शहरं
Join us  
Trending Stories
1
PM KP Sharma Oli Resign: अखेर नेपाळमध्ये सत्तांतर! पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी दिला राजीनामा; देश सोडून पळाले?
2
नेपाळमधील आंदोलनाला हिंसक वळण; राष्ट्रपती, गृहमंत्री आणि परराष्ट्रमंत्र्यांची घरे जमावाने जाळली
3
लाल किल्ल्यावरील कार्यक्रमातून का केली १ कोटींच्या कलशाची चोरी? समोर आलं भलतंच कारण!
4
आज नवे आयफोन लाँच होणार! iPhone 17 मध्ये ५००० एमएएच बॅटरी? आयफोन १६, १५ च्या किंमती कोसळणार
5
नेपाळमधील आंदोलनाने भारत चिंतेत? शेजारी राष्ट्र आपल्यासाठी इतका महत्त्वाचा का?
6
नेपाळमधील परिस्थिती नियंत्रणाबाहेर, पंतप्रधानांचा राजीनामा, आंदोलकांनी संसद भवन पेटवले
7
कोण आहे बालेन शाह? ज्यांच्याकडे देशाचं नेतृत्व सोपवण्याची मागणी Gen Z आंदोलनकर्ते करतायेत
8
Video - स्वाभिमानापेक्षा पैसा मोठा नाही! पूरग्रस्त भागातील मुलाने जिंकलं मन, पाणी घेतलं अन्...
9
Gen-Z क्रांतीमुळे नेपाळमध्ये सत्तापालट? पंतप्रधान ओली दुबईला पळून जाण्याच्या प्रयत्नात, खाजगी विमान तयार
10
मुंबई विमानतळावरील अधिकारी जप्त नारळ, तेलाच्या बाटल्या नेत होते; १५ जणांना नोकरीवरून काढले
11
Video : नेपाळमधील आंदोलन आणखी पेटलं; मंत्र्यांची घरं जाळल्यानंतर लोकांचा सुरक्षा दलांवर हल्ला
12
रणबीर कपूर 'या' कंपनीचे १२.५ लाख शेअर्स खरेदी करणार, सलग दुसऱ्या दिवशी अपर सर्किट; गुंतवणूकदार मालामाल
13
iPhone 17: अ‍ॅपल आज मोठा धमाका करणार! पहिल्यांदाच आयफोनमध्ये 'हे' ४ फीचर्स मिळण्याची शक्यता
14
हिरो डॉग! मालकाला वाचवण्यासाठी जळते डायनामाइट तोंडात धरले अन्..; Video पाहून भावूक झाले लोक
15
एक व्यक्ती, ६ जिल्ह्यात एकाच वेळी केली ९ वर्षे नोकरी, सरकारला घातला कोट्यवधींचा गंडा 
16
ओलाच्या नावाने शिमगा केला, बजाज चेतक भररस्त्यात पेटली; इचलकरंजीत शोला बनला आग का गोला...
17
नेपाळमध्ये सरकार कोसळण्याचं संकट, घटकपक्षाने सोडली साथ; आतापर्यंत ३ मंत्र्यांनी दिले राजीनामे
18
हेल्दी वाटणारा मिल्कशेक मेंदूसाठी ठरतोय 'विष'; आवडीने पिणाऱ्यांना धोक्याचा इशारा
19
डिफेन्स कंपनीचा शेअर ठरला 'मल्टीबॅगर', ६ महिन्यांत पैसे दुप्पट; ५ वर्षांत दिला २०००% परतावा
20
रशियन कच्च्या तेलावरील भारताच्या नफ्याला म्हटलं 'ब्लड मनी'; ट्रम्प यांच्या सहकाऱ्यानं पुन्हा गरळ ओकली

हक्कासाठी महिलांचे आयुष्यच वेशीवर टांगले...!

By admin | Updated: January 3, 2016 01:28 IST

महिलांना पुरुषाच्या बरोबरीने काम करता यावे, यासाठी कायद्याने स्त्री-पुरुष समानता हक्क बहाल केला.

