शहरं
Join us  
Trending Stories
1
म्हणे व्हाईट हाऊसच्या प्रेस सचिवांना कतरमध्ये काश्मीरी वेटर भेटला; 'ट्रम्पना थँक्यू सांगा' म्हटला...
2
गुरुवारी सायंकाळी तुर्की तर पहाटे हादरला चीन; पाकिस्ताननंतर त्याला साथ देणाऱ्या देशांना भूकंपाचे धक्के
3
चिदंबरम थरूर यांच्या मार्गावर! आधी युद्धविरामवर मोदी सरकारला पाठिंबा; आता इंडिया आघाडीबाबत सवाल उपस्थित
4
मुंबई एअरपोर्टवरुन प्रवास करणाऱ्यांना आता अधिक खर्च करावा लागणार; 'या' शुल्कात मोठी वाढ, किती पैसे द्यावे लागणार?
5
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
6
SBI मध्ये ₹५ लाख जमा केल्यावर मिळेल ₹२ लाखांपेक्षा अधिक व्याज; पाहा १,२,३ आणि ५ वर्षांचं कॅलक्युलेशन
7
भारतात तुर्की अन् अझरबैजानवरील बहिष्काराला वेग; ३० टक्के भारतीय पर्यटकांनी बुकिंग रद्द केले
8
आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय...
9
Sankashti Chaturthi 2025: 'घालीन लोटांगण' हा आरतीचा एक भाग नसून ते आहे स्वतंत्र कवन, पण कोणाचे? वाचा!
10
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
11
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
12
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
13
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
14
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
15
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
16
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
17
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
18
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
19
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
20
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान

अमेरिकेच्या ‘टफ युनिव्हर्सिटी’कडून पाणी नमुन्यांची तपासणी

By admin | Updated: August 27, 2016 00:29 IST

टफ युनिव्हर्सिटी युएस, युनिसेफ व निरी नागपूरची चमू चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आली आहे.

चंद्रपूर : टफ युनिव्हर्सिटी युएस, युनिसेफ व निरी नागपूरची चमू चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आली आहे. ही चमू पाणी पुरवठा योजना नसलेल्या व पाणी पुरवठा योजना असलेल्या अशा चार तालुक्यांतील १० गावांमधील पाणी नमुने तपासणी करीत आहे. पाणी नमुन्यांमध्ये आढळलेले दोष दूर करण्यासाठी ही चमू शासनाला अहवाल सादर करणार आहे.टफ युनिर्व्हसीटी युएस व युनीसेफच्या गॅब्रेला स्टींग, निरी नागपूरचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. खडसे, सहाय्यक म्हणून सतीश सावळे यांचा या चमूत समावेश आहे. ही चमू दहा दिवस चंद्रपूर जिल्ह्यातील चार तालुक्यांमधील विविध गावांना भेटी देणार आहे. शासनस्तरावरुन चार तालुक्यातील दहा गावांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये ज्या गावांमध्ये पाणी पुरवठा योजना आहे व ज्या गावांमध्ये पाणी पुरवठा योजना नाही, असे गावे निवड करण्यात आलेली आहेत. या दौऱ्यामध्ये ही चमू प्रत्येक गावात जाऊन प्रथम ग्रामपंचायत मध्ये सर्व ग्रामपंचायत सदस्य, पाणी पुरवठा समिती अध्यक्ष-सचीव व सदस्य , जलसुरक्षक, आशावर्कर तसेच गावकरी यांच्यासोबत चर्चा करुन पाणी वापर कसे करतात, याबाबत विस्तृत माहिती जाणून घेत आहे. त्यानंतर ते गावांमध्ये काही महिलांसोबत चर्चा करून तेथील पाणी नमुने तपासणी केली जात आहे. घरात पाणी कुठ ठेवता, पाणी कसे वापरता, पाणी केव्हा भरुन ठेवता, पाणी गाळुन घेता का, पाणी स्वच्छ करण्याकरिता घरगुती काही उपाय करता का, जलसुरक्षक व आशावर्कर गावांमधील घरांमध्ये स्वच्छतेबाबत माहिती समजावून सांगतात का तसेच घरातील पाणी कुठे ठेवता, याची सुध्दा घरात जावून पाहणी केली जात आहे. घरातीलच पाणी नमुने जैवीक व रासायनिक तपासणीकरिता घेत आहे. ही चमू सदर अहवाल शासनाला सादर करणार आहे. या चमूसोबत जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाचे पाणी गुणवत्ता तज्ञ्ज अंजली डाहुले, माहिती शिक्षण संवाद तज्ञ्ज प्रवीण खंडारे यांचाही सहभाग आहे. तीन सदस्यांचा समावेश : जिल्ह्यातील दहा गावांमधून घेणार पाणी नमुने या गावांना देणार भेटीवरोरा तालुक्यातील शेगाव, दादापूर, नागभीड तालुक्यातील गंगासागर हेटी, कोसंबळी गवळी, सोनुली, पारडी ठावरे, चंद्रपूर तालुक्यातील निंबाळा, वायगाव आणि जिवती तालुक्यातील चिखल बक, पाटण या गावांना टफ युनिर्व्हसीटी युएस, युनिसेफ व निरीची चमू भेट देणार आहे.पाणी वापराबाबत मार्गदर्शनदरम्यान हातपंप, विहीर व पाणीपुरवठा योजनेच्या विहीरीचे नमुनेही चमू घेत आहे. लोकांना पाणी वापराबाबत जागरुकता निर्माण करणे, माहिती शिक्षण व संवाद घडवून आणने, हा या चमूचा मुख्य उद्देश आहे. आजही ग्रामस्थ पाणी वापराबाबत जागरुक नसल्यामुळे पाणी कशा कशामुळे दूषित होऊ शकते, याबाबतसुध्दा ही चमू मार्गदर्शन करीत आहे.