शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
4
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
5
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
6
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
7
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
8
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
9
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
10
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
11
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
12
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
13
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
14
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
15
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
16
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
17
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
18
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
19
पंचक २०२५: सावधान! २४ ते २९ डिसेंबर दरम्यान 'पंचक' काळ; 'या' ७ राशींनी राहावे अधिक सतर्क!
20
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
Daily Top 2Weekly Top 5

४१३ गावांसाठी सव्वासहा कोटींचा टंचाई आराखडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2017 00:39 IST

उन्हाळ्यातील संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेता जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने ६ कोटी २७ लाख ५३ हजारांचा टंचाई कृती आराखडा तयार केला आहे.

टँकरचीही तरतूद : ५७८ उपाययोजनांचा आराखड्यात समावेशचंद्रपूर : उन्हाळ्यातील संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेता जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने ६ कोटी २७ लाख ५३ हजारांचा टंचाई कृती आराखडा तयार केला आहे. या आराखड्याला जिल्हाधिकाऱ्यांनी जानेवारी महिन्यात मंजुरी दिली असून, ४१३ गावातील ५७८ उपाययोजनांचा या आराखड्यात समावेश आहे.सद्य:स्थितीत जिल्ह्यातील एकाही गावात टंचाई कृती आराखड्यानुसार उपाययोजना करण्यात आली नसली तरी मे महिन्यात काही गावांमध्ये टँकर लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. काही वर्षांपूर्वी जिवती तालुक्यासह इतर तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाणीटंचाईचे भीषण संकट उभे ठाकले होते. त्यावेळी जिल्हा परिषदेचा ग्रामीण पाणीपुरवठा विभाग पाणीटंचाई निवारण्यासाठी सपशेल अपयशी ठरला होता. दरम्यान, संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता जिल्हा परिषदेने १ आॅक्टोबर २०१६ ते ३० जून २०१७ या नऊ महिन्यांच्या कालावधीसाठी टंचाई कृती आराखडा तयार केला असून, ५७८ प्रस्तावित उपाययोजनांचा त्यामध्ये समावेश करण्यात आला आहे. प्रस्तावित उपाययोजनांमध्ये हातपंपासह नवीन १७० विंधन विहिरींचा समावेश आहे. हातपंपासह १३ नवीन कुपनलिका, ८५ नळ योजनांची विशेष दुरुस्ती, २९ हातपंपांची विशेष दुरुस्ती, १० ठिकाणी टँकर व बैलगाडीने पाणीपुरवठा करणे, २६४ ठिकाणी विहीर खोलीकरण करून गाळ काढणे व इनवेल बोअरचा समावेश आहे. सात ठिकाणी खासगी विहिरी अधिग्रहित केल्या जाणार असल्याचे प्रस्तावित आहे. तात्पुरती पूरक नळ योजना तलावामध्ये अथवा धरणामध्ये चर खोदणे व झिरे व बुडक्या घेणे, या उपाययोजनांचा कोणत्याही ठिकाणी समावेश नाही. प्रस्तावित उपाययोजनांमध्ये जिल्ह्यातील ४१३ गावे समाविष्ट करण्यात आली आहे. यामध्ये नवीन विंधन विहिरींसाठी १३३ गावे, नवीन कूपनलिकांसाठी ११, नळ योजनांच्या विशेष दुरुस्तीसाठी २०, टँकर व बैलगाडीने पाणीपुरवठा करण्यासाठी १०, विहिरी खोल करून गाळ काढण्यासाठी १४७ व खासगी विहिरी अधिग्रहित करण्यासाठी सात गावांचा समावेश करण्यात आला आहे.टंचाई कृती आराखड्यानुसार विंधन विहिरींसाठी १ कोटी ६४ लाख ९० हजार, कुपनलिकांसाठी २३ लाख ४० हजार, नळ योजनांच्या दुरुस्तीसाठी ३ कोटी ५९ लाख ३३ हजार, हातपंपांच्या दुरुस्तीसाठी २ लाख ९० हजार, टँकर व बैलगाडीने पाणीपुरवठा करण्यासाठी ६८ लाख ५० हजार, खासगी विहिरी अधिग्रहित करण्यासाठी ३ लाख ५० हजार असा ६ कोटी २७ लाख ५३ हजाराचा टंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. १० मार्च २०१७ पर्यंत जिल्ह्यातील कोणत्याही गावांमध्ये उपाययोजना करण्यात आल्या नसल्या तरी हा आराखडा महत्वपूर्ण ठरणार आहे. (शहर प्रतिनिधी)