शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
2
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
3
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
4
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...
5
Prada :"नियमबाह्य नक्कल करणाऱ्या कंपन्यांना सरकारनेही...", प्राडा कंपनीविरोधात संभाजीराजेंची पोस्ट
6
...तर दिल्ली-मुंबई टोल केवळ ३० रुपये लागेल; वार्षिक पास खरेदी करून २०० टोल ओलांडता येणार
7
बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू
8
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
9
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
10
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
11
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
12
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
13
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
14
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
15
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
16
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
17
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
18
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
19
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
20
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत

१०० व्यापार्‍यांनी भरला प्रत्येकी १० रुपये एलबीटी

By admin | Updated: May 27, 2014 01:23 IST

औरंगाबाद : महापालिकेच्या हद्दीतील व्यापार्‍यांनी एलबीटी कराला विरोध करण्याचे हत्यार उपसले आहे. शहरातील १०० व्यापार्‍यांनी एलबीटी विभागाकडे प्रत्येकी १० रुपये कर भरल्याची माहिती विभागाकडून समजली आहे.

औरंगाबाद : महापालिकेच्या हद्दीतील व्यापार्‍यांनी एलबीटी कराला विरोध करण्याचे हत्यार उपसले आहे. शहरातील १०० व्यापार्‍यांनी एलबीटी विभागाकडे प्रत्येकी १० रुपये कर भरल्याची माहिती विभागाकडून समजली आहे. एलबीटी विभागाने कर न भरणार्‍या व्यापार्‍यांच्या विरोधात जप्तीची मोहीम हाती घेण्याचा विचार सुरू केला आहे. यासाठी आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांची परवानगी घेण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. मनपाचे हलाखीचे दिवस सुरू झाल्यामुळे विकासकामांवर, वीज बिल, कर्जफेड, कर्मचारी वेतनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. मनपाला दरमहा २५ कोटी लागतात. गेल्या महिन्यापासून व्यापार्‍यांनी एलबीटी भरण्यात हात आखडता घेतला आहे. २०१३-१४ या आर्थिक वर्षामध्ये २३० कोटी रुपयांचे उत्पन्नाचे लक्ष्य पालिकेने एलबीटीतून गृहीत धरले होते. २०० कोटींपर्यंत उत्पन्न गेले आहे. गेल्या वर्षी १७८ कोटींच्या आसपास उत्पन्न मिळाले. चालू आर्थिक वर्षात २५० कोटींचे उत्पन्न गृहीत धरले आहे. चालू महिन्यांत १८ ऐवजी ८ कोटी रुपयांचा कर पालिकेला मिळाला आहे. १० कोटी रुपयांचा फटका मनपाला बसला आहे. यातून मिळतो जास्तीचा एलबीटी प्लायवूड, सिमेंट, स्टील, होम अप्लायन्सेस, प्लम्बिंग अँड सॅनिटेशन, टाईल्स, स्टोन्स आणि चिकलठाणा, रेल्वेस्टेशनमधील उद्योगांकडून एलबीटी मिळतो. बिल्डर आणि स्वतंत्र घर बांधणारे नागरिकही एलबीटीच्या कक्षेत आल्याने मनपाला यावर्षी १ कोटी रुपयांपर्यंत उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे. शहरातील व्यापारी किती २३ हजार किरकोळ, तर ६ हजार ५०० ठोक व्यापार्‍यांची एलबीटी विभागाकडे नोंद आहे. किरकोळ, ठोक व्यापार्‍यांचाही आकडा वाढतो आहे. इन्कम व सेल्स टॅक्स विभागही पालिकेकडील माहितीचा आधार घेते. कायदा काय सांगतो महाराष्ट्र मनपा अधिनियम १९४९ च्या कलम ६७/२ नुसार मनपा हद्दीत मनपाचे शासन चालते. त्यामुळे एलबीटी भरण्यास टाळाटाळ करणार्‍या व्यापार्‍यांवर या कायद्यानुसार कारवाई केली जाऊ शकते. व्यापारी म्हणतात... व्यापारी महासंघाचे माजी अध्यक्ष तथा शिवसेनेचे स्वीकृत सदस्य प्रफुल्ल मालानी म्हणाले, मनपाने समन्वयाची भूमिका घेतली पाहिजे. येथील व्यापार्‍यांनी मनपाला एलबीटीतून सहकार्य केले आहे. ३० टक्के व्यापार्‍यांनी एलबीटी भरलेला नाही. ७० टक्के व्यापार्‍यांनी कर भरलेला आहे. ५ जूनला राज्य शासन एलबीटीबाबत निर्णय घेईल असे दिसते. मनपाला तात्पुरता त्रास होईल. कोणत्याही परिस्थितीत एलबीटी रद्द झाली पाहिजे ही व्यापार्‍यांची भूमिका आहे.