शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

अनेक पुलांवर जीवाचा धोका

By admin | Updated: August 5, 2016 00:56 IST

रायगड जिल्ह्यातील महाडच्या सावित्रीनदीवरील पूल वाहून गेल्याची घटना मंगळवारी रात्री घडली.

चंद्रपूर : रायगड जिल्ह्यातील महाडच्या सावित्रीनदीवरील पूल वाहून गेल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. यात अनेक जण वाहून गेले असून अद्यापही मृतांचा आकडा स्पष्ट झालेला नाही. या घटनेनंतर जिल्ह्यातील नदी, नाल्यांवरील पूल व उड्डाणपुलांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कोरपना तालुक्यातील चंद्रपूर-भोयगाव मार्गावरील पूल धोक्याची घंटा देत आहे. या पुलावरून रात्रंदिवस कारखान्यांची जड वाहतूक होते. जड वाहन गेल्यास पूल हलत असल्याचे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे या पुलाचे पुनरूज्जीवन करणे आवश्यक आहे. अन्यथा चंद्रपूर जिल्ह्यातही महाडसारखी घटना घडू शकते, असा धोका निर्माण झाला आहे. महाड येथील घटनेनंतर चंद्रपूर जिल्हा प्रशासन खळबळून जागे झाले. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी गुरूवारी दिवसभर जिल्ह्यातील जीर्ण व धोकादायक पुलांची माहिती गोळा करण्यात व्यस्त दिसून आले. मात्र धोकादायक स्थितीत असलेल्या एकाही पुलाची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाकडे नव्हती. चंद्रपूर जिल्ह्यात ६८ मोठे पूल, ९०७ लहान पूल व ७ हजार ५७० मोऱ्या आहेत. यात एकही ब्रिटीशकालीन पूल नसला तरी काही पुलांच्या बांधकामांना ४० ते ५० वर्षे लोटले आहे. निकृष्ठ काम व योग्य देखरेखअभावी या पुलांचे आयुष्य अर्ध्यावरच असल्याचे दिसून येते. जिल्ह्यातील काही पूल सोडले तर सर्वच पुलांची स्थिती चांगली आहे. मात्र पावसाळ्यात अनेक पुलांवरून पाणी वाहत असते. त्यामुळे पुलाचे कठडे वाहून जाणे, खड्डे पडणे, पुलालगतचा रपटा खचणे असे प्रकार घडत असल्याचे दिसून येत आहेत. याकडे मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग वेळीच लक्ष देत नाही. घटना घडल्यानंतरच एखाद्या गोष्टीकडे लक्ष जाते, हे आजवरचे चित्र आहे. त्यामुळे अनेक पुलांवर अपघातास आमंत्रण मिळत आहेत. (स्थानिक प्रतिनिधी)