शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

जगाच्या पोशिंद्यावरच कर्जाचा डोंगर

By admin | Updated: October 10, 2015 00:13 IST

शेतीचा दिवसेंदिवस वाढत जाणारा खर्च बघता उत्पादनात मोठी घट होत असल्याने शेती करायला कोणीही तयार होत नाही.

जगण्याची विवंचना : उत्पादनापेक्षा शेतीचा खर्च झाला महागप्रकाश काळे गोवरीशेतीचा दिवसेंदिवस वाढत जाणारा खर्च बघता उत्पादनात मोठी घट होत असल्याने शेती करायला कोणीही तयार होत नाही. शेतीवर केलेला खर्च निघणार किंवा नाही याची कोणतीच हमी शेतकऱ्यांजवळ नाही. शेतीवर अतोनात खर्च करायचा. मात्र पदरात पडेल तेवढच घ्यायच. हाच वर्षानुवर्षापासूनचा नियम आजही कायम आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती अधिकच बिकट होत चालली आहे.भारत हा कृषिप्रधान देश आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती अतिशय मजबूत असणे गरजेचे आहे. कृषिप्रधान देशातील शेतकरी सुखी-संपन्न असणे अपेक्षित आहे. मात्र शेतीला दिवसेंदिवस अवकळा येत असल्याने शेतकऱ्यांची स्थिती खालावत चालली आहे. विदर्भाची माती आणि त्या मातीत पिकणारे मोती शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती भक्कम करणारे ठरतात. परंतु शासनाची शेतीविषयी उदासीनता व निसर्गाचा लहरीपणा शेतकऱ्यांचे कंबरडे मोडत आहे.चंद्रपूर जिल्ह्यात कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. राजुरा, कोरपना, जिवती हे तालुके पांढऱ्या सोन्यासाठी अग्रेसर मानले जातात. दरवर्षीपेक्षा यावर्षी पाऊस कमी पडला. तरीही कमी पावसात शेतकऱ्यांनी कशीबशी शेती फुलविली. शेतमालाच्या फळधारणेवर पाऊस असणे गरजेचे असल्याने शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत होते. मात्र सप्टेंबर महिन्यात दोन दिवस आलेल्या पावसाने होत्याचे नव्हते केले. पावसाच्या जबरदस्त तडाख्याने कपाशी, मिरचीचे पीक पूर्णत: भुईसपाट केले.उसनवारीने पैसे आणून शेतकऱ्यांनी शेतीवर अतोनात खर्च केला. पावसानंतर शेतकऱ्यांच्या शेतातील कपाशी व मिरचीची पिके वाळली. हा पावसाचा परिणाम आहे की रोगाचा प्रादुर्भाव, हे मात्र कळायला मार्ग नाही. डवरनी, निंदन व रासायनिक खते, औषध देऊन पिके वाढविली. मात्र पावसाने पीक आडवे झाले. एवढ्या मोठ्या शेतातील भूईसपाट झालेले पीक उभे करणे म्हणजे शेतकऱ्यांचा अंत पाहण्यासारखे होते. मजुर परवडत नसल्याने कसेबसे शेतकऱ्यांनी स्वत:च कष्ट करून पीक उभे केले. मात्र पावसामुळे झाडाजवळील माती वाहुन गेल्याने झाडाला आधार उरला नाही.शेतकऱ्यांसारखे शेतातील पीक निराधार झाल्याने शेतकऱ्यांचा कोणी वाली उरला नाही. यावर्षी सोयाबीन पिकाचा उतारा घटल्याने पिकांवर केलेला खर्च निघणार नाही, अशी विपरीत परिस्थिती शेतकऱ्यांसमोर निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांसमोर कर्जाचा डोंगर वाढत असल्याने कुटुंबाची चिंता त्याला दिवस-रात्र सतावत आहे. काबाडकष्ट करूनही हाती काहीच शिल्लक राहत नसल्याने शेतीसह शेतकऱ्यांच्या आयुष्याची माती झाली आहे.