शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

एकाच वेळी निघाली पाचही जणांची अंत्ययात्रा; दोन सख्ख्या भावांवर एकाच चितेवर अग्नी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 11:03 IST

तलावात बुडून पाच तरुणांचा दुर्दैवी अंत : शोकाकुल वातावरणात निरोप

अमोद गौरकर लोकमत न्यूज नेटवर्कशंकरपूर (चंद्रपूर) : नियती कुणासोबत कधी कशी वागेल, सांगता येत नाही. शनिवारी कोलारी गावाने याची प्रचिती अनुभवली. या गावातल्या पाच तरुणांचा घोडाझरी तलावात बुडून दुर्दैवी अंत झाला. या पाच जणांच्या स्वरूपात कुणाचा आधार गेला, तर कुणाचे स्वप्न गेले, कुणाची वृद्धापकाळाची काठी हिरावली, तर कुठे बहिणीला राखी बांधायला भाऊच राहिलेला नाही. रविवारी एकाच वेळी या पाच जणांची अंत्ययात्रा निघाली, तेव्हा संपूर्ण ग्रामस्थांच्या डोळ्यात अश्रू तरळले होते.

बाळाजी गावंडे (२४), तेजस संजय ठाकरे (१७), यश किशोर गावंडे (२२) व आर्यन इंगोले (१८) हे सहा युवक शनिवारी घोडाझरी येथे फिरायला गेले असता, त्यातील आर्यन पाण्यात न उतरल्यामुळे वाचला, तर बाकी पाच युतकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. रविवारी (दि. १६) या पाचही युतकांची एकाच वेळी म्हणजे दुपारी १२:३० वाजता अंत्ययात्रा निघाली होती. संपूर्ण गाव या अंत्ययात्रेत सहभागी होते. गावातील स्मशानभूमीमध्ये पाचही जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यातील जनक व यश या सख्ख्या भावंडावर एकाच चितेवर अग्नी देण्यात आला. सर्वांच्या डोळ्यात अश्रूच्या धारा वाहत होत्या.

मान्यवरांनी केले सांत्वन...यावेळी ब्रह्मपुरीचे आमदार विजय वडेट्टीवार, चिमूर विधानसभेचे आमदार कीर्तीकुमार भांगडीया, जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष डॉ. सतीश वारजूकर, काँग्रेस ज्येष्ठ नेते पंजाबराव गावंडे, धनराज मुंगले, नागपूर जिल्हा परिषदच्या बालकल्याण सभापती अवंतिका लेकुरवाळे, चिमूर तालुका काँग्रेस अध्यक्ष विजय गावंडे, नागभीड तालुका काँग्रेस अध्यक्ष प्रमोद चौधरी, भाजपाचे राजू पाटील झाडे उपस्थित होते.

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर