शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

लसीचा अत्यल्प साठा, नागरिकांकडून संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:29 IST

चंद्रपूर : कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे प्रादुर्भाव टाळण्यासाठी राज्य सरकारने संचारबंदी सुरू केली आहे. दरम्यान, लाॅकडाऊन करण्याची ...

चंद्रपूर : कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे प्रादुर्भाव टाळण्यासाठी राज्य सरकारने संचारबंदी सुरू केली आहे. दरम्यान, लाॅकडाऊन करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे, ४५ वर्षांवरील नागरिकांना लसीकरण केले जात आहे. मात्र केंद्रावर लसच उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. मंगळवारी जिल्ह्यात १४ हजार लस उपलब्ध झाल्यानंतर केंद्रात पाठविण्यात आल्या. मात्र नागरिकांनी गर्दी केल्याने अनेकांना लस न घेताच वापस जावे लागते.

मागील पंधरा दिवसांपासून लसीकरणाने चांगलाच वेग घेतला होता. नागरिकही मोठ्या प्रमाणात लस घेण्यासाठी केंद्रावर जात होते. लसीकरण करण्यासाठी एकीकडे आवाहन केले जात असतानाच दुसरीकडे लस उपलब्धच नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला गेला. विशेष म्हणजे, मंगळवारी येथील काही केंद्रावर लस उपलब्ध झाल्याचे नागरिकांना माहीत होताच त्यांनी केंद्रावर धाव घेतली. या केंद्रावर तर संचारबंदीचे तीनतेरा वाजले. गर्दी बघून नागरिकांनी दुसऱ्या केंद्राकडे धाव घेतलीस, मात्र तिथेही लस उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांचा संताप अनावर झाला. त्यामुळे शासनाने किमान लस तरी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.