शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना CM देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव
2
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
3
इन्फेक्शन झाले म्हणून २८ वर्षांचा तरुण डॉक्टरकडे गेला, त्याने प्रायव्हेट पार्टच कापून टाकला...
4
Sanjay Raut : "अमित शाह यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचं खरं रूप...", संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र
5
“आता काय, राज तुमच्यात येणार, तुमची पॉवर वाढणार”; शिंदेंच्या मंत्र्यांची ठाकरे गटाला कोपरखळी
6
“‘लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...”: संजय शिरसाट
7
Ashadhi Ekadashi 2025: चातुर्मासात विष्णू योगनिद्रा घेतात तेव्हा विश्वाचा सांभाळ कोण करतं?
8
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
9
२ दिवसांच्या धक्क्यातून बाजार सावरला, पण टाटा-महिंद्रासह 'या' कंपनीला मोठा फटका! तुमचे पैसे सुरक्षित आहेत का?
10
"राज ठाकरेंचं मराठीवर नाही तर राजकारणावर प्रेम", काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका
11
प्राडाला मोठा झटका! कोल्हापुरी चप्पलवरून थेट कोर्टात खेचले, वाचा काय घडले?
12
ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक झाली? 'या' एका नंबरवर कॉल करा, तुमचे पैसे परत मिळतील!
13
धुळे हादरले! मित्रांनी घरातून नेलं, गाडीत बसवले अन् कन्नड घाटात नेऊन घातल्या गोळ्या
14
'चला हवा येऊ द्या'मध्ये अभिजीत खांडकेकरने रिप्लेस केल्यावर निलेश साबळेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
सूडाची भावना! उधार दिलेले पैसे मागितले म्हणून थेट पेटवून दिलं घर; थरकाप उडवणारा Video
16
PC Jewellers Share Price: कर्जमुक्त होणार ही ज्वेलरी कंपनी, शेअरमध्ये १६ टक्क्यांची तुफान तेजी; गुंतवणूकदार सुखावले, तुमच्याकडे आहे का?
17
'पाकिस्तानात ९ नाही, २१ दहशतवादी अड्डे...', ऑपरेशन सिंदूरबाबत उपसेनाप्रमुखांचा मोठा खुलासा
18
“कुठलीही ताकद ठाकरे ब्रँड संपवू शकणार नाही, दोघे भाऊ एकत्र येत असतील तर...”: सुप्रिया सुळे
19
UIDAI चा मोठा निर्णय! 'या' चुका केल्यास तुमचं आधार कार्ड रद्द होईल, आताच तपासा!

३ वर्षांत १००० रुग्णांचा मृत्यू!

By admin | Updated: May 13, 2014 00:56 IST

मुजीब देवणीकर , औरंगाबाद घरगुती, किरकोळ कारणावरून शहर व परिसरात जाळून घेणार्‍यांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे.

मुजीब देवणीकर , औरंगाबाद घरगुती, किरकोळ कारणावरून शहर व परिसरात जाळून घेणार्‍यांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. मागील तीन वर्षांमध्ये घाटीच्या बर्न विभागात १४२३ रुग्ण दाखल झाले. त्यातील १ हजार ३० जणांनी मृत्यूला कवटाळले. उर्वरित ३९३ रुग्णांना जीवदान देण्यात या विभागाला यश आले. वैद्यकीय क्षेत्रही चिंतेत मागील वर्षी मराठवाड्यात गंभीर दुष्काळ पडला. शेतकर्‍यांना काहीच काम नव्हते. घरात किरकोळ कारणावरून वाद झाला की, कर्ता पुरुष किंवा महिला जाळून घेत असत. यंदाही गारपिटीने शेतकर्‍यांना शिवारात पाय ठेवायची गरज नाही. कामच नसल्याने घरात कोणत्या ना कोणत्या कारणामुळे कुरबुरी सुरू होतात. त्याचे पर्यवसान भांडणात होते आणि शेवट अत्यंत विदारक होत आहे. ग्रामीण भागात जाळून घेणार्‍यांचे प्रमाण वाढल्याने वैद्यकीय क्षेत्रही चिंतेत आहे. रुग्णांच्या किंकाळ्या... घाटीत दररोज किमान चार तरी रुग्ण जळालेल्या अवस्थेत येतात. प्रत्येक रुग्ण ३० ते ८० टक्के जळालेला असतो. त्याच्यावर प्रभावी उपचार करून जीव वाचविणे हे बर्न विभागाच्या डॉक्टरांसमोर मोठे आव्हान असते. छाती आणि डोके हे दोन अवयव जळालेले असतील तर रुग्ण वाचण्याची शक्यता कमीच असते. घाटीत आलेल्या रुग्णाला सर्वप्रथम औषधोपचार सुरू करून संपूर्ण शरीराला ड्रेसिंग करण्यात येते. रुग्णाच्या किंकाळ्या ऐकून दगडालाही पाझर फुटू शकतो. घाटीत जेथे जळालेल्या रुग्णांवर औषधोपचार करण्यात येतात, तेथे नातेवाईकांना अजिबात प्रवेश नाही. कारण नातेवाईकांच्या इन्फेक्शनमुळे रुग्ण लवकर दगावण्याची शक्यता असते. वॉर्डातील इन्फेक्शनचे प्रमाण कमी करण्यात संबंधित विभागाला मागील काही वर्षांमध्ये यश आले आहे. महागडी औषधी, इंजेक्शन आणि रक्त देण्याची प्रक्रिया अविरतपणे सुरू असते. घाटीत अनेकदा रक्ताचा तुटवडा असतो. तेव्हा रुग्णांच्या नातेवाईकांना बरीच कसरत करावी लागते. अनेक रुग्णांच्या नातेवाईकाकडे तर विकतचे रक्त आणण्याएवढेही पैसे नसतात. राजीव गांधी जीवनदायी योजनेत आता रुग्णांना महागडी औषधी आणि औषधीद्वारे दिले जाणारे खाद्य मिळत आहे. काही इंजेक्शन तीन ते चार हजार रुपयांपर्यंत येतात. अशा इंजेक्शनचा पुरवठा अत्यंत कमी होतो. जो रुग्ण वाचू शकतो, त्यालाच हे इंजेक्शन दिल्या जाते, असे घाटीच्या सूत्रांनी सांगितले. जळालेल्या रुग्णांवर महिनोन्महिने उपचार सुरू असतात. नागरिक जळालेल्या रुग्णाला खाजगी दवाखान्यात नेतात. तेथे आठ दिवसांतच तीन ते चार लाख रुपये खर्च होतात. पैसे संपल्यावर अनेक रुग्ण घाटीत येतात. घाटीत आलेल्या प्रत्येक रुग्णावर औषधोपचार करणे डॉक्टरांना क्रमप्राप्त आहे.