान खात्याने अंदाज वर्तविल्याने बळीराजासह सर्वांना दिलासा मिळाला आहे. एकीकडे उत्साहात शेतकऱ्यांनी खरीपपूर्व मशागतीला सुरुवात केली असून, दुसरीकडे बी-बियाणे बाजारपेठेत कंपन्यांनी बियाणांचा मुबलक पुरवठा केला आहे. व्यापारी आता बळीराजाची प्रतीक्षा करीत आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात ९० टक्के क्षेत्र हे कोरडवाहू आहे. या क्षेत्रात कपाशीचे उत्पादन चांगले होत आहे. अनेक शेतकऱ्यांनी कपाशीचे विक्रमी उत्पादन घेतले आहे. मात्र, सततच्या दुष्काळामुळे कपाशीला त्याचा मोठा फटका बसला आहे. यामुळे कपाशीचे नगदी पीक असले तरी शेतकरी कपाशीपासून दोन हात दूर राहण्याच्या मन:स्थितीत सध्यातरी आहे. परिणामी, बीटी बनविणाऱ्या कंपन्यांनी बीटीच्या किमती ४५० ग्रॅम पाकीट मागे ३० रुपयांनी कमी केले आहे. सध्या ८०० रुपयास बीटी २ चे बियाणे विक्री होत आहे. एककाळ असा होता की, पोलीस संरक्षणात बीटी बियाणे विक्री होत, असे पण सध्या मुबलक प्रमाणात बीटी वाण उपलब्ध आहे. दुसरीकडे बाजारात डाळींचे भाव १०० ते १५० रुपये किलोपर्यंत जाऊन पोहोचले आहे. यामुळे यंदा डाळींचे बियाणे खरेदी करावे, असा विचार शेतकरी करीत आहेत. मात्र, बियाणांच्या किमती कंपन्यांनी दुपटीने वाढविल्या आहेत. मूग ७००० ते ७५०० रुपये, तूर ८००० ते ८५०० रुपये व उडीद १०००० ते ११००० रुपये प्रतिक्विंटल बियाणे विकल्या जात आहे, तर दुसरे महत्त्वाचे पीक मकाचे बियाणे ७०० ते १ हजार रुपये बॅग विकली जात आहे, अशी माहिती जिल्हा कृषी साहित्य विक्रेता संघटनेचे अध्यक्ष राकेश सोनी यांनी दिली. जगन्नाथ काळे यांनी सांगितले की, जिल्ह्यात बीटी बियाणाचे १० ते १२ लाख पाकीट विक्री होतात. सुमारे ९० कोटींची उलाढाल यात होते. मका बियाणात २० ते २५ कोटी, तूर बियाणे १५ कोटी, बाजरी ५ कोटी, मूग ५ कोटी तर उडीद बियाणात २ कोटी, अशी एकूण १४२ कोटींची उलाढाल या हंगामात अपेक्षित आहे. मृग नक्षत्रात पाऊस पडला तरच मूग बियाणाची विक्री वाढेल.