शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
3
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
4
जिममध्ये चोरी करणं महागात पडलं, ट्रेनरनं अशी शिक्षा दिली की...; आता चोर कधी मनात चोरीचा विचारही आणणार नाही!
5
पाकिस्तान जय श्रीरामच्या घोषणेने दुमदुमले; कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामलीलेचे सादरीकरण
6
काव्या मारनचा अजब निर्णय ! ५० विकेट्सही न घेता आलेल्या गोलंदाजाला केलं SRH 'बॉलिंग कोच'
7
"सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा
8
नो टॅक्स, नो टेन्शन! 'या' देशांमध्ये श्रीमंत लोकही भरत नाहीत एक रुपयाही कर, मग पैसा कुठून येतो?
9
खऱ्या आयुष्यातही सचिवजी अन् रिंकी प्रेमात? सानविकाच्या 'त्या' उत्तरावर जितेंद्र लाजला
10
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा जास्त उकळणं आरोग्यासाठी हानिकारक, कारण...
11
वैभव सूर्यवंशीची स्फोटक फलंदाजीनंतर आता गोलंदाजीत कमाल! युवा टीम इंडियाकडून कसोटीत रचला इतिहास
12
"नाव घ्यायला भीती वाटते तर बोलू नका" ; आदित्य ठाकरेंनी चड्डी बनियन गॅँगचा उल्लेख करताच राणे संतापले
13
घरभाडं, वीजबिल भरायला पैसे नव्हते, राष्ट्रीय खेळाडू बनले चोर, व्यापाऱ्याचं अपहरण करून लुटले, त्यानंतर... 
14
भाच्याच्या प्रेमात वेडी झालेली बायको पळाली, घरी आणण्यासाठी गेलेल्या नवऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू
15
भारताच्या शेअर बाजारात घसरण, पण पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी; १,३५,००० अंकांच्या पार, कारण काय?
16
"पहाटे ४ वाजता उठतो, रात्री ८ ला झोपतो", लेकाची शिस्त पाहून आर माधवनही होतो दंग; म्हणाला...
17
IND vs ENG :दुखापतग्रस्त पंत 'डिफेन्स' करताना फसला! जोफ्रा आर्चरची 'वेदनादायी' गोलंदाजी
18
Viral Video: चक्क माणसासारखं दोन पायावर उभा राहिला बिबट्या; स्वत: बघितल्याशिवाय विश्वास बसणार नाही!
19
"राज ठाकरे मराठीच्या नावावर द्वेष पसरवतात, त्यांच्यावर रासुका लावा’’, मुंबई हायकोर्टातील वकिलांची मागणी  
20
DSP सिराजला इंग्लिश बॅटर बेन डकेटशी पंगा घेणं पडलं महागात! ICC नं फाडलं 'चलान'

१२१ पाणीपुरवठा योजना बंद

By admin | Updated: December 29, 2014 00:56 IST

जालना : दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या जिल्ह्यात तब्बल १२१ गावांमधील पाणीपुरवठा नळ योजना बंद असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे

जालना : दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या जिल्ह्यात तब्बल १२१ गावांमधील पाणीपुरवठा नळ योजना बंद असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या योजनांसाठी साडेपाच कोटींचा खर्च अपेक्षित असून तसा प्रस्ताव शनिवारी जिल्हापरिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने शासनाकडे पाठविला. जिल्ह्यात ग्रामीण भागात सद्यस्थितीत १०५२ पाणीपुरवठा नळयोजना आहेत. गेल्या तीन वर्षांपासून जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती आहे. मागील दोन वर्षांच्या काळात काही ठिकाणी नादुरूस्त योजना सुरू करण्यात आल्या. सद्यस्थितीत भूजल सर्वेक्षण व ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या संयुक्त पथकाने डिसेंबर महिन्यात केलेल्या सर्वेक्षणात १२१ योजना बंद असल्याचे आढळून आले. बहुतांश योजना नादुरूस्तीमुळेच बंद असून काही योजना वर्षानुवर्षे बंद राहत असल्याचेही चित्र समोर आले आहे. या गावांमध्ये टँकरद्वारे किंवा विहिरींचे अधिग्रहण करून पाणीपुरवठा केला जात आहे. ज्या गावांमध्ये हातपंप वगैरेंना पाणी असेल, तेथून पुरवठा केला जातो. राज्य शासनाकडून साडेपाच कोटींचा निधी मिळाल्यानंतरच या गावांमधील पाणीप्रश्न कायमचा मार्गी लागणार आहे. राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी शनिवारी जिल्ह्यात बंद पडलेल्या योजनांच्या दुरूस्तीसाठी योजनेच्या मूळ खर्चाच्या ३५ टक्के रक्कमेपर्यंतचा निधी देण्याची घोषणा केली. त्यात १५ टक्के रक्कम शासनाकडून तर २० टक्के रक्कम जिल्हा परिषदेकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. हा निधी जिल्ह्याच्या हाती कधी पडणार, हाच प्रश्न आहे. ४१५ ते २० वर्षांपासून बंद असलेल्या काही योजना आहेत. काही योजनांचे पाईप खराब झालेले आहेत. योजना पूर्ण झाल्यानंतर ती ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित केली जाते.४ उत्पन्न कमी असलेल्या किंवा मोठ्या प्रमाणावर कराची थकबाकी असलेल्या ग्रामपंचायतींकडून योजनांची देखभाल, दुरूस्ती नियमित केली जाते का, हा प्रश्न यानिमित्ताने समोर आला आहे. ४जिल्ह्यात सध्या २४ गावांमध्ये टँकरद्वारे तर ३४ ठिकाणी विहिरींचे अधिग्रहण करून पाणीपुरवठा केला जात आहे. या गावांमध्ये काही ठिकाणी पाणीपुरवठा योजना बंद पडलेल्या आहेत.४ बंद असलेल्या जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांपैकी एकही कालबाह्य झाली नसल्याचा दावा ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता आर.ई. तांगडे यांनी केला आहे.