शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

४१३ गावांसाठी सव्वासहा कोटींचा टंचाई आराखडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2017 00:39 IST

उन्हाळ्यातील संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेता जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने ६ कोटी २७ लाख ५३ हजारांचा टंचाई कृती आराखडा तयार केला आहे.

टँकरचीही तरतूद : ५७८ उपाययोजनांचा आराखड्यात समावेशचंद्रपूर : उन्हाळ्यातील संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेता जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने ६ कोटी २७ लाख ५३ हजारांचा टंचाई कृती आराखडा तयार केला आहे. या आराखड्याला जिल्हाधिकाऱ्यांनी जानेवारी महिन्यात मंजुरी दिली असून, ४१३ गावातील ५७८ उपाययोजनांचा या आराखड्यात समावेश आहे.सद्य:स्थितीत जिल्ह्यातील एकाही गावात टंचाई कृती आराखड्यानुसार उपाययोजना करण्यात आली नसली तरी मे महिन्यात काही गावांमध्ये टँकर लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. काही वर्षांपूर्वी जिवती तालुक्यासह इतर तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाणीटंचाईचे भीषण संकट उभे ठाकले होते. त्यावेळी जिल्हा परिषदेचा ग्रामीण पाणीपुरवठा विभाग पाणीटंचाई निवारण्यासाठी सपशेल अपयशी ठरला होता. दरम्यान, संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता जिल्हा परिषदेने १ आॅक्टोबर २०१६ ते ३० जून २०१७ या नऊ महिन्यांच्या कालावधीसाठी टंचाई कृती आराखडा तयार केला असून, ५७८ प्रस्तावित उपाययोजनांचा त्यामध्ये समावेश करण्यात आला आहे. प्रस्तावित उपाययोजनांमध्ये हातपंपासह नवीन १७० विंधन विहिरींचा समावेश आहे. हातपंपासह १३ नवीन कुपनलिका, ८५ नळ योजनांची विशेष दुरुस्ती, २९ हातपंपांची विशेष दुरुस्ती, १० ठिकाणी टँकर व बैलगाडीने पाणीपुरवठा करणे, २६४ ठिकाणी विहीर खोलीकरण करून गाळ काढणे व इनवेल बोअरचा समावेश आहे. सात ठिकाणी खासगी विहिरी अधिग्रहित केल्या जाणार असल्याचे प्रस्तावित आहे. तात्पुरती पूरक नळ योजना तलावामध्ये अथवा धरणामध्ये चर खोदणे व झिरे व बुडक्या घेणे, या उपाययोजनांचा कोणत्याही ठिकाणी समावेश नाही. प्रस्तावित उपाययोजनांमध्ये जिल्ह्यातील ४१३ गावे समाविष्ट करण्यात आली आहे. यामध्ये नवीन विंधन विहिरींसाठी १३३ गावे, नवीन कूपनलिकांसाठी ११, नळ योजनांच्या विशेष दुरुस्तीसाठी २०, टँकर व बैलगाडीने पाणीपुरवठा करण्यासाठी १०, विहिरी खोल करून गाळ काढण्यासाठी १४७ व खासगी विहिरी अधिग्रहित करण्यासाठी सात गावांचा समावेश करण्यात आला आहे.टंचाई कृती आराखड्यानुसार विंधन विहिरींसाठी १ कोटी ६४ लाख ९० हजार, कुपनलिकांसाठी २३ लाख ४० हजार, नळ योजनांच्या दुरुस्तीसाठी ३ कोटी ५९ लाख ३३ हजार, हातपंपांच्या दुरुस्तीसाठी २ लाख ९० हजार, टँकर व बैलगाडीने पाणीपुरवठा करण्यासाठी ६८ लाख ५० हजार, खासगी विहिरी अधिग्रहित करण्यासाठी ३ लाख ५० हजार असा ६ कोटी २७ लाख ५३ हजाराचा टंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. १० मार्च २०१७ पर्यंत जिल्ह्यातील कोणत्याही गावांमध्ये उपाययोजना करण्यात आल्या नसल्या तरी हा आराखडा महत्वपूर्ण ठरणार आहे. (शहर प्रतिनिधी)