शहरं
Join us  
Trending Stories
1
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
2
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
3
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
4
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
5
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
6
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
7
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
8
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
9
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
10
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
11
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  
12
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
13
मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
14
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे
15
कचऱ्यात फेकलेल्या तिकीटावर लॉटरी लागली, त्यातून आणखी तिकीटे घेतली, ६६ लाख जिंकली...
16
बांगलादेशमध्ये हिंदू तरुणीवर घरात घुसून बलात्कार, व्हिडिओही बनवला, बीएनपी नेत्यावर आरोप 
17
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
18
पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! १५ नव्हे १२ वर्षांतच मिळणार पूर्ण पेन्शन, केंद्र सरकार बदलणार नियम?
19
तरण्या-ताठ्या मुलामुलींचं हृदय का होतंय म्हातारं? शेफाली जरीवालाच्या निधनामुळे पुन्हा चर्चा
20
साप्ताहिक राशीभविष्य: काहींना नवीन संधी मिळेल, 'या' राशींना अचानक धनलाभ होईल

‘ते’ एका महिन्यात करतात दोन हजाराहून अधिक रुग्णांवर नि:शुल्क उपचार

By admin | Updated: October 25, 2014 01:09 IST

आपल्या हाताच्या कौशल्याने गेल्या २० वर्षापासून ते रुग्णांची नि:शुल्क सेवा करताहेत.

रत्नाकर चटप लखमापूरआपल्या हाताच्या कौशल्याने गेल्या २० वर्षापासून ते रुग्णांची नि:शुल्क सेवा करताहेत. महिन्याला दोन हजाराहून अधिक रुग्ण त्यांच्याकडून उपचार घेऊन मोठ्या आनंदाने परत जातात. गिरीधर काळे, असे या किमयागाराचे नाव असून कोरपना तालुक्यातील बिबी येथील ते रहिवासी आहेत. त्यांचे हे समाजकार्य आजही अविरत सुरूच आहे.मोडलेल्या, लचकलेल्या अस्थिवर गिरीधर काळे आपल्या हाताने उपचार करून अस्थिंना जोडतात. त्यांचे हात एखाद्या मशीनसारखे काम करतात. वयाच्या १६ व्या वर्षापासून गिरीधरांचे हे समाजकार्य सुरू आहे. शेती हा मुळ आणि वडिलोपार्जित व्यवसाय करून समाजसेवेचे व्रत पार पाडताना आधुनिक शेतीचे तंत्रही त्यांनी अंगीकारले आहे. आपल्या आजोबापासून त्यांनी हे बाळकडू घेतले. आज अस्थी रुग्णांसाठी ते देवदूतच ठरले आहेत. पहाटेपासून तर रात्रीपर्यंत त्याची ही सेवा अविरत सुरू असते. कधी शेताच्या बांधावर तर कधी घरी तर कुठे कुणाच्या लग्नात, कार्यक्रमातही रुग्ण हजर होतात. अशावेळी नकार न देता ते उपचार करण्यास तत्पर असतात. त्यामुळेच आज जिल्हासह विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यातून अस्थिरुग्ण गिरीधरांकडे उपचारासाठी येत आहेत. कोणत्याही रुग्णांकडून एक रुपयाही न घेता ते नि:शुल्क सेवा करीत आहेत. नामवंत डॉक्टरांना साध्य न झालेले अस्थिवरील उपचार त्यांनी केले आहे. याची साक्ष आज जिल्ह्यातील अनेक प्रसिद्ध अस्थितज्ञ देतात. गेल्या २० वर्षांपासून गिरीधरांनी रुग्णांची नोंद ठेवली नाही. कुठल्याही आर्थिक मदतीची अपेक्षा केली नाही. रुग्ण बरा होऊन परत येतो, यातच माझ्या परिश्रमाचे फळ आपणाला मिळते, असे ते आनंदाने सांगतात. त्यांच्याकडे रुग्णांची नोंद असावी, असा आग्रह धरीत गावातील सेवार्थ ग्रुपच्या युवकांनी गेल्या दोन महिन्यापासून नोंदणी अभियान सुरू केले आहे. यात महिन्याला गिरीधर दोन हजाराहून अधिक रुग्णांवर उपचार करतात व महाराष्ट्र, छत्तीसगड, मध्यप्रदेशातीलही रुग्ण उपचारासाठी येत असल्याचे नोंदणी रजिस्टरवरून कळते. या कार्यात त्यांची आई, पत्नी, तीन भाऊ यांचेही योगदान आहे.गिरीधर काळे यांच्या कार्याची महती सर्वदूर पसरली आहे. त्याची उपचार पद्धती व यश बघून याआधी अनेक नामवंत अस्थितज्ज्ञांनी मोठे मानधन देऊन रुग्णालयात काम करण्याची विनंती केली. मात्र जनसेवा हीच ईश्वरसेवा असे म्हणत गिरीधरांनी गावातच राहून सेवेचे व्रत अंगिकारले आहे. त्यामुळे बिबी गावाचा व गावकऱ्यांचाही नावलौकीक होत असल्याचे गावकरी सांगतात. त्यांच्या या कार्याची दखल राज्य शासनाने घ्यावी व त्यांचा सन्मान व्हावा ही गावकऱ्यांची इच्छा आहे. नुकताच सेवार्थ ग्रुप व साई स्पोर्टिंग क्लब बिबीच्या वतीने गावकऱ्यांनी गिरीधर काळेंचा ‘लोकसेवक’ म्हणून सत्कार केला. तर राजुरा मुक्ती संग्राम उत्सव समितीनेही राजुराभुषण पुरस्कार देऊन गिरीधर काळे यांना गौरविले आहे.अनेकदा बाहेर जिल्ह्यातून त्यांच्याकडे उपचारासाठी रुग्ण येतात. यावेळी कधी रुग्ण मुक्कामाने राहतात. अशा रुग्णांना राहायला जागा, पांघरून आणि भोजनाची व्यवस्थाही गिरीधर स्वत: करतो. अशा या समाजसेवकाची शासनाने दखल घ्यावी, अशी इच्छा आहे.