शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
3
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
4
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
5
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
6
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
7
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
8
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
9
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
10
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
11
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
12
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
13
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
14
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
15
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
16
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
17
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
18
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
19
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
20
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?

नगरपालिका निर्मितीचा प्रश्न अनुत्तरितच

By admin | Updated: December 19, 2015 00:55 IST

शासनाच्या निकषापेक्षा अधिक लोकसंख्या, १५ वर्षापासूनची मागणी व ग्रामविकास मंत्रालयाकडून अधिसूचना जारी झाल्यानंतरही नगरपालिकेचा प्रश्न अधांतरीच दिसत आहे.

नागरिकांत संताप : आता पुन्हा करावा लागणार संघर्षघुग्घुस: शासनाच्या निकषापेक्षा अधिक लोकसंख्या, १५ वर्षापासूनची मागणी व ग्रामविकास मंत्रालयाकडून अधिसूचना जारी झाल्यानंतरही नगरपालिकेचा प्रश्न अधांतरीच दिसत आहे. सातत्याने मंत्रालयाच्या कक्ष अधिकाऱ्यांकडून जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद, स्थानिक ग्रामपंचायतीशी तातडीचे पत्रव्यवहार झाले आहेत. नगर परिषद निर्मितीसाठी रस्ता रोको आमरण उपोषण, व्यापारपेठ बंद व वीरुगिरीसारखे आंदोलनही झाले. तरीही घुग्घुस नगरपरिषद निर्मिती रखडलेलीच आहे. यामुळे आता संताप व्यक्त केला जात आहे.जिल्ह्यात विविध नगर परिषद, नगर पंचायती झाल्या. मात्र घुग्घुसबाबत गांभीर्याने विचार झाला न नाही. घुग्घुस हे औद्योगिक क्षेत्र आणि त्यापासून शासनाला कोट्यवधीचा महसूल प्राप्त होतो. गावाची लोकसंख्या ४० हजारापेक्षा अधिक आहे. भोगोलिकदृष्ट्या संपन्न असलेल्या गावाला नगर परिषदेचा दर्जा मिळावा, अशी मागणी १५ वर्षापासून करण्यात येत आहे. राज्यात युतीचे शासन असताना नगर विकास विभाग शासन निर्णय क्र. जी. इ. एन. १०९०/३२५५/सीआर- ५२/६०/ नवी १६ दि. १ जून १९९९ ला अधिसूचना जारी केली आणि नगरपालिका निर्मितीबाबत सातत्याने जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व ग्रामपंचायतशी पत्र व्यवहार सुरु आहे. घुग्घुस नगर परिषद निर्मितीकरिता घुग्घुस गावाची लोकसंख्या पुरेशी असताना त्याला नकोडा गाव जोडणे गरजेचे नाही. याच गावाला नाही तर कोणत्याही गावाला जोडण्याची गरज नाही, या बाबत अनेकदा आमसभेचे ठराव, मासिक सभेचे ठराव घेवून शासनाला पाठविण्यात आले. मात्र अजूनही नकोडा गावाचा उल्लेख निघता निघत नाही.१५ वर्षापासून ग्राम विकास व जल संधारण विभाग, नगरविकास मंत्रालय यांच्याकडून घुग्घुस नगर स्थापनेसंदर्भात वेळावेळी अनेक पत्रव्यवहार करुन माहिती मागविण्यात आली. २५ डिसेंबर २०१२ ला नगर विकास मंत्रालयाकडून जिल्हाधिकारी यांना तात्काळ फॅक्स संदेश पाठवून प्रस्तावित ग्रामपंचायतीचा चालू कार्यकाल, औद्योगिक क्षेत्राबाबत चातुर्शिमा दर्शविणारा नकाशा, ग्रामपंचायतीच्या कर्मचारीवर्गाबाबत २०११ च्या जनगणनेनुसार लोकसंख्या, अकृषिक रोजगाराची टक्केवारी या बरोबरच अन्य आवश्यक माहिती मागितली. त्याप्रमाणे संबंधित अधिकाऱ्यांना आदेश देऊन २७ जानेवारी १२ पर्यंत माहिती पुरविण्याचे निर्देश दिले आणि ती माहिती शासनाला पाठविण्यात आली. त्यावेळी नगरवासियांना नगर परिषद निर्मिती घोषणा होईल, याची आशा होती. मात्र माशी कुठे शिंकली व परत मंत्रालयाकडून मुख्य कार्यकारी अधिकारी यांना प्रपत्र पाठवून माहिती मागितली. मात्र जिल्हा परिषदेने चुकीची माहिती पाठविली आणि तो प्रस्ताव तसाच राहिला. शासनाकडून घूमजावघुग्घूस गावाची लोकसंख्या १५ वर्षापूर्वीच घुग्घुस नगर परिषदेच्या निर्मितीसाठी पुरेशी होती. या नगर परिषद स्थापनेकरिता कोणत्याही गावाची गरज नसताना शासनाने मे २०१५ ला या क्षेत्रातील नकोडा, उसेगाव, म्हातारदेवी, शेणगाव ग्रामपंचायतीला पत्र पाठवून नगर परिषद निर्मितीसंदर्भात ना हरकत प्रमाणपत्र मागविले. हा एक नवीन उपक्रम शासनाकडून जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून केला आहे.मागील वर्षी शासनाकडून वारंवार पत्रव्यवहार होत असले तरी नगरपरिषद निर्मिती होत नसल्याने घुग्घुस नगर परिषद स्थापना संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली. त्या समितीच्या वतीने घुग्घुसमध्ये रस्ता रोको, घुग्घुस बंद, आमरण उपोषण, टॉवरवर चढून वीरुगिरीसारखे आंदोलन छेडले. मात्र या आंदोलनाकडे या क्षेत्राच्या कोणत्याही लोकप्रतिनिधीने ढुंकून पाहिले नाही. ज्या दिवशी विरुगिरी आंदोलन झाले. त्या दिवशी पूरक साडेपाच कोटीच्या नळ योजनेचा भूमिपूजन सोहळा होता, त्या सोहळ्यासाठी आ. नाना श्यामकुळे, तत्कालीन आमदार व वर्तमान वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय मंत्री हंसराज अहीर घुग्घुसमध्ये उपस्थित होते. त्यात आंदोलन व नगर परिषदेचा विषयावर कोणीही वाच्यता केली नसून घुग्घुस शहर आदर्श गाव बनविण्याची घोषणा केली. घुग्घुस नगरपरिषद निर्मितीकरिता झालेल्या आंदोलनाची दखल मात्र जिल्हाधिकारी यांनी घेतली आणि ३० आॅगस्टला घुग्घुस नगर परिषद स्थापना संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेवून त्यांच्या भावना जाणून घेतल्या होत्या. (वार्ताहर)