शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
4
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
5
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
6
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
7
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
8
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
9
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
10
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
11
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
12
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
13
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
14
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
15
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
16
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
17
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
18
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
19
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
20
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर

दोन दिवसातील पावसाने रोवण्यांना वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 00:10 IST

पावसाळ्याला सुरुवात होताच पावसाने दडी मारली. पावसाची वाट पाहून शेतकºयांचे डोळे पाणावले.

ठळक मुद्देअनेक दिवस दडी : दमदार पावसाची अद्यापही प्रतीक्षाच

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : पावसाळ्याला सुरुवात होताच पावसाने दडी मारली. पावसाची वाट पाहून शेतकºयांचे डोळे पाणावले. बहुप्रतीक्षेनंतर सोमवारी जिल्ह्यात सर्वत्र पाऊस बरसला. त्यानंतर पावसाने पुन्हा दडी मारली. सायंकाळच्या सुमारास काळेकुट्ट आभाळ होते. मात्र पाऊस पडत नाही. त्यामुळे शेतकरी त्रस्त होते. दरम्यान, गुरुवारी दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास चंद्रपूरसह जिल्ह्यातील काही भागात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतकरी थोडाफार सुखावला आहे. मात्र जिल्ह्यावरील भीषण दुष्काळाचे संकट टळण्यासाठी दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.मागील वर्षीच्या तुलनेत यंदा पाऊस फारच कमी आहे. पावसाळ्यात जुलै महिना सर्वाधिक पावसाचा महिना मानला जातो. या महिन्यात संपूर्ण जलसाठ्या बºयापैकी पाणी जमा होते. मात्र यावेळी संपूर्ण जुलै महिना कोरडा गेला. पावसाअभावी शेतीला अवकळा आली आहे. सरकार शेतकºयांच्या पाठीशी उभे राहायला तयार नाही. निसर्ग शेतकºयांना साथ देत नाही. शेतकºयांनी जगावे की मरावे एवढी शेतकºयाची बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. यावर्षी चांगला पाऊस पडेल या एकाच आशेवर शेतकºयांनी उसनवारी व कर्ज काढून कशीबशी शेती केली. हवामान खात्यानेही यावर्षी चांगला पाऊस पडेल, असा अंदाज वर्तविला होता. थेट हवामान खात्याचा अंदाज चुकीचा ठरवित यावेळी पावसाने दगा दिला. पावसाअभावी शेतकºयांनी पेरणी केलेले महागडे बियाणे मातीमोल झाले. शेतकºयांनी दुबार-तिबार पेरणी केली. परंतु अपुºया पावसाने पेरणी केलेले बियाणे मातीतच सडून गेले. त्याचा चांगलाच फटका शेतकºयांना बसला आहे.जुलै महिन्यात विदर्भात पुन्हा पाऊस सक्रिय होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. तो फोल ठरला आहे. हवामान खात्याचा अंदाज वारंवार फोल ठरत असल्याने शेतकरी धास्तावले आहे. ९० टक्के शेतकºयांनी आपल्या पेरण्या आटोपल्या. १० टक्के पेरण्या अद्यापही शिल्लक आहे. पाऊस वारंवार दगा देत आहे. त्यामुळे शेतकºयांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. अनेक दिवस दडी मारलेल्या पावसाने मागील सोमवारी जिल्ह्यात हजेरी लावली. त्यानंतर पुन्हा पाऊस गायब झाला. दरम्यान, आज दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास अचानक ढग जमून आले आणि पाऊस बरसला. हा पाऊस बºयापैकी पडल्याने शेतकºयांना पीक वाचविण्यास मदत होणार आहे. मात्र पुढे आणखी दमदार पावसाची प्रतीक्षा आहेच.प्रकल्पात अजूनही ठणठणाटजुलै महिन्यातच पाऊस पडला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील अकराही सिंचन प्रकल्पात पाहिजे तसा जलसाठा संकल्पित होऊ शकला नाही. केवळ आसोलामेंढा प्रकल्पात ५७ टक्के जलसाठा आहे. उर्वरित प्रकल्पात तर ४० टक्क्याहून कमी जलसाठा असल्याने पुढे पाण्याची मोठी टंंचाई जाणवण्याची शक्यता आहे. पकडीगुड्डम प्रकल्पात केवळ १० टक्के पाणीसाठा आहे. लभानसराड प्रकल्पाचीही तीच अवस्था आहे. चंद्रपूरकरांना पाणी पुरवठा करणाºया इरई धरणाची स्थितीही चिंताजनक आहे.