शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
7
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
8
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
9
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
10
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
11
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
12
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
13
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
14
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
15
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
16
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
17
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
18
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
19
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
20
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!

प्रदूषणाने शहरातील नागरिक झाले बेजार

By admin | Updated: October 21, 2014 22:48 IST

विविध उद्योगांकडून केले जाणारे प्रदूषण, महाऔष्णिक वीज केंद्रातील धुरांड्यातून ओकला जाणारा विषारी धूर, तसेच रस्त्यांवरील धुळीमुळे नागरिकांना विविध आजारांचा सामना करावा लागत आहे.

चंद्रपूर: विविध उद्योगांकडून केले जाणारे प्रदूषण, महाऔष्णिक वीज केंद्रातील धुरांड्यातून ओकला जाणारा विषारी धूर, तसेच रस्त्यांवरील धुळीमुळे नागरिकांना विविध आजारांचा सामना करावा लागत आहे. धूळ प्रदूषणाने सामान्य नागरिक सध्या प्रचंड बेजार झाले आहेत. धुळीच्या प्रदूषणावर नियंत्रण आणून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी सामाजिक संस्थांनी केली आहे. देशात व राज्यात सर्वाधिक प्रदूषित शहर म्हणून चंद्रपूरची ओळख आहे. देशातील प्रदूषित शहरांमध्ये चंद्रपूरचा समावेश झाल्यानंतर प्रदूषण नियंत्रणासाठी दोन वेळा कृती आराखडा तयार करण्यात आला. मात्र कृती आराखडा कागदावरच जिरला. या कृती आराखड्याची अंमलबजावणी करण्यासाठी उद्योगांसोबतच स्थानिक स्वराज्य संस्था व अन्य संबंधित शासकीय कार्यालयांवर जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्या प्रामुख्याने चंद्रपूर महानगर पालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाचाही समावेश आहे. शहरातील प्रदूषणात रस्त्यावरील धुळीने भर घातली आहे. शहरातील अंतर्गत रस्ते व बाहेरील रस्त्यावरील धूळ स्वच्छ करण्यात येत नसल्याने वाहनांच्या सततच्या वर्दळीमुळे ही धूळ रस्त्यावर उडत आहे. त्यामुळे शहरात धुळीचे प्रदूषण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. त्यातच शहरातील रस्त्यांवर वारंवार खोदकाम केले जात असल्याने ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. ते बुजविण्यासाठी मुरूमाचा वापर केला जात आहे. त्यामुळे धुळीच्या प्रदूषणात आणखी वाढ होत आहे. परिणामी या मार्गावरून प्रवास करणारे सामान्य नागरिक, फेरीवाले, रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या व्यावसायिकांना धूळ प्रदूषणाचा सामना करावा लागत आहे. रस्त्यावरील धुळीचे नियंत्रण करण्याची मागणी करण्यात येत असली तरी याकडे दुर्लक्ष केल्या जात आहे.(नगर प्रतिनिधी)