शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
5
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
6
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
7
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
8
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
9
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
10
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
11
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
12
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
13
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
14
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
15
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
16
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
17
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
18
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
19
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
20
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
Daily Top 2Weekly Top 5

हक्कासाठी महिलांचे आयुष्यच वेशीवर टांगले...!

By admin | Updated: January 3, 2016 01:28 IST

महिलांना पुरुषाच्या बरोबरीने काम करता यावे, यासाठी कायद्याने स्त्री-पुरुष समानता हक्क बहाल केला.

समाजात आजही केली जाते महिलांची अवहेलना : महिला मुक्ती दिनी विचार व्हावाप्रकाश काळे गोवरीमहिलांना पुरुषाच्या बरोबरीने काम करता यावे, यासाठी कायद्याने स्त्री-पुरुष समानता हक्क बहाल केला. पुरुषाच्या तुलनेत महिला कुठेही मागे राहु नये, तिला तिच्या हक्काची जाणिव करून देऊन प्रत्येक क्षेत्रात महिलांनी घेतलेली झेप विकासाची नांदी ठरत असली तरी स्वत:च्या हक्कासाठी महिलांचे आयुष्यच आज वेशीवर टांगले जात असल्याने समाजात महिलांची पिळवणूक चिंतेचा विषय बनला आहे.महिलांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, त्यांना कायद्याने बहाल केलेला अधिकार मिळावा. समाजात सातत्याने होत असलेली महिलांची पिळवणूक कायमची थांबावी. यासाठी देशभरात सामाजिक संघटनाच्या माध्यमातून स्त्री मुक्ती लढ्याची धगधगती मशाल आजही पेटत आहे. महिलांना पुरुषाच्या बरोबरीने काम करण्याची संधी मिळाली असली तरी समाजात महिलांना स्वत:चे हक्क, अधिकार मिळविण्यासाठी परिस्थितीशी दोन हात करीत भांडावे लागते. समाजात अशा असंख्य महिला आहेत, ज्यांना हक्कासाठी झुंजताना आयुष्यच मातीमोल करावे लागत आहे. प्रत्येक क्षेत्रात महिलांनी भरारी घेतली असली तरी प्रत्यक्षात किती महिलांना त्यांच्या पूर्ण अधिकार मिळाला, हा खरा प्रश्न आहे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी कायदे असले तरी आज किती महिला सुरक्षित आहे, याचाही महिला मुक्ती दिनी विचार झाला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. प्रत्येक क्षेत्र आज महिलांनी व्यापले असले तरी त्यांच्या पाठीमागे लागलेला जाच आयुष्यभर महिलांची पाठ सोडायला तयार नाही. महिलांना प्रत्येक क्षेत्रात गगनभरारी घेण्याचे स्वातंत्र्य मिळाले. पुरुषाच्या बरोबरीने काम करण्याची संधी महिलांना मिळाल्याने प्रगतीचे एक पाऊल टाकल्याचे समाधान महिलांच्या चेहऱ्यावर झळकत असले तरी महिलांना समाजात जीवन जगत असताना त्यांचे हक्क, अधिकार का मिळत नाही? हे समाजातील महिलांचे धगधगते वास्तव आजही कायम आहे. समाजात महिलांची होणारी पिळवणूक आजही थांबली नाही. महिलांवरील होणारे अत्याचार रोखण्यासाठी कडक कायदे असले तरी दिवसेंदिवस महिलांवरील होणाऱ्या अत्याचार दिवसेंदिवस वाढ होत आहे.महिला मुक्तीचा दिंडोरा आज देशभरात पिटला जातो. मग महिलांना दिवसाही एकटे फिरायला भिती का वाटते? हा अनेकांना अंतर्मुख करायला लावणारा प्रश्न अनेकांच्या काळजाला छेद करणारा आहे. महिलांना त्यांचे हक्क, अधिकार मिळाला म्हणजे स्त्री मुक्ती झाली असे आपल्याला म्हणता येणार नाही तर महिला मुक्त सुरक्षिततेची पताका सर्वांनी घेऊन महिलांवर होणारे अन्याय, अत्याचार रोखणारी कायमस्वरूपी व्यवस्था निर्माण करणे आज काळाची गरज असल्याच्या प्रतिक्रीया समाजवर्तुळातून व्यक्त होत आहे. आज महिला मुक्ती दिन देशभरात आनंदात साजरा होईल ही परंतु स्वत:च्या हक्कासाठी महिलांचे अख्खे आयुष्यच वेशीवर टांगले आहे. त्याचे काय? महिलांचा हा न संपणारा जीवन संघर्ष थांबणार तरी कधी, हा खरा प्रश्न आहे.