शहरं
Join us  
Trending Stories
1
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
2
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
3
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
4
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
5
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
6
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
7
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
8
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
9
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
10
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
11
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
12
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
13
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
14
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
15
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
16
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
17
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
18
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
19
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
20
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 

विद्यार्थ्याला नापास केल्याचे माऊंटचे पुन्हा एक प्रकरण उघड

By admin | Updated: July 11, 2017 00:26 IST

येथील माऊंट कारमेल कान्व्हेंट हायस्कूलचे उत्तीर्ण विद्यार्थ्याला नापास केल्याचे पुन्हा एक प्रकरण सोमवारी पुढे आले आहे.

पोलिसात तक्रार : १३ मुलांना नापास केल्याचा राजेश जैन यांचा दावा, मुख्याध्यापिकेला जामीन लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : येथील माऊंट कारमेल कान्व्हेंट हायस्कूलचे उत्तीर्ण विद्यार्थ्याला नापास केल्याचे पुन्हा एक प्रकरण सोमवारी पुढे आले आहे. आपल्या मुलाला ५४.५४ टक्के गुण असतानाही त्याला नववीमध्ये नापास केल्यामुळे त्याचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आल्याचा आरोप राजेश जैन या पालकाने येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला आहे. यावेळी त्यांनी शाळेतील १३ विद्यार्थ्यांना अशाचप्रकारे नापास केल्याचा दावाही जैन यांनी शिक्षणाधिकाऱ्यांकडून प्राप्त गुणपत्रिकेच्या आधारे केला आहे.याप्रकरणी पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार करून माऊंट कारमेल कान्व्हेंट हायस्कूल प्रशासकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तसेच इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमधील २०१६-१७ या शैक्षणिक वर्षातील किती विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले व कोणत्या कारणांसाठी देण्यात आले, याबाबींची चौकशी करण्याची मागणीही यावेळी जैन यांनी केली. ते म्हणाले, लहान मुलगा धर्मांशु हा २०१६-१७ या शैक्षणिक वर्षात सदर शाळेत नवव्या वर्गात शिकत असताना अंतिम परिक्षेचा निकाल घेण्यासाठी गेलो असता मुख्याध्यापिकेने गुणपत्रिका न दाखविता मुलगा नापास झाल्याचे सांगितले. यानंतर त्यांना वारंवार मुलाची गुणपत्रिका व त्याने सोडविलेले पेपर दाखविण्याची विनंती केली, परंतु आजपर्यंत ती दाखविली नाही. त्यांना मुलाच्या भविष्याबाबत विचार करा, असे म्हटले, तर मुख्याध्यापिका नित्या यांनी शाळेत आॅडिटोरियम हाल बनविण्याकरिता २५ हजार रुपये फंड मागितला. फंड न दिल्यास टीसी देतो, असे म्हणाल्या, असा गंभीर आरोपही जैन यांनी यावेळी केला. २५ हजार रुपये देण्यास असमर्थता दर्शविली असता धर्मांशुची टीसी दिली. त्यावर ‘नीड्स इन्प्रुवमेंट इन स्टॅन्डर्ड नाइन’ असे नमुद असल्याचे ते म्हणाले. बिल्डींगच्या बांधकामाकरिता २५ हजार दिले नाही म्हणूून मुलाला नापास केल्याचा गंभीर आरोपही जैन यांनी केला. राजेश ठाकूर या पालकाने दाखल केलेल्या प्रकरणात मुख्याध्यापिका नित्या जोसेफ व शिक्षिकेला सना खत्री यांना जिल्हा न्यायालयाने अंतरिम जामीन मिळाल्याची माहिती सूत्राने दिली. शिक्षणाधिकाऱ्यांकडील गुणपत्रिकेत उत्तीर्णमाहितीच्या अधिकारातही मुलाचे पेपर दिले नाही. नवव्या वर्गातून टीसी दिलेल्या युवराजच्या वडील राजेश ठाकूर यांच्याकडून माऊंट कॉन्व्हेंटच्या १३ मुलांना नापास केले. त्याची गुणपत्रिका शिक्षणाधिकाऱ्याकडून प्राप्त केली. धर्मांशु याला इंग्रजीत ५३.३, हिंदी ६८.७, सायन्स ५३.३, सोशल सायन्स ५२.७ टक्के गुण असल्याचे दिसून आले. तेव्हा आपला मुलगा नापास झाला नसल्याचे उघड झाल्याचेही राजेश जैन म्हणाले.१७ नंबरचा फार्म भरून दहावीची तयारीशाळा सोडल्याचे प्रमाणपत्र घेऊन चंद्रपूर येथील इतर कॉन्व्हेंटमध्ये प्रवेशासाठी प्रयत्न केले असता कुठेही प्रवेश मिळाला नाही. यामुळे मुलाची मानसिक स्थिती खालावली असल्याचा गंभीरही राजेश जैन यांनी केला.अखेर वर्ष वाया जाईल, या भीतीने १७ नंबरचा फार्म भरून धर्मांशु दहाव्या वर्गाची तयारी करीत असल्याची माहिती जैन यांनी दिली.