शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
3
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
4
SBI चा ग्राहकाना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
5
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
6
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
7
Dahi Handi 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
8
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
9
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
10
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
11
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
12
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
13
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
14
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
15
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
16
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
17
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
18
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
19
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
20
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द

११६८२३ गारपीटग्रस्तांचे वीजबिल माफ

By admin | Updated: May 14, 2014 00:53 IST

उस्मानाबाद: जिल्ह्यातील शेतकर्‍यांना अवकाळी पाऊस, गारपिटीचा मोठा फटका बसल्याने शासनाने जानेवारी ते जून या सहा महिन्यांचे कृषीचे वीजबिल माफीचा निर्णय घेतला होता़

उस्मानाबाद: जिल्ह्यातील शेतकर्‍यांना अवकाळी पाऊस, गारपिटीचा मोठा फटका बसल्याने शासनाने जानेवारी ते जून या सहा महिन्यांचे कृषीचे वीजबिल माफीचा निर्णय घेतला होता़ महसूलकडून महावितरण कंपनीला प्राप्त झालेल्या याद्यांनुसार जिल्ह्यातील १ लाख, १६ हजार, ८२३ शेतकर्‍यांना तब्बल १७ कोटी, ४२ लाख, ८८ हजार १७७ रूपयांची वीजबिल माफी मिळाली आहे़ यंदा अवकाळी पावसाने न भूतो न भविष्यती जिल्ह्यात धुमाकूळ घातला अनेक नागरिकांचा विजा पडल्याने बळी गेला तर शेकडो जनावरे दगावली़ अनेक शेतकर्‍यांनी नुकसानीकडे पाहत झालेल्या आर्थिक बोजामुळे गळफास घेऊन आत्महत्या केली़ अवकाळीचे रौद्र रूप आणि शेतकर्‍यांच्या आत्महत्या आदी बाबी लक्षात घेऊन शासनाकडून तत्काळ नुकसानेचे, घटनेचे पंचनामे करून शेतकर्‍यांना अनुदान वाटपाचे काम हाती घेण्यात आले़ त्याच कालावधीत सहा महिन्याचे कृृषीचे वीजबिल माफ करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता़ या निर्णयामुळे शेतकर्‍यांना काही अंशी दिलासा मिळाला़ यात महावितरण कंपनीच्या उस्मानाबाद व तुळजापूर विभागांतर्गत १ लाख, १६ हजार ८२३ गारपीटग्रस्त शेतकर्‍यांना या निर्णयाचा लाभ मिळाला आहे़ यात उस्मानाबाद विभागांतर्गत उस्मानाबाद शहरांतर्गतच्या ५४६ लाभार्थ्यांचे ५ लाख, ३५ हजार, ७२४़६८, उस्मानाबाद ग्रामीण अंतर्गत १२२०० लाभार्थ्यांचे १ कोटी, ८८ लाख, १९ हजार १९६ रूपये, तेर उपविभागांतर्गत १७३८८ लाभार्थ्यांचे २ कोटी, ९२ लाख, २८ हजार, ८५४ रूपये, भूम उपविभागांतर्गतच्या ७८९२ लाभार्थ्यांचे ९७ लाख, ८२ हजार, ९८़३, परंडा उपविभागांतर्गतच्या ५०४८ लाभार्थ्यांचे ७६ लाख, ३३ हजार, ९० रूपये, कळंब उपविभागांतर्गतच्या २२०७० लाभार्थ्यांचे ३ कोटी, ४५ लाख, ६२ हजार ८०७ रूपये, वाशी उपविभागांतर्गत ८९९५ लाभार्थ्यांना १ कोटी, २७ लाख, १२ हजार ३०० रूपये वीजबिल माफ झाले आहे़ तुळजापूर विभागात तुळजापूर उपविभागांतर्गत १९१३१ लाभार्थ्यांना २ कोटी, ६४ लाख, ६८ हजार, ८८६ रूपयांचे, उमरगा उपविभागांतर्गत १३४२ लाभार्थ्यांचे १ कोटी, ९५ लाख, ५७ हजार, १०१ रूपये, तर लोहारा उपविभागांतर्गत १०१४१ लाभार्थ्यांना १ कोटी, ४९ लाख, ८८ हजार, १२० रूपयांचे वीजबिल माफ करण्यात आले आहे़ एप्रिल, मे महिन्यात देण्यात आलेली वीजबिले तीन महिन्यातील बील व मिळालेल्या सवलीनुसार शून्य रक्कम दर्शवून देण्यात आले आहेत़ (प्रतिनिधी) थकबाकी भरायची कशी ? वीज वितरण कंपनीकडून जानेवारी ते मार्च या पहिल्या टप्प्यातील तीन महिन्यांच्या वीजबिल माफीचा ११६८२३ लाभार्थ्यांना लाभ मिळाला आहे़ तीन महिन्याचे वीजबिल माफ झाले असले तरी थकबाकीचा आकडा मात्र बिलावर आला आहे़ त्यामुळे नुकसानीने कंबरडे मोडलेल्या शेतकर्‍यांमध्ये ही थकबाकी भरायची कशी आणि खरीप हंगाम घ्यायचा कसा हा प्रश्न शेतकर्‍यांसमोर कायम आहे़