शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

१०० व्यापार्‍यांनी भरला प्रत्येकी १० रुपये एलबीटी

By admin | Updated: May 27, 2014 01:23 IST

औरंगाबाद : महापालिकेच्या हद्दीतील व्यापार्‍यांनी एलबीटी कराला विरोध करण्याचे हत्यार उपसले आहे. शहरातील १०० व्यापार्‍यांनी एलबीटी विभागाकडे प्रत्येकी १० रुपये कर भरल्याची माहिती विभागाकडून समजली आहे.

औरंगाबाद : महापालिकेच्या हद्दीतील व्यापार्‍यांनी एलबीटी कराला विरोध करण्याचे हत्यार उपसले आहे. शहरातील १०० व्यापार्‍यांनी एलबीटी विभागाकडे प्रत्येकी १० रुपये कर भरल्याची माहिती विभागाकडून समजली आहे. एलबीटी विभागाने कर न भरणार्‍या व्यापार्‍यांच्या विरोधात जप्तीची मोहीम हाती घेण्याचा विचार सुरू केला आहे. यासाठी आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांची परवानगी घेण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. मनपाचे हलाखीचे दिवस सुरू झाल्यामुळे विकासकामांवर, वीज बिल, कर्जफेड, कर्मचारी वेतनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. मनपाला दरमहा २५ कोटी लागतात. गेल्या महिन्यापासून व्यापार्‍यांनी एलबीटी भरण्यात हात आखडता घेतला आहे. २०१३-१४ या आर्थिक वर्षामध्ये २३० कोटी रुपयांचे उत्पन्नाचे लक्ष्य पालिकेने एलबीटीतून गृहीत धरले होते. २०० कोटींपर्यंत उत्पन्न गेले आहे. गेल्या वर्षी १७८ कोटींच्या आसपास उत्पन्न मिळाले. चालू आर्थिक वर्षात २५० कोटींचे उत्पन्न गृहीत धरले आहे. चालू महिन्यांत १८ ऐवजी ८ कोटी रुपयांचा कर पालिकेला मिळाला आहे. १० कोटी रुपयांचा फटका मनपाला बसला आहे. यातून मिळतो जास्तीचा एलबीटी प्लायवूड, सिमेंट, स्टील, होम अप्लायन्सेस, प्लम्बिंग अँड सॅनिटेशन, टाईल्स, स्टोन्स आणि चिकलठाणा, रेल्वेस्टेशनमधील उद्योगांकडून एलबीटी मिळतो. बिल्डर आणि स्वतंत्र घर बांधणारे नागरिकही एलबीटीच्या कक्षेत आल्याने मनपाला यावर्षी १ कोटी रुपयांपर्यंत उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे. शहरातील व्यापारी किती २३ हजार किरकोळ, तर ६ हजार ५०० ठोक व्यापार्‍यांची एलबीटी विभागाकडे नोंद आहे. किरकोळ, ठोक व्यापार्‍यांचाही आकडा वाढतो आहे. इन्कम व सेल्स टॅक्स विभागही पालिकेकडील माहितीचा आधार घेते. कायदा काय सांगतो महाराष्ट्र मनपा अधिनियम १९४९ च्या कलम ६७/२ नुसार मनपा हद्दीत मनपाचे शासन चालते. त्यामुळे एलबीटी भरण्यास टाळाटाळ करणार्‍या व्यापार्‍यांवर या कायद्यानुसार कारवाई केली जाऊ शकते. व्यापारी म्हणतात... व्यापारी महासंघाचे माजी अध्यक्ष तथा शिवसेनेचे स्वीकृत सदस्य प्रफुल्ल मालानी म्हणाले, मनपाने समन्वयाची भूमिका घेतली पाहिजे. येथील व्यापार्‍यांनी मनपाला एलबीटीतून सहकार्य केले आहे. ३० टक्के व्यापार्‍यांनी एलबीटी भरलेला नाही. ७० टक्के व्यापार्‍यांनी कर भरलेला आहे. ५ जूनला राज्य शासन एलबीटीबाबत निर्णय घेईल असे दिसते. मनपाला तात्पुरता त्रास होईल. कोणत्याही परिस्थितीत एलबीटी रद्द झाली पाहिजे ही व्यापार्‍यांची भूमिका आहे.