समाजात आजही केली जाते महिलांची अवहेलना : महिला मुक्ती दिनी विचार व्हावाप्रकाश काळे गोवरीमहिलांना पुरुषाच्या बरोबरीने काम करता यावे, यासाठी कायद्याने स्त्री-पुरुष समानता हक्क बहाल केला. पुरुषाच्या तुलनेत महिला कुठेही मागे राहु नये, तिला तिच्या हक्काची जाणिव करून देऊन प्रत्येक क्षेत्रात महिलांनी घेतलेली झेप विकासाची नांदी ठरत असली तरी स्वत:च्या हक्कासाठी महिलांचे आयुष्यच आज वेशीवर टांगले जात असल्याने समाजात महिलांची पिळवणूक चिंतेचा विषय बनला आहे.महिलांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, त्यांना कायद्याने बहाल केलेला अधिकार मिळावा. समाजात सातत्याने होत असलेली महिलांची पिळवणूक कायमची थांबावी. यासाठी देशभरात सामाजिक संघटनाच्या माध्यमातून स्त्री मुक्ती लढ्याची धगधगती मशाल आजही पेटत आहे. महिलांना पुरुषाच्या बरोबरीने काम करण्याची संधी मिळाली असली तरी समाजात महिलांना स्वत:चे हक्क, अधिकार मिळविण्यासाठी परिस्थितीशी दोन हात करीत भांडावे लागते. समाजात अशा असंख्य महिला आहेत, ज्यांना हक्कासाठी झुंजताना आयुष्यच मातीमोल करावे लागत आहे. प्रत्येक क्षेत्रात महिलांनी भरारी घेतली असली तरी प्रत्यक्षात किती महिलांना त्यांच्या पूर्ण अधिकार मिळाला, हा खरा प्रश्न आहे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी कायदे असले तरी आज किती महिला सुरक्षित आहे, याचाही महिला मुक्ती दिनी विचार झाला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. प्रत्येक क्षेत्र आज महिलांनी व्यापले असले तरी त्यांच्या पाठीमागे लागलेला जाच आयुष्यभर महिलांची पाठ सोडायला तयार नाही. महिलांना प्रत्येक क्षेत्रात गगनभरारी घेण्याचे स्वातंत्र्य मिळाले. पुरुषाच्या बरोबरीने काम करण्याची संधी महिलांना मिळाल्याने प्रगतीचे एक पाऊल टाकल्याचे समाधान महिलांच्या चेहऱ्यावर झळकत असले तरी महिलांना समाजात जीवन जगत असताना त्यांचे हक्क, अधिकार का मिळत नाही? हे समाजातील महिलांचे धगधगते वास्तव आजही कायम आहे. समाजात महिलांची होणारी पिळवणूक आजही थांबली नाही. महिलांवरील होणारे अत्याचार रोखण्यासाठी कडक कायदे असले तरी दिवसेंदिवस महिलांवरील होणाऱ्या अत्याचार दिवसेंदिवस वाढ होत आहे.महिला मुक्तीचा दिंडोरा आज देशभरात पिटला जातो. मग महिलांना दिवसाही एकटे फिरायला भिती का वाटते? हा अनेकांना अंतर्मुख करायला लावणारा प्रश्न अनेकांच्या काळजाला छेद करणारा आहे. महिलांना त्यांचे हक्क, अधिकार मिळाला म्हणजे स्त्री मुक्ती झाली असे आपल्याला म्हणता येणार नाही तर महिला मुक्त सुरक्षिततेची पताका सर्वांनी घेऊन महिलांवर होणारे अन्याय, अत्याचार रोखणारी कायमस्वरूपी व्यवस्था निर्माण करणे आज काळाची गरज असल्याच्या प्रतिक्रीया समाजवर्तुळातून व्यक्त होत आहे. आज महिला मुक्ती दिन देशभरात आनंदात साजरा होईल ही परंतु स्वत:च्या हक्कासाठी महिलांचे अख्खे आयुष्यच वेशीवर टांगले आहे. त्याचे काय? महिलांचा हा न संपणारा जीवन संघर्ष थांबणार तरी कधी, हा खरा प्रश्न आहे.