शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

मामा तलावांच्या दुरूस्तीने सिंचनाचे भाग्य उजळणार

By admin | Updated: December 26, 2015 01:18 IST

चंद्रपूर जिल्ह्यात १३२ मामा तलाव जलसंपदा विभागाच्या अखत्यारीत आहेत. या मालगुजारी तलावांच्या दुरुस्तीचा कालबद्ध कार्यक्रम शासनाने अलिकडेच आखला आहे.

योग्यरीत्या व्हावी कामे : शेतकऱ्यांना मोठी अपेक्षासावली : चंद्रपूर जिल्ह्यात १३२ मामा तलाव जलसंपदा विभागाच्या अखत्यारीत आहेत. या मालगुजारी तलावांच्या दुरुस्तीचा कालबद्ध कार्यक्रम शासनाने अलिकडेच आखला आहे. मात्र प्रशासकीय यंत्रणा तोकडी असल्याने त्यांच्यावर कामाचा भार वाढणार असून मामा तलावापासून संपूर्ण सिंचन होईल का, असा प्रश्न शेतकरी वर्गाकडून केला जात आहे.मामा तलावांची दुरुस्ती या विषयात गाळ उपसणे, मुरुम टाकणे, गवत कापने या कामांचा समावेश आहे. मात्र याचा सरळ फायदा अधिकारी आणि कंत्राटदार यांच्या पलिकडे शेतकऱ्यांना होईल, असे दिसत नाही. शेतीच्या सिंचनाशी या तलावाच्या दुरुस्तीचा काही एक संबंध नाही, असे तज्ञांचे मत आहे. पाणी वाटप करण्यासाठी शासनाने पाणी वापर संस्था निर्माण करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र सुमारे २५० नोंदणीकृत संस्था अकार्यक्षम ठरल्या आणि त्या अवसायानात निघाल्या आहेत. त्यामुळे नवीन कामे करताना याची खबरदारी घेणे आवश्यक आहे. शासनाने दुरुस्तीचे दरपत्रक अजूनही सुधारीत केले नाही. सुमारे २००३ पासून प्रती हेक्टर २८ हजार रुपये दुरुस्तीचा दर ठरविण्यात आला असून अजूनही तोच दर कायम आहे. ५० हजार रुपये वाढीव दर प्रस्तावित आहे. परंतु अजूनही त्याच्यात दुरुस्ती करण्यात आलेली नाही, त्यामुळे शासनाकडून मिळणाऱ्या निधीतून किती तलावाचे भाग्य पलटून शेतकऱ्यांना कितपत लाभ होईल, याची प्रतीक्षा आहे.पाटचाऱ्यांचीही व्हावी दुरुस्तीमामा तलावाच्या दुरुस्तीसाठी जिल्ह्यात १०० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे २८ कोटी रुपयाचा निधी देण्यात आल्याची माहिती आहे. परंतु, ज्या यंत्रणेकडून ही कामे करण्यात येणार आहेत, त्यांच्याकडे कामे किती, मनुष्यबळ किती याचाही विचार होण्याची गरज आहे. तलावाच्या दुरुस्तीचेच कामे न करता त्यात पाटचाऱ्याही दुरुस्त करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पाटचाऱ्या दुरुस्त झाल्या नाही तर तलावाची कितीही दुरुस्ती केली तरी शेतापर्यंत पाणी पोहचणे कठीण होईल आणि पर्यायाने पाणी उशीरा मिळाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होतच राहील. संपूर्ण सिंचन क्षमता निर्माण व्हावीपूर्वीच्या काळात मालगुजारांनी ज्या तलावांची निर्मिती केली, ती केवळ संरक्षित सिंचनाकरीता केली आहे. संरक्षित सिंचनाकरीता तयार करण्यात आलेल्या मामा तलावातून मिळणारे पाणी पिकाच्या शेवटच्या कालावधीत एकदाच मिळते. परंतु संपूर्ण सिंचन करावयाचे असल्यास किमान तीन पाळीत पाणी देणे आवश्यक असते. त्यामुळेच मामा तलाव संपूर्ण सिंचन करण्यास समर्थ ठरणे आवश्यक आहे. तलावांचे लघु पाटबंंधारे म्हणून रूपांतरित करावेमामा तलावांची दुरुस्ती करण्यासाठी पहिल्यांदा त्या तलावांचे लघु पाटबंंधारे म्हणून त्यांना रुपांतरीत करणे महत्त्वाचे आहे. तलावांचे शासकीय दृष्टीकोनातून सर्व्हेक्षण करावे, सांडव्यांचे नवनीकरण करावे अशा प्रकारच्या अनेक उपाययोजना तज्ञांनी सुचविल्या आहेत.