शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ३ तासांसाठी मुंबईला 'रेड अलर्ट'; विजांच्या कडकडाट अन् जोरदार वाऱ्यासह पावसाचा इशारा
2
Pooja Khedkar Mother: नवी मुंबईतून ट्रक चालकाचं अपहरण, पुण्यातील घरात ठेवले डांबून; पूजा खेडकरच्या आईचा प्रताप
3
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
4
Stock Markets Today: आठवड्याची सुस्त सुरुवात, ६० अंकांनी वधारला सेन्सेक्स; रियल्टी, मेटल शेअर्समध्ये खरेदी
5
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात केलेली ती चूक भोवणार? टीम इंडियावर कारवाई होणार?
6
PPF Investment: पती पत्नीसाठी डबल नफ्याची ट्रिक! टॅक्सही शून्य, व्याजही जास्त; कसा घ्याल फायदा?
7
युद्ध स्फोटक वळणावर, रशियन ड्रोन्स रोमानियात; युक्रेनचा रशियातील सर्वात मोठ्या तेल प्रकल्पावर भीषण हल्ला
8
राहुल गांधींवर आरोप करण्याऐवजी त्यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करा
9
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
10
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
11
ट्रम्प अन् निर्बंधांमुळे रशियन तेल मिळवण्यात भारताला अडचणी; जहाज कंपन्यांनी दिला नकार
12
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
13
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
14
‘एआय सायकोसिस’ ही स्थिती नेमकी काय आहे? Ai विचारांवर किंवा भावनांवर नियंत्रण ठेवत
15
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
16
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
17
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
18
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
19
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
20
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला

३ वर्षांत १००० रुग्णांचा मृत्यू!

By admin | Updated: May 13, 2014 00:56 IST

मुजीब देवणीकर , औरंगाबाद घरगुती, किरकोळ कारणावरून शहर व परिसरात जाळून घेणार्‍यांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे.

मुजीब देवणीकर , औरंगाबाद घरगुती, किरकोळ कारणावरून शहर व परिसरात जाळून घेणार्‍यांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. मागील तीन वर्षांमध्ये घाटीच्या बर्न विभागात १४२३ रुग्ण दाखल झाले. त्यातील १ हजार ३० जणांनी मृत्यूला कवटाळले. उर्वरित ३९३ रुग्णांना जीवदान देण्यात या विभागाला यश आले. वैद्यकीय क्षेत्रही चिंतेत मागील वर्षी मराठवाड्यात गंभीर दुष्काळ पडला. शेतकर्‍यांना काहीच काम नव्हते. घरात किरकोळ कारणावरून वाद झाला की, कर्ता पुरुष किंवा महिला जाळून घेत असत. यंदाही गारपिटीने शेतकर्‍यांना शिवारात पाय ठेवायची गरज नाही. कामच नसल्याने घरात कोणत्या ना कोणत्या कारणामुळे कुरबुरी सुरू होतात. त्याचे पर्यवसान भांडणात होते आणि शेवट अत्यंत विदारक होत आहे. ग्रामीण भागात जाळून घेणार्‍यांचे प्रमाण वाढल्याने वैद्यकीय क्षेत्रही चिंतेत आहे. रुग्णांच्या किंकाळ्या... घाटीत दररोज किमान चार तरी रुग्ण जळालेल्या अवस्थेत येतात. प्रत्येक रुग्ण ३० ते ८० टक्के जळालेला असतो. त्याच्यावर प्रभावी उपचार करून जीव वाचविणे हे बर्न विभागाच्या डॉक्टरांसमोर मोठे आव्हान असते. छाती आणि डोके हे दोन अवयव जळालेले असतील तर रुग्ण वाचण्याची शक्यता कमीच असते. घाटीत आलेल्या रुग्णाला सर्वप्रथम औषधोपचार सुरू करून संपूर्ण शरीराला ड्रेसिंग करण्यात येते. रुग्णाच्या किंकाळ्या ऐकून दगडालाही पाझर फुटू शकतो. घाटीत जेथे जळालेल्या रुग्णांवर औषधोपचार करण्यात येतात, तेथे नातेवाईकांना अजिबात प्रवेश नाही. कारण नातेवाईकांच्या इन्फेक्शनमुळे रुग्ण लवकर दगावण्याची शक्यता असते. वॉर्डातील इन्फेक्शनचे प्रमाण कमी करण्यात संबंधित विभागाला मागील काही वर्षांमध्ये यश आले आहे. महागडी औषधी, इंजेक्शन आणि रक्त देण्याची प्रक्रिया अविरतपणे सुरू असते. घाटीत अनेकदा रक्ताचा तुटवडा असतो. तेव्हा रुग्णांच्या नातेवाईकांना बरीच कसरत करावी लागते. अनेक रुग्णांच्या नातेवाईकाकडे तर विकतचे रक्त आणण्याएवढेही पैसे नसतात. राजीव गांधी जीवनदायी योजनेत आता रुग्णांना महागडी औषधी आणि औषधीद्वारे दिले जाणारे खाद्य मिळत आहे. काही इंजेक्शन तीन ते चार हजार रुपयांपर्यंत येतात. अशा इंजेक्शनचा पुरवठा अत्यंत कमी होतो. जो रुग्ण वाचू शकतो, त्यालाच हे इंजेक्शन दिल्या जाते, असे घाटीच्या सूत्रांनी सांगितले. जळालेल्या रुग्णांवर महिनोन्महिने उपचार सुरू असतात. नागरिक जळालेल्या रुग्णाला खाजगी दवाखान्यात नेतात. तेथे आठ दिवसांतच तीन ते चार लाख रुपये खर्च होतात. पैसे संपल्यावर अनेक रुग्ण घाटीत येतात. घाटीत आलेल्या प्रत्येक रुग्णावर औषधोपचार करणे डॉक्टरांना क्रमप्राप्त आहे.