शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

१०३ शाळांना मिळणार १५० नवीन खोल्या

By admin | Updated: July 19, 2014 00:44 IST

जालना : जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या १०३ शाळांना नवीन १५० खोल्या बांधून मिळणार असून त्यासाठी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या वतीने सव्वाआठ कोटींचा निधी मंजूर झाला

जालना : जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या १०३ शाळांना नवीन १५० खोल्या बांधून मिळणार असून त्यासाठी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या वतीने सव्वाआठ कोटींचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती शिक्षण सभापती वर्षाताई देशमुख यांनी दिली.गेल्या एक-दीड वर्षांपासून जिल्हा परिषद शाळांमधील अपूर्ण खोल्यांचा विषय चर्चिला जात आहे. मात्र या प्रश्नावर तोडगा काढण्याचे आश्वासन सभापती देशमुखयांनी सभागृहाला काही दिवसांपूर्वीच दिले होते. सर्वशिक्षा अभियानअंतर्गत यासंबंधीचा प्रस्ताव शिक्षण विभागाने मागील सर्वसाधारण सभेत मंजूर केला होता. जिल्ह्याला ३१६ शाळा खोल्यांची गरज होती. तसा प्रस्ताव शिक्षण परिषदेकडे पाठविण्यात आला होता. त्यापैकी १५० शाळांमधील खोल्यांचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.प्रत्येक खोली बांधकामासाठी साडेपाच लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यात अंबड येथे १६ शाळांना २० खोल्या, बदनापूर येथे १८ शाळांना २६ खोल्या, भोकरदन येथे २४ शाळांना ३७ खोल्या, घनसावंगी येथे ५ शाळांना ९ खोल्या, जाफराबाद येथे ४ शाळांना ५ खोल्या, जालना येथे १३ शाळांना २४ खोल्या, मंठा येथे ११ शाळांना १४ खोल्या आणि परतूर येथे १० शाळांना १५ खोल्या मंजूर करण्यात आलेल्या आहेत. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या प्रयत्नाने हा निधी मंजूर झाल्याचे सभापती देशमुख यांनी सांगितले. जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीस लागावी, यासाठी शिक्षण विभागाच्या वतीने उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहितीही सभापती देशमुख यांनी दिली. विद्यार्थ्यांना वाचनाची सवय लागावी, यासाठी काही शाळांमध्ये वाचनालय सुरू करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. सर्वंकष मूल्यमापनावर भर देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)संरक्षण भिंतीच्या प्रश्नासंदर्भात शासनाकडे प्रस्तावजिल्ह्यात सुमारे एक हजार शाळांना संरक्षण भिंती नसल्याचे वृत्त ‘लोकमत’ ने प्रकाशित केले होते. ग्रामीण भागातील बहुतांश जिल्हा परिषद शाळांची अवस्था दर्शविण्यात आली होती. या बाबीची गंभीर दखल प्राथमिक शिक्षण विभागाने घेतली आहे. शाळांच्या संरक्षण भिंतीच्या बांधकामासंदर्भात शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आल्याची माहिती प्रभारी शिक्षणाधिकारी अशोक राऊत यांनी दिली. शाळांसाठी टप्प्याटप्प्याने का होईना त्यासाठी निधी उपलब्ध होऊ शकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मात्र तोपर्यंत काही ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात संरक्षण भिंती तयार करता येतील का, याबाबत वरिष्ठांचे मार्गदर्शन घेण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. जि.प. शाळांची गैरसोय दूर होणारजिल्हा परिषदेच्या अनेक शाळांमध्ये वर्गखोल्या कमी पडत आहेत. तसेच काही सातवीपर्यंतच्या शाळांमध्ये इयत्ता आठवीचे वर्गही सुरू करण्यात येणार असल्याने ३१६ शाळांमध्ये वर्गखोल्यांची संख्या कमी आहे.यामुळे विद्यार्थ्यांना बसवावे कोठे ? असा प्रश्न जि.प.च्या शिक्षण विभागासमोर निर्माण झाला होता. दरम्यान. शिक्षण परिषदेने १५० शाळा खोल्यांसाठी निधी दिल्याने ही अडचण काहीशी दूर होणार आहे.