शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

प्रदूषणाने शहरातील नागरिक झाले बेजार

By admin | Updated: October 21, 2014 22:48 IST

विविध उद्योगांकडून केले जाणारे प्रदूषण, महाऔष्णिक वीज केंद्रातील धुरांड्यातून ओकला जाणारा विषारी धूर, तसेच रस्त्यांवरील धुळीमुळे नागरिकांना विविध आजारांचा सामना करावा लागत आहे.

चंद्रपूर: विविध उद्योगांकडून केले जाणारे प्रदूषण, महाऔष्णिक वीज केंद्रातील धुरांड्यातून ओकला जाणारा विषारी धूर, तसेच रस्त्यांवरील धुळीमुळे नागरिकांना विविध आजारांचा सामना करावा लागत आहे. धूळ प्रदूषणाने सामान्य नागरिक सध्या प्रचंड बेजार झाले आहेत. धुळीच्या प्रदूषणावर नियंत्रण आणून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी सामाजिक संस्थांनी केली आहे. देशात व राज्यात सर्वाधिक प्रदूषित शहर म्हणून चंद्रपूरची ओळख आहे. देशातील प्रदूषित शहरