शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
7
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
8
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
9
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
10
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
11
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
12
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
13
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
14
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
15
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
16
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
17
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
18
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
19
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
20
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल

४१३ गावांसाठी सव्वासहा कोटींचा टंचाई आराखडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2017 00:39 IST

उन्हाळ्यातील संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेता जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने ६ कोटी २७ लाख ५३ हजारांचा टंचाई कृती आराखडा तयार केला आहे.

टँकरचीही तरतूद : ५७८ उपाययोजनांचा आराखड्यात समावेशचंद्रपूर : उन्हाळ्यातील संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेता जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने ६ कोटी २७ लाख ५३ हजारांचा टंचाई कृती आराखडा तयार केला आहे. या आराखड्याला जिल्हाधिकाऱ्यांनी जानेवारी महिन्यात मंजुरी दिली असून, ४१३ गावातील ५७८ उपाययोजनांचा या आराखड्यात समावेश आहे.सद्य:स्थितीत जिल्ह्यातील एकाही गावात टंचाई कृती आराखड्यानुसार उपाययोजना करण्यात आली नसली तरी मे महिन्यात काही गावांमध्ये टँकर लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. काही वर्षांपूर्वी जिवती तालुक्यासह इतर तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाणीटंचाईचे भीषण संकट उभे ठाकले होते. त्यावेळी जिल्हा परिषदेचा ग्रामीण पाणीपुरवठा विभाग पाणीटंचाई निवारण्यासाठी सपशेल अपयशी ठरला होता. दरम्यान, संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता जिल्हा परिषदेने १ आॅक्टोबर २०१६ ते ३० जून २०१७ या नऊ महिन्यांच्या कालावधीसाठी टंचाई कृती आराखडा तयार केला असून, ५७८ प्रस्तावित उपाययोजनांचा त्यामध्ये समावेश करण्यात आला आहे. प्रस्तावित उपाययोजनांमध्ये हातपंपासह नवीन १७० विंधन विहिरींचा समावेश आहे. हातपंपासह १३ नवीन कुपनलिका, ८५ नळ योजनांची विशेष दुरुस्ती, २९ हातपंपांची विशेष दुरुस्ती, १० ठिकाणी टँकर व बैलगाडीने पाणीपुरवठा करणे, २६४ ठिकाणी विहीर खोलीकरण करून गाळ काढणे व इनवेल बोअरचा समावेश आहे. सात ठिकाणी खासगी विहिरी अधिग्रहित केल्या जाणार असल्याचे प्रस्तावित आहे. तात्पुरती पूरक नळ योजना तलावामध्ये अथवा धरणामध्ये चर खोदणे व झिरे व बुडक्या घेणे, या उपाययोजनांचा कोणत्याही ठिकाणी समावेश नाही. प्रस्तावित उपाययोजनांमध्ये जिल्ह्यातील ४१३ गावे समाविष्ट करण्यात आली आहे. यामध्ये नवीन विंधन विहिरींसाठी १३३ गावे, नवीन कूपनलिकांसाठी ११, नळ योजनांच्या विशेष दुरुस्तीसाठी २०, टँकर व बैलगाडीने पाणीपुरवठा करण्यासाठी १०, विहिरी खोल करून गाळ काढण्यासाठी १४७ व खासगी विहिरी अधिग्रहित करण्यासाठी सात गावांचा समावेश करण्यात आला आहे.टंचाई कृती आराखड्यानुसार विंधन विहिरींसाठी १ कोटी ६४ लाख ९० हजार, कुपनलिकांसाठी २३ लाख ४० हजार, नळ योजनांच्या दुरुस्तीसाठी ३ कोटी ५९ लाख ३३ हजार, हातपंपांच्या दुरुस्तीसाठी २ लाख ९० हजार, टँकर व बैलगाडीने पाणीपुरवठा करण्यासाठी ६८ लाख ५० हजार, खासगी विहिरी अधिग्रहित करण्यासाठी ३ लाख ५० हजार असा ६ कोटी २७ लाख ५३ हजाराचा टंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. १० मार्च २०१७ पर्यंत जिल्ह्यातील कोणत्याही गावांमध्ये उपाययोजना करण्यात आल्या नसल्या तरी हा आराखडा महत्वपूर्ण ठरणार आहे. (शहर प्रतिनिधी)