शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

पाऊस लांबला; २००५ सारखीच स्थिती?

By admin | Updated: June 23, 2016 00:32 IST

यंदा पाऊस सारखा लांबत चालला. त्याच्या प्रतीक्षेची सीमा आता संपली. आशा व अपेक्षेची जागा निराशेने घेतली आहे.

केव्हा बरसणार ? : २००५ मध्ये निर्माण झाले होते संकटवसंत खेडेकर बल्लारपूरयंदा पाऊस सारखा लांबत चालला. त्याच्या प्रतीक्षेची सीमा आता संपली. आशा व अपेक्षेची जागा निराशेने घेतली आहे. पावसाळा दरवर्षी ७ जूनला येणारच, अशी जी अटकळ होती, ती कधीचीच संपली आहे. ७ जून ही आता पावसाच्या आगमनाची नक्की तारीख नसली तरी या महिन्याच्या दुसऱ्या- तिसऱ्या आठवड्यात तो बरसतोच! यंदा मात्र त्याने खूपच विश्रांती घेतली आहे.जूनचा तिसरा आठवडा लागला तरी, मान्सूनच्या पावसाचा विदर्भात पत्ता नाही. कागदोपत्री मान्सून विदर्भात आला. देशात त्याचे आगमन यंदा नेहमीप्रमाणे केरळातून न होता विदर्भातून झाले आहे, असे हवामान खाते म्हणते. मात्र, विदर्भात तसे काही चित्र नाही. निदान चंद्रपूर जिल्ह्यात तरी तो आला नाही. २३ तारीख उलटून गेली तरी त्याचा पत्ता नाही आणि तो पुढे कधी बरसणार याचा नेमका अंदाजही नाही. सन २००५ ला पाऊस लांबल्याने अशीच स्थिती निर्माण झाली होती. जून २४ ची तारीख उजाडली तरी पाऊस नाही. कडक व घामेजून सोडणारे उन्ह पडत होते. सारे बेजार झाले होते. वर्धा नदीच्या पाण्याची धार तुटून नदीच्या पात्रात रेतीचे मैदान झाले होते. विहिरी आणि बोअरिंगच्या पाण्याची पातळी खूपच घसरली होती. वर्धा नदीवरुन जीवन प्राधिकरणाला पाणी पुरवठा करणाऱ्या नदीमधील खुल्या विहिरींजवळ पाण्याची धार पूर्णत: आटली होती. अशा बिकट स्थितीत, वर्धा नदीच्या मधोमध पेपर मिलच्या विहिरीतून पाणी जीवन प्राधिकरणाच्या विहिरीत सोडून त्याद्वारे शहराला नळातून कसा बसा पाणी पुरवठा होत होता. किल्ल्याजवळील, पेपर मिलच्या विहिरीची स्थिती अत्यंत वाईट झाली होती. पेपर मिलने नदीवर बंधारा बांधून पाणी अडवून ते पंपाने विहिरीकडे वळते केले होते. मात्र तेही पाणी संपून पेपर मिल बंद करण्याची पाळी आली होती. त्या काळी शहरात टँकरने पाणी पुरवठा केला जाऊ लागला होता. त्याकरिता भांडणेही होवू लागली होती. यात उल्लेखनीय बाब अशी की, शहरातील बहुतेक सर्वच बोअरिंगच्या पाण्याची पातळी एवढी खाली गेली होती की त्यातून पाणी काढणे अवघड झाले होते. परंतु, नगर परिषद वाचनालयाजवळील बोअरिंग तशाही स्थितीत जमिनीतून मुबलक पाणी अव्याहतपणे देत होते. टँकरने या बोअरिंगद्वारेच पाणी पुरवठा होत होता. २४ जूनपर्यंत शहरात पेयजलाची अशीच स्थिती होती. साऱ्यांचे लक्ष, पाणी कधी येणार याकडे लागले होते. २४ जूनचे रात्रीला एकदाचा पाऊस लागला आणि तो सर्वत्र विदर्भभर एवढा बरसला की त्याच रात्रीला सकाळी तुटलेली पाण्याची धार पूर्ववत सुरु झाली. तीच स्थिती आज आलेली आहे. फरक एवढाच की २००५ ला नदीची पाण्याची धार तुटली होती. पाण्याचे दुर्भिक्ष शहरात निर्माण झाले होते. यंदा मात्र पाऊस लांबला असला तरी वर्धा नदीत बल्लारपूर भागात भरपूर पाणी आहे. जीवन प्राधिकरणाला नदीवरुन भरपूर पाणी पुरवठा होत आहे. खरा संकटात सापडला आहे, तो शेतकरी! त्याची झोपच उडाली आहे.