शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
2
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
3
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
4
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
5
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
6
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
7
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
8
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
9
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
10
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
11
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
12
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
13
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
14
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
15
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
16
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
17
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
18
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
19
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
20
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

पाऊस लांबला; २००५ सारखीच स्थिती?

By admin | Updated: June 23, 2016 00:32 IST

यंदा पाऊस सारखा लांबत चालला. त्याच्या प्रतीक्षेची सीमा आता संपली. आशा व अपेक्षेची जागा निराशेने घेतली आहे.

केव्हा बरसणार ? : २००५ मध्ये निर्माण झाले होते संकटवसंत खेडेकर बल्लारपूरयंदा पाऊस सारखा लांबत चालला. त्याच्या प्रतीक्षेची सीमा आता संपली. आशा व अपेक्षेची जागा निराशेने घेतली आहे. पावसाळा दरवर्षी ७ जूनला येणारच, अशी जी अटकळ होती, ती कधीचीच संपली आहे. ७ जून ही आता पावसाच्या आगमनाची नक्की तारीख नसली तरी या महिन्याच्या दुसऱ्या- तिसऱ्या आठवड्यात तो बरसतोच! यंदा मात्र त्याने खूपच विश्रांती घेतली आहे.जूनचा तिसरा आठवडा लागला तरी, मान्सूनच्या पावसाचा विदर्भात पत्ता नाही. कागदोपत्री मान्सून विदर्भात आला. देशात त्याचे आगमन यंदा नेहमीप्रमाणे केरळातून न होता विदर्भातून झाले आहे, असे हवामान खाते म्हणते. मात्र, विदर्भात तसे काही चित्र नाही. निदान चंद्रपूर जिल्ह्यात तरी तो आला नाही. २३ तारीख उलटून गेली तरी त्याचा पत्ता नाही आणि तो पुढे कधी बरसणार याचा नेमका अंदाजही नाही. सन २००५ ला पाऊस लांबल्याने अशीच स्थिती निर्माण झाली होती. जून २४ ची तारीख उजाडली तरी पाऊस नाही. कडक व घामेजून सोडणारे उन्ह पडत होते. सारे बेजार झाले होते. वर्धा नदीच्या पाण्याची धार तुटून नदीच्या पात्रात रेतीचे मैदान झाले होते. विहिरी आणि बोअरिंगच्या पाण्याची पातळी खूपच घसरली होती. वर्धा नदीवरुन जीवन प्राधिकरणाला पाणी पुरवठा करणाऱ्या नदीमधील खुल्या विहिरींजवळ पाण्याची धार पूर्णत: आटली होती. अशा बिकट स्थितीत, वर्धा नदीच्या मधोमध पेपर मिलच्या विहिरीतून पाणी जीवन प्राधिकरणाच्या विहिरीत सोडून त्याद्वारे शहराला नळातून कसा बसा पाणी पुरवठा होत होता. किल्ल्याजवळील, पेपर मिलच्या विहिरीची स्थिती अत्यंत वाईट झाली होती. पेपर मिलने नदीवर बंधारा बांधून पाणी अडवून ते पंपाने विहिरीकडे वळते केले होते. मात्र तेही पाणी संपून पेपर मिल बंद करण्याची पाळी आली होती. त्या काळी शहरात टँकरने पाणी पुरवठा केला जाऊ लागला होता. त्याकरिता भांडणेही होवू लागली होती. यात उल्लेखनीय बाब अशी की, शहरातील बहुतेक सर्वच बोअरिंगच्या पाण्याची पातळी एवढी खाली गेली होती की त्यातून पाणी काढणे अवघड झाले होते. परंतु, नगर परिषद वाचनालयाजवळील बोअरिंग तशाही स्थितीत जमिनीतून मुबलक पाणी अव्याहतपणे देत होते. टँकरने या बोअरिंगद्वारेच पाणी पुरवठा होत होता. २४ जूनपर्यंत शहरात पेयजलाची अशीच स्थिती होती. साऱ्यांचे लक्ष, पाणी कधी येणार याकडे लागले होते. २४ जूनचे रात्रीला एकदाचा पाऊस लागला आणि तो सर्वत्र विदर्भभर एवढा बरसला की त्याच रात्रीला सकाळी तुटलेली पाण्याची धार पूर्ववत सुरु झाली. तीच स्थिती आज आलेली आहे. फरक एवढाच की २००५ ला नदीची पाण्याची धार तुटली होती. पाण्याचे दुर्भिक्ष शहरात निर्माण झाले होते. यंदा मात्र पाऊस लांबला असला तरी वर्धा नदीत बल्लारपूर भागात भरपूर पाणी आहे. जीवन प्राधिकरणाला नदीवरुन भरपूर पाणी पुरवठा होत आहे. खरा संकटात सापडला आहे, तो शेतकरी! त्याची झोपच उडाली आहे.