शहरं
Join us  
Trending Stories
1
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
2
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
3
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
4
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
5
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
6
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
7
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
8
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
9
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
10
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
11
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
12
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
13
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
14
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
15
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
16
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
17
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
18
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
19
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?
20
GST कपातीनंतर Maruti Dzire किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या नवीन किंमत...

जगाच्या पोशिंद्यावरच कर्जाचा डोंगर

By admin | Updated: October 10, 2015 00:13 IST

शेतीचा दिवसेंदिवस वाढत जाणारा खर्च बघता उत्पादनात मोठी घट होत असल्याने शेती करायला कोणीही तयार होत नाही.

जगण्याची विवंचना : उत्पादनापेक्षा शेतीचा खर्च झाला महागप्रकाश काळे गोवरीशेतीचा दिवसेंदिवस वाढत जाणारा खर्च बघता उत्पादनात मोठी घट होत असल्याने शेती करायला कोणीही तयार होत नाही. शेतीवर केलेला खर्च निघणार किंवा नाही याची कोणतीच हमी शेतकऱ्यांजवळ नाही. शेतीवर अतोनात खर्च करायचा. मात्र पदरात पडेल तेवढच घ्यायच. हाच वर्षानुवर्षापासूनचा नियम आजही कायम आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती अधिकच बिकट होत चालली आहे.भारत हा कृषिप्रधान देश आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती अतिशय मजबूत असणे गरजेचे आहे. कृषिप्रधान देशातील शेतकरी सुखी-संपन्न असणे अपेक्षित आहे. मात्र शेतीला दिवसेंदिवस अवकळा येत असल्याने शेतकऱ्यांची स्थिती खालावत चालली आहे. विदर्भाची माती आणि त्या मातीत पिकणारे मोती शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती भक्कम करणारे ठरतात. परंतु शासनाची शेतीविषयी उदासीनता व निसर्गाचा लहरीपणा शेतकऱ्यांचे कंबरडे मोडत आहे.चंद्रपूर जिल्ह्यात कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. राजुरा, कोरपना, जिवती हे तालुके पांढऱ्या सोन्यासाठी अग्रेसर मानले जातात. दरवर्षीपेक्षा यावर्षी पाऊस कमी पडला. तरीही कमी पावसात शेतकऱ्यांनी कशीबशी शेती फुलविली. शेतमालाच्या फळधारणेवर पाऊस असणे गरजेचे असल्याने शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत होते. मात्र सप्टेंबर महिन्यात दोन दिवस आलेल्या पावसाने होत्याचे नव्हते केले. पावसाच्या जबरदस्त तडाख्याने कपाशी, मिरचीचे पीक पूर्णत: भुईसपाट केले.उसनवारीने पैसे आणून शेतकऱ्यांनी शेतीवर अतोनात खर्च केला. पावसानंतर शेतकऱ्यांच्या शेतातील कपाशी व मिरचीची पिके वाळली. हा पावसाचा परिणाम आहे की रोगाचा प्रादुर्भाव, हे मात्र कळायला मार्ग नाही. डवरनी, निंदन व रासायनिक खते, औषध देऊन पिके वाढविली. मात्र पावसाने पीक आडवे झाले. एवढ्या मोठ्या शेतातील भूईसपाट झालेले पीक उभे करणे म्हणजे शेतकऱ्यांचा अंत पाहण्यासारखे होते. मजुर परवडत नसल्याने कसेबसे शेतकऱ्यांनी स्वत:च कष्ट करून पीक उभे केले. मात्र पावसामुळे झाडाजवळील माती वाहुन गेल्याने झाडाला आधार उरला नाही.शेतकऱ्यांसारखे शेतातील पीक निराधार झाल्याने शेतकऱ्यांचा कोणी वाली उरला नाही. यावर्षी सोयाबीन पिकाचा उतारा घटल्याने पिकांवर केलेला खर्च निघणार नाही, अशी विपरीत परिस्थिती शेतकऱ्यांसमोर निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांसमोर कर्जाचा डोंगर वाढत असल्याने कुटुंबाची चिंता त्याला दिवस-रात्र सतावत आहे. काबाडकष्ट करूनही हाती काहीच शिल्लक राहत नसल्याने शेतीसह शेतकऱ्यांच्या आयुष्याची माती झाली आहे.