शहरं
Join us  
Trending Stories
1
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
2
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
3
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
4
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
5
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
6
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
7
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
8
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
9
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
10
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
11
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
12
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
13
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
14
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
15
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका
16
भारतीय ग्रँडमास्टर्स समोर 'बुद्धी' चालेना! आर. प्रज्ञानंद याने वर्ल्ड नंबर वन कार्लसनला दिला शह
17
२ राजयोग करणार ९ राशींची भरघोस भरभराट, अडकलेली कामे होतील; हाती पैसा राहील, शुभ वरदान काळ!
18
चिनी विद्यार्थिनीला युक्रेनियन तरुणासोबत शारीरिक संबंध ठेवल्याची शिक्षा, विद्यापीठानं उचललं टोकाचं पाऊल
19
नॅशनल पार्कमधील ‘वनराणी’चे रुपडे पालटले; व्हिस्टाडोमसह नव्या अवतारात सेवेत, कधी सुरू होणार?
20
आरोपीच्या बोलावण्यावरून वारंवार हॉटेलमध्ये का गेलात? पती असताना परपुरुषाशी...! बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेला सुप्रीम कोर्टानं फटकारलं

नगरपालिका निर्मितीचा प्रश्न अनुत्तरितच

By admin | Updated: December 19, 2015 00:55 IST

शासनाच्या निकषापेक्षा अधिक लोकसंख्या, १५ वर्षापासूनची मागणी व ग्रामविकास मंत्रालयाकडून अधिसूचना जारी झाल्यानंतरही नगरपालिकेचा प्रश्न अधांतरीच दिसत आहे.

नागरिकांत संताप : आता पुन्हा करावा लागणार संघर्षघुग्घुस: शासनाच्या निकषापेक्षा अधिक लोकसंख्या, १५ वर्षापासूनची मागणी व ग्रामविकास मंत्रालयाकडून अधिसूचना जारी झाल्यानंतरही नगरपालिकेचा प्रश्न अधांतरीच दिसत आहे. सातत्याने मंत्रालयाच्या कक्ष अधिकाऱ्यांकडून जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद, स्थानिक ग्रामपंचायतीशी तातडीचे पत्रव्यवहार झाले आहेत. नगर परिषद निर्मितीसाठी रस्ता रोको आमरण उपोषण, व्यापारपेठ बंद व वीरुगिरीसारखे आंदोलनही झाले. तरीही घुग्घुस नगरपरिषद निर्मिती रखडलेलीच आहे. यामुळे आता संताप व्यक्त केला जात आहे.जिल्ह्यात विविध नगर परिषद, नगर पंचायती झाल्या. मात्र घुग्घुसबाबत गांभीर्याने विचार झाला न नाही. घुग्घुस हे औद्योगिक क्षेत्र आणि त्यापासून शासनाला कोट्यवधीचा महसूल प्राप्त होतो. गावाची लोकसंख्या ४० हजारापेक्षा अधिक आहे. भोगोलिकदृष्ट्या संपन्न असलेल्या गावाला नगर परिषदेचा दर्जा मिळावा, अशी मागणी १५ वर्षापासून करण्यात येत आहे. राज्यात युतीचे शासन असताना नगर विकास विभाग शासन निर्णय क्र. जी. इ. एन. १०९०/३२५५/सीआर- ५२/६०/ नवी १६ दि. १ जून १९९९ ला अधिसूचना जारी केली आणि नगरपालिका निर्मितीबाबत सातत्याने जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व ग्रामपंचायतशी पत्र व्यवहार सुरु आहे. घुग्घुस नगर परिषद निर्मितीकरिता घुग्घुस गावाची लोकसंख्या पुरेशी असताना त्याला नकोडा गाव जोडणे गरजेचे नाही. याच गावाला नाही तर कोणत्याही गावाला जोडण्याची गरज नाही, या बाबत अनेकदा आमसभेचे ठराव, मासिक सभेचे ठराव घेवून शासनाला पाठविण्यात आले. मात्र अजूनही नकोडा गावाचा उल्लेख निघता निघत नाही.१५ वर्षापासून ग्राम विकास व जल संधारण विभाग, नगरविकास मंत्रालय यांच्याकडून घुग्घुस नगर स्थापनेसंदर्भात वेळावेळी अनेक पत्रव्यवहार करुन माहिती मागविण्यात आली. २५ डिसेंबर २०१२ ला नगर विकास मंत्रालयाकडून जिल्हाधिकारी यांना तात्काळ फॅक्स संदेश पाठवून प्रस्तावित ग्रामपंचायतीचा चालू कार्यकाल, औद्योगिक क्षेत्राबाबत चातुर्शिमा दर्शविणारा नकाशा, ग्रामपंचायतीच्या कर्मचारीवर्गाबाबत २०११ च्या जनगणनेनुसार लोकसंख्या, अकृषिक रोजगाराची टक्केवारी या बरोबरच अन्य आवश्यक माहिती मागितली. त्याप्रमाणे संबंधित अधिकाऱ्यांना आदेश देऊन २७ जानेवारी १२ पर्यंत माहिती पुरविण्याचे निर्देश दिले आणि ती माहिती शासनाला पाठविण्यात आली. त्यावेळी नगरवासियांना नगर परिषद निर्मिती घोषणा होईल, याची आशा होती. मात्र माशी कुठे शिंकली व परत मंत्रालयाकडून मुख्य कार्यकारी अधिकारी यांना प्रपत्र पाठवून माहिती मागितली. मात्र जिल्हा परिषदेने चुकीची माहिती पाठविली आणि तो प्रस्ताव तसाच राहिला. शासनाकडून घूमजावघुग्घूस गावाची लोकसंख्या १५ वर्षापूर्वीच घुग्घुस नगर परिषदेच्या निर्मितीसाठी पुरेशी होती. या नगर परिषद स्थापनेकरिता कोणत्याही गावाची गरज नसताना शासनाने मे २०१५ ला या क्षेत्रातील नकोडा, उसेगाव, म्हातारदेवी, शेणगाव ग्रामपंचायतीला पत्र पाठवून नगर परिषद निर्मितीसंदर्भात ना हरकत प्रमाणपत्र मागविले. हा एक नवीन उपक्रम शासनाकडून जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून केला आहे.मागील वर्षी शासनाकडून वारंवार पत्रव्यवहार होत असले तरी नगरपरिषद निर्मिती होत नसल्याने घुग्घुस नगर परिषद स्थापना संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली. त्या समितीच्या वतीने घुग्घुसमध्ये रस्ता रोको, घुग्घुस बंद, आमरण उपोषण, टॉवरवर चढून वीरुगिरीसारखे आंदोलन छेडले. मात्र या आंदोलनाकडे या क्षेत्राच्या कोणत्याही लोकप्रतिनिधीने ढुंकून पाहिले नाही. ज्या दिवशी विरुगिरी आंदोलन झाले. त्या दिवशी पूरक साडेपाच कोटीच्या नळ योजनेचा भूमिपूजन सोहळा होता, त्या सोहळ्यासाठी आ. नाना श्यामकुळे, तत्कालीन आमदार व वर्तमान वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय मंत्री हंसराज अहीर घुग्घुसमध्ये उपस्थित होते. त्यात आंदोलन व नगर परिषदेचा विषयावर कोणीही वाच्यता केली नसून घुग्घुस शहर आदर्श गाव बनविण्याची घोषणा केली. घुग्घुस नगरपरिषद निर्मितीकरिता झालेल्या आंदोलनाची दखल मात्र जिल्हाधिकारी यांनी घेतली आणि ३० आॅगस्टला घुग्घुस नगर परिषद स्थापना संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेवून त्यांच्या भावना जाणून घेतल्या होत्या. (वार्ताहर)