शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
3
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
4
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
5
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
6
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
7
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
8
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
9
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
10
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
11
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
13
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
14
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
15
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
16
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
17
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
18
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
19
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
20
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका

चिमूर, नागभीड तालुक्यात युरिया खताचा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 06:00 IST

नागभीड तसेच चिमूर तालुक्यात प्रामुख्याने धानाचे पीक घेतले जाते. एकूण क्षेत्रफळापैकी नागभीड तालुक्यात जवळपास ३० हजार हेक्टर क्षेत्रात धान पीक घेतले जाते. तर चिमूर तालुक्यामध्येही मोठ्या प्रमाणात धानाची लागवड करण्यात येते. यावर्षी सुरूवातीला पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढविली होती.

ठळक मुद्देधानपिकासाठी शेतकऱ्यांची धडपड

लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड / नेरी : सद्यस्थितीत धान पिकाला युरीया खताची आवश्यकता असताना नेमक्या याचवेळी युरीया खताचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे मिळेल त्या भावाने शेतकरी खताची खरेदी करीत आहे. यामध्ये मात्र शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.नागभीड तसेच चिमूर तालुक्यात प्रामुख्याने धानाचे पीक घेतले जाते. एकूण क्षेत्रफळापैकी नागभीड तालुक्यात जवळपास ३० हजार हेक्टर क्षेत्रात धान पीक घेतले जाते. तर चिमूर तालुक्यामध्येही मोठ्या प्रमाणात धानाची लागवड करण्यात येते. यावर्षी सुरूवातीला पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढविली होती. मात्र त्यानंतर हंगामयोग्य पाऊस पडल्याने शेतकऱ्यांनी रोवणे केले आहे.रोवणे आटोपल्याने आणि पाऊसही धान पिकास पूरक असल्याने सद्यस्थितीत धानाचा हंगाम अतिशय भरात आला आहे. या पिकास आता युरीया खताची आवश्यकता आहे. नेमक्या याचवेळी बाजारात युरीय खताचा तुटवडा निर्माण झाला आहे.शेतकरी खत खरेदी करण्यासाठी कृषी केंद्रात जात आहे. मात्र कृषी केंद्र संचालकांकडे युरीया उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना रिकाम्या हाताने परतावे लागत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.स्थानिक कृषी केंद्र संचालकांना विचारणा केली असता, तालुक्यात खतांचा पुरवठा कमी झाल्याचे सांगितले. यासंदर्भात तालुका कृषी अधिकाºयाकडे संपर्क केला असता तो होऊ शकला नाही.मागील काही दिवसांपासून नागभीड येथे युरीया खताची टंचाई आहे. कृषी केंद्र संचालकांकडे युरीया खत घेण्यासाठी गेल्यानंतर खत उपलब्ध नसल्याचे सांगितले जाते. मागील काही दिवसांपासून हिच स्थिती असल्यामुळे धान पिकांना कोणते खत द्यायचे हा प्रश्न आहे.- संजय माकोडेशेतकरी, मांगली

टॅग्स :agricultureशेती