शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीन पिकले एकरी साडेतीन क्विंटल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 23:25 IST

यंदाच्या खरीप हंगामातील सोयाबीन पिकाची हेक्टरी उत्पादकता किती राहणार, याचे विश्लेषण करण्यासाठी कृषी विभागाने जिल्ह्यातील धान उत्पादक तालुक्यांना वगळून ११ तालुक्यांत २२८ पीक कापणी प्रयोगांचे नियोजन केले होते.

ठळक मुद्दे२१७ पीक कापणी प्रयोगाचे निष्कर्ष : पोंभुर्ण्यातील उत्पादनात घट, जिवती तालुक्यात वाढ

राजेश मडावी।आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : यंदाच्या खरीप हंगामातील सोयाबीन पिकाची हेक्टरी उत्पादकता किती राहणार, याचे विश्लेषण करण्यासाठी कृषी विभागाने जिल्ह्यातील धान उत्पादक तालुक्यांना वगळून ११ तालुक्यांत २२८ पीक कापणी प्रयोगांचे नियोजन केले होते. यातील २१७ प्रयोगांचे निष्कर्ष जाहीर झाले असून सोयाबीनचे एकरी उत्पादन सुमारे साडेतीन क्विंटल इतके झाले आहे. मागील वर्षाची तुलना केल्यास यंदा चंद्रपूर, मूल, बल्लारपूर, कोरपना आणि जिवती तालुक्यातील सोयाबीनच्या हेक्टरी उत्पादनात कमालीची वाढ झाल्याचे दिसून आले. मात्र, लागवडीचा खर्च लक्षात घेता हे उत्पादन पुरेसे नसल्याने शेतकऱ्यांची आर्थिक दुर्दशा संपण्याची कदापि शक्यता नाही.राज्य शासनाने मागील वर्षी तूर डाळ खरेदी संदर्भात शेतकरीविरोधी भूमिका घेतल्याने दरात मोठी घसरण झाली होती. तूर डाळ आयात करण्याची वेळ येऊ नये, याकरिता शेतकºयांना तुरीचे लागवड करण्यास कृषी विभागाकडून विशेष प्रोत्साहन देण्यात आले होते. त्यामुळे विक्रमी उत्पादन झाले. मात्र, खरेदीच्या धोरणात शासनाने आपटी खाल्ली. त्याचा अनिष्ठ परिणाम तूर उत्पादक शेतकºयांवर झाला होता. सोयाबीन या तेलवर्गीय पिकाच्या दराबाबतही स्पष्टता नसल्याने जिल्ह्यातील लागवड क्षेत्र वाढणार नाही, असा अंदाज होता. पण, आर्थिकदृष्ट्या हतबल झालेल्या शेतकºयांनी कापसासोबतच यावेळी सोयाबीन लागवडीलाही प्राधान्य दिले. परिणामी, चंद्रपूर, राजूरा, गोंडपिपरी, जिवती, मुल, बल्लारपूर, वरोरा, भद्रावती, कोरपना, चिमूर, पोंभुर्णा आदी ११ तालुक्यांतील लागवड क्षेत्रात मोठी वाढ झाली.या तालुक्यांतील सोयाबीनचे हेक्टरी उत्पादन काढण्यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने २२८ पीक कापणी प्रयोगांचे नियोजन करण्यात आले होते. यातील २१७ प्रयोगांचे निष्कर्ष नुकतेच जाहीर करण्यात आले. या निष्कार्षानुसार सरासरी हेक्टर उत्पादन साडेतीन क्विंटलच्या पुढे सरकू शकले नाही.पावसाची अनियमिता आणि वेगवेगळ्या कीडींच्या प्रादुर्भावामुळे सोयाबीन लागवडीचा खर्च वाढून शेतकºयांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. तर दुसरीकडे सरकारी हमीभावाची खात्री नसल्याच्या पार्श्वभूमीवर हेक्टरी उत्पादन कमी झाल्याने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक दुष्टचक्रातून सुटका होण्याची शक्यताच मावळली आहे.कापसाचे २५२ पीक कापणी प्रयोगजिल्ह्यातील कापसाची हेक्टरी उत्पादकता सिद्ध करण्यासाठी कृषी विभागाने २५२ पीक कापणी प्रयोगांचे नियोजन केले आहे. कृषितज्ज्ञांनी निश्चित केलेले आधुनिक तंत्रशुद्ध निकष व मान्यताप्राप्त पद्धतीनुसार हे प्रयोग येत्या काही दिवसांत होणार आहेत. नमुन्यांचे विश्लेषण केल्यानंतर हेक्टरी उत्पादन जाहीर होईल.शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडलेयंदाच्या खरीप हंगामात पावसाने सतत हुलकावणी दिली. सोयाबीन उत्पादनाच्या दृष्टीने पुरेसा पाऊसच पडला नाही. पावसाने वारंवार दीर्घ खंड दिल्याने पिकांवर किडरोगांनी हल्ला केला. दरम्यान प्रतिबंधात्मक औषधींंची फ वारणी केल्याने एकूणच लागवडीचे खर्च वाढले. आता हाती आलेल्या उत्पादनाचा विचार केल्यास खर्च कसा भरून काढायचा, या प्रश्नाने सोयाबीन उत्पादक शेतकरी मेटाकुटीस आला आहे.