शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
2
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! वेटिंग-RAC तिकिटाची स्थिती आता १० तास आधी कळणार
3
कर्जदारांना 'अच्छे दिन'! भारतीय अर्थव्यवस्था 'गोल्डीलॉक्स' स्थितीत; गव्हर्नर मल्होत्रा म्हणाले...
4
काँग्रेसची कार्यकर्ती, वरपर्यंत ओळख असल्याचं सांगून आणायची प्रेमासाठी दबाव, त्रस्त पोलीस इन्स्पेक्टरची महिलेविरोधात तक्रार
5
मुंबई इंडियन्सची 'ती गोष्ट 'जितेंद्र भाटवडेकर'च्या मनाला लागली? रोहितसोबतचा फोटो शेअर करत म्हणाला...
6
‘टॅरिफला आता हत्यार बनवले जातेय’, निर्मला सीतारमण यांनी सांगितला 'ट्रम्प टॅरिफ'मागील खेळ...
7
वंदे भारत की राजधानी, कोणत्या ट्रेनच्या लोको पायलटला सर्वाधिक पगार मिळतो? आकडा पाहून व्हाल थक्क
8
ICICI Prudential AMC IPO Allotment: कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस? जीएमपीमध्येही जोरदार तेजी
9
गणवेशावरून चिडवलं, घरी येताच चौथीत शिकणाऱ्या प्रशांतने...; आईवडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली
10
“काँग्रेसचे पाक प्रेम उतू चाललेय, ऑपरेशन सिंदूरचा हिशोब विचारणारे देशद्रोही”: एकनाथ शिंदे
11
Meesho च्या शेअरला अपर सर्किट; इश्यू प्राईजच्या दुप्पट झाली किंमत, सह-संस्थापक बनले अब्जाधीश
12
ढाका येथील भारतीय उच्चायुक्तालयाला धमकी, सरकारने बांगलादेशी अधिकाऱ्याला समन्स बजावले
13
विराट-अनुष्काने घेतली प्रेमानंद महाराजांकडून दीक्षा, गळ्यात तुळशी माळ; जाणून घ्या त्याचे महत्व
14
Payal Gaming: कोण आहे पायल गेमिंग? १.२० मिनटांचा MMS लीक झाल्यानंतर आली चर्चेत!
15
Video: BJP आमदाराच्या मुलाचा शाही विवाह सोहळा; तब्बल ७० लाखांच्या फटाक्यांची केली आतषबाजी
16
ओला-उबरला टक्कर! १ जानेवारीपासून 'भारत टॅक्सी' ॲप होणार लाँच; प्रवाशांना स्वस्त प्रवास आणि ड्रायव्हर्सची होणार जास्त कमाई
17
लग्नानंतर एका वर्षात शोभिता धुलिपाला देणार गुडन्यूज? सासरे नागार्जुन म्हणाले, "योग्य वेळ..."
18
भारतीय बाजारात उद्याच स्वस्तातली सात सीटर कार लाँच होणार; अर्टिगा, ट्रायबरला मिळणार टक्कर...
19
स्वस्त 'पर्सनल लोन'च्या शोधात आहात? 'या' ५ बँकांमध्ये मिळतोय सर्वात कमी व्याजदर; १२ लाखांचा EMI किती?
20
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

प्रदूषणाने शहरातील नागरिक झाले बेजार

By admin | Updated: October 21, 2014 22:48 IST

विविध उद्योगांकडून केले जाणारे प्रदूषण, महाऔष्णिक वीज केंद्रातील धुरांड्यातून ओकला जाणारा विषारी धूर, तसेच रस्त्यांवरील धुळीमुळे नागरिकांना विविध आजारांचा सामना करावा लागत आहे.

चंद्रपूर: विविध उद्योगांकडून केले जाणारे प्रदूषण, महाऔष्णिक वीज केंद्रातील धुरांड्यातून ओकला जाणारा विषारी धूर, तसेच रस्त्यांवरील धुळीमुळे नागरिकांना विविध आजारांचा सामना करावा लागत आहे. धूळ प्रदूषणाने सामान्य नागरिक सध्या प्रचंड बेजार झाले आहेत. धुळीच्या प्रदूषणावर नियंत्रण आणून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी सामाजिक संस्थांनी केली आहे. देशात व राज्यात सर्वाधिक प्रदूषित शहर म्हणून चंद्रपूरची ओळख आहे. देशातील प्रदूषित शहरांमध्ये चंद्रपूरचा समावेश झाल्यानंतर प्रदूषण नियंत्रणासाठी दोन वेळा कृती आराखडा तयार करण्यात आला. मात्र कृती आराखडा कागदावरच जिरला. या कृती आराखड्याची अंमलबजावणी करण्यासाठी उद्योगांसोबतच स्थानिक स्वराज्य संस्था व अन्य संबंधित शासकीय कार्यालयांवर जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्या प्रामुख्याने चंद्रपूर महानगर पालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाचाही समावेश आहे. शहरातील प्रदूषणात रस्त्यावरील धुळीने भर घातली आहे. शहरातील अंतर्गत रस्ते व बाहेरील रस्त्यावरील धूळ स्वच्छ करण्यात येत नसल्याने वाहनांच्या सततच्या वर्दळीमुळे ही धूळ रस्त्यावर उडत आहे. त्यामुळे शहरात धुळीचे प्रदूषण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. त्यातच शहरातील रस्त्यांवर वारंवार खोदकाम केले जात असल्याने ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. ते बुजविण्यासाठी मुरूमाचा वापर केला जात आहे. त्यामुळे धुळीच्या प्रदूषणात आणखी वाढ होत आहे. परिणामी या मार्गावरून प्रवास करणारे सामान्य नागरिक, फेरीवाले, रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या व्यावसायिकांना धूळ प्रदूषणाचा सामना करावा लागत आहे. रस्त्यावरील धुळीचे नियंत्रण करण्याची मागणी करण्यात येत असली तरी याकडे दुर्लक्ष केल्या जात आहे.(नगर प्रतिनिधी)