शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझं बालवाङ्मय वाचण्याचं वय राहिलेलं नाही"; CM देवेंद्र फडणवीसांचा संजय राऊतांना खोचक टोला
2
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार
3
ना रस्ता... ना बस, मोबाइलला तर रेंजही नाही; अखेर गावकऱ्यांनी बीडमधील वाडीच काढली विक्रीला!
4
डोकं फिरलंया! फायटर जेट पाडून भारताने लावली पाकची वाट, तरी इशाक दार यांनी थोपटली त्यांच्या वायुदलाची पाठ
5
परेश रावल यांची 'हेरा फेरी ३' मधून एक्झिट! समोर आलं कारण; चाहत्यांची घोर निराशा
6
टीम कुक यांनी ट्रम्प यांचा सल्ला का धुडकावला? अ‍ॅपल अमेरिकेला स्थलांतरीत केल्यास काय होईल?
7
COVID 19 : हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोना परतला, रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ
8
पाकला पाठिंबा देणं तुर्कस्तान आणि अझरबैजानच्या अंगलट! भारताने थेट वर्मावरच घातला घाव
9
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही; हा फक्त ट्रेलर, योग्य वेळ आल्यावर पूर्ण चित्रपट दाखवू"
10
माऊंट एव्हरेस्टवर भारतीय गिर्यारोहकाचा मृत्यू, शिखर सर करून परतताना घडली दुर्घटना
11
नाशिक महापालिका निवडणूक: महायुतीत शिंदेंची शिवसेना स्वबळावर लढण्याच्या तयारीत, श्रीकांत शिंदे करणार दौरा
12
Gold Rates 16 May : काल स्वस्त झालं, आज सोनं महागलं; १२०० रुपयांपेक्षा अधिक तेजी, खरेदीपूर्वी पाहा नवे दर
13
हापूस आंब्याचा सीझन संपला! कोकणचा राजा पुढचा आठवडाभरच मिळणार; एपीएमसीत काय स्थिती...
14
आमिरची विमानतळावर वाट बघत होती गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅट, कारमध्ये येताच दोघांनी एकमेकांना...
15
'संपूर्ण देश, देशाचे सैन्य PM मोदींच्या चरणी नतमस्तक', मध्यप्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य
16
Maharashtra Politics : "मी लिहिलेल्या घटना सत्य, आणखी लिहिले असते तर हाहाकार माजला असता"; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
17
कतरिनाआधी 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात होता विकी कौशल, 'उरी'च्या प्रमोशनला एकत्रही दिसले, पण...
18
२ हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी एकाच वेळी करता येतात क्लेम; फक्त 'ही' प्रक्रिया माहिती असायला हवी
19
साडेसहा महिन्यांच्या गर्भवती तिरंदाजाची कमाल; पोटात बाळाची हालचात तरी अचूक साधला नेम
20
एअरटेलने लाँच केली ग्राहकांसाठी 'डिफेन्स' सिस्टीम; रियल टाइम फ्रॉड डिटेक्शन होणार, सगळे ॲप्स ट्रॅक करणार

अनेक पुलांवर जीवाचा धोका

By admin | Updated: August 5, 2016 00:56 IST

रायगड जिल्ह्यातील महाडच्या सावित्रीनदीवरील पूल वाहून गेल्याची घटना मंगळवारी रात्री घडली.

चंद्रपूर : रायगड जिल्ह्यातील महाडच्या सावित्रीनदीवरील पूल वाहून गेल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. यात अनेक जण वाहून गेले असून अद्यापही मृतांचा आकडा स्पष्ट झालेला नाही. या घटनेनंतर जिल्ह्यातील नदी, नाल्यांवरील पूल व उड्डाणपुलांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कोरपना तालुक्यातील चंद्रपूर-भोयगाव मार्गावरील पूल धोक्याची घंटा देत आहे. या पुलावरून रात्रंदिवस कारखान्यांची जड वाहतूक होते. जड वाहन गेल्यास पूल हलत असल्याचे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे या पुलाचे पुनरूज्जीवन करणे आवश्यक आहे. अन्यथा चंद्रपूर जिल्ह्यातही महाडसारखी घटना घडू शकते, असा धोका निर्माण झाला आहे. महाड येथील घटनेनंतर चंद्रपूर जिल्हा प्रशासन खळबळून जागे झाले. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी गुरूवारी दिवसभर जिल्ह्यातील जीर्ण व धोकादायक पुलांची माहिती गोळा करण्यात व्यस्त दिसून आले. मात्र धोकादायक स्थितीत असलेल्या एकाही पुलाची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाकडे नव्हती. चंद्रपूर जिल्ह्यात ६८ मोठे पूल, ९०७ लहान पूल व ७ हजार ५७० मोऱ्या आहेत. यात एकही ब्रिटीशकालीन पूल नसला तरी काही पुलांच्या बांधकामांना ४० ते ५० वर्षे लोटले आहे. निकृष्ठ काम व योग्य देखरेखअभावी या पुलांचे आयुष्य अर्ध्यावरच असल्याचे दिसून येते. जिल्ह्यातील काही पूल सोडले तर सर्वच पुलांची स्थिती चांगली आहे. मात्र पावसाळ्यात अनेक पुलांवरून पाणी वाहत असते. त्यामुळे पुलाचे कठडे वाहून जाणे, खड्डे पडणे, पुलालगतचा रपटा खचणे असे प्रकार घडत असल्याचे दिसून येत आहेत. याकडे मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग वेळीच लक्ष देत नाही. घटना घडल्यानंतरच एखाद्या गोष्टीकडे लक्ष जाते, हे आजवरचे चित्र आहे. त्यामुळे अनेक पुलांवर अपघातास आमंत्रण मिळत आहेत. (स्थानिक प्रतिनिधी)