शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
3
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
4
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
5
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
6
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
7
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
8
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
9
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
10
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
11
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
12
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
13
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
14
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
15
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
16
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
17
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
18
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
19
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
20
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी

१२१ पाणीपुरवठा योजना बंद

By admin | Updated: December 29, 2014 00:56 IST

जालना : दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या जिल्ह्यात तब्बल १२१ गावांमधील पाणीपुरवठा नळ योजना बंद असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे

जालना : दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या जिल्ह्यात तब्बल १२१ गावांमधील पाणीपुरवठा नळ योजना बंद असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या योजनांसाठी साडेपाच कोटींचा खर्च अपेक्षित असून तसा प्रस्ताव शनिवारी जिल्हापरिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने शासनाकडे पाठविला. जिल्ह्यात ग्रामीण भागात सद्यस्थितीत १०५२ पाणीपुरवठा नळयोजना आहेत. गेल्या तीन वर्षांपासून जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती आहे. मागील दोन वर्षांच्या काळात काही ठिकाणी नादुरूस्त योजना सुरू करण्यात आल्या. सद्यस्थितीत भूजल सर्वेक्षण व ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या संयुक्त पथकाने डिसेंबर महिन्यात केलेल्या सर्वेक्षणात १२१ योजना बंद असल्याचे आढळून आले. बहुतांश योजना नादुरूस्तीमुळेच बंद असून काही योजना वर्षानुवर्षे बंद राहत असल्याचेही चित्र समोर आले आहे. या गावांमध्ये टँकरद्वारे किंवा विहिरींचे अधिग्रहण करून पाणीपुरवठा केला जात आहे. ज्या गावांमध्ये हातपंप वगैरेंना पाणी असेल, तेथून पुरवठा केला जातो. राज्य शासनाकडून साडेपाच कोटींचा निधी मिळाल्यानंतरच या गावांमधील पाणीप्रश्न कायमचा मार्गी लागणार आहे. राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी शनिवारी जिल्ह्यात बंद पडलेल्या योजनांच्या दुरूस्तीसाठी योजनेच्या मूळ खर्चाच्या ३५ टक्के रक्कमेपर्यंतचा निधी देण्याची घोषणा केली. त्यात १५ टक्के रक्कम शासनाकडून तर २० टक्के रक्कम जिल्हा परिषदेकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. हा निधी जिल्ह्याच्या हाती कधी पडणार, हाच प्रश्न आहे. ४१५ ते २० वर्षांपासून बंद असलेल्या काही योजना आहेत. काही योजनांचे पाईप खराब झालेले आहेत. योजना पूर्ण झाल्यानंतर ती ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित केली जाते.४ उत्पन्न कमी असलेल्या किंवा मोठ्या प्रमाणावर कराची थकबाकी असलेल्या ग्रामपंचायतींकडून योजनांची देखभाल, दुरूस्ती नियमित केली जाते का, हा प्रश्न यानिमित्ताने समोर आला आहे. ४जिल्ह्यात सध्या २४ गावांमध्ये टँकरद्वारे तर ३४ ठिकाणी विहिरींचे अधिग्रहण करून पाणीपुरवठा केला जात आहे. या गावांमध्ये काही ठिकाणी पाणीपुरवठा योजना बंद पडलेल्या आहेत.४ बंद असलेल्या जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांपैकी एकही कालबाह्य झाली नसल्याचा दावा ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता आर.ई. तांगडे यांनी केला आहे.