शहरं
Join us  
Trending Stories
1
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
2
Air India Plane Crash : विमानाचे इंजिन पायलटमुळे बंद पडले की यांत्रिक बिघाडामुळे? एअर इंडियाच्या अपघाताच्या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले
3
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
4
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
5
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
6
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
7
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
8
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
9
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
10
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
11
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
12
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
13
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
14
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
15
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
16
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
17
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
18
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
19
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
20
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!

हक्कासाठी महिलांचे आयुष्यच वेशीवर टांगले...!

By admin | Updated: January 3, 2016 01:28 IST

महिलांना पुरुषाच्या बरोबरीने काम करता यावे, यासाठी कायद्याने स्त्री-पुरुष समानता हक्क बहाल केला.

समाजात आजही केली जाते महिलांची अवहेलना : महिला मुक्ती दिनी विचार व्हावाप्रकाश काळे गोवरीमहिलांना पुरुषाच्या बरोबरीने काम करता यावे, यासाठी कायद्याने स्त्री-पुरुष समानता हक्क बहाल केला. पुरुषाच्या तुलनेत महिला कुठेही मागे राहु नये, तिला तिच्या हक्काची जाणिव करून देऊन प्रत्येक क्षेत्रात महिलांनी घेतलेली झेप विकासाची नांदी ठरत असली तरी स्वत:च्या हक्कासाठी महिलांचे आयुष्यच आज वेशीवर टांगले जात असल्याने समाजात महिलांची पिळवणूक चिंतेचा विषय बनला आहे.महिलांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, त्यांना कायद्याने बहाल केलेला अधिकार मिळावा. समाजात सातत्याने होत असलेली महिलांची पिळवणूक कायमची थांबावी. यासाठी देशभरात सामाजिक संघटनाच्या माध्यमातून स्त्री मुक्ती लढ्याची धगधगती मशाल आजही पेटत आहे. महिलांना पुरुषाच्या बरोबरीने काम करण्याची संधी मिळाली असली तरी समाजात महिलांना स्वत:चे हक्क, अधिकार मिळविण्यासाठी परिस्थितीशी दोन हात करीत भांडावे लागते. समाजात अशा असंख्य महिला आहेत, ज्यांना हक्कासाठी झुंजताना आयुष्यच मातीमोल करावे लागत आहे. प्रत्येक क्षेत्रात महिलांनी भरारी घेतली असली तरी प्रत्यक्षात किती महिलांना त्यांच्या पूर्ण अधिकार मिळाला, हा खरा प्रश्न आहे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी कायदे असले तरी आज किती महिला सुरक्षित आहे, याचाही महिला मुक्ती दिनी विचार झाला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. प्रत्येक क्षेत्र आज महिलांनी व्यापले असले तरी त्यांच्या पाठीमागे लागलेला जाच आयुष्यभर महिलांची पाठ सोडायला तयार नाही. महिलांना प्रत्येक क्षेत्रात गगनभरारी घेण्याचे स्वातंत्र्य मिळाले. पुरुषाच्या बरोबरीने काम करण्याची संधी महिलांना मिळाल्याने प्रगतीचे एक पाऊल टाकल्याचे समाधान महिलांच्या चेहऱ्यावर झळकत असले तरी महिलांना समाजात जीवन जगत असताना त्यांचे हक्क, अधिकार का मिळत नाही? हे समाजातील महिलांचे धगधगते वास्तव आजही कायम आहे. समाजात महिलांची होणारी पिळवणूक आजही थांबली नाही. महिलांवरील होणारे अत्याचार रोखण्यासाठी कडक कायदे असले तरी दिवसेंदिवस महिलांवरील होणाऱ्या अत्याचार दिवसेंदिवस वाढ होत आहे.महिला मुक्तीचा दिंडोरा आज देशभरात पिटला जातो. मग महिलांना दिवसाही एकटे फिरायला भिती का वाटते? हा अनेकांना अंतर्मुख करायला लावणारा प्रश्न अनेकांच्या काळजाला छेद करणारा आहे. महिलांना त्यांचे हक्क, अधिकार मिळाला म्हणजे स्त्री मुक्ती झाली असे आपल्याला म्हणता येणार नाही तर महिला मुक्त सुरक्षिततेची पताका सर्वांनी घेऊन महिलांवर होणारे अन्याय, अत्याचार रोखणारी कायमस्वरूपी व्यवस्था निर्माण करणे आज काळाची गरज असल्याच्या प्रतिक्रीया समाजवर्तुळातून व्यक्त होत आहे. आज महिला मुक्ती दिन देशभरात आनंदात साजरा होईल ही परंतु स्वत:च्या हक्कासाठी महिलांचे अख्खे आयुष्यच वेशीवर टांगले आहे. त्याचे काय? महिलांचा हा न संपणारा जीवन संघर्ष थांबणार तरी कधी, हा खरा प्रश्न आहे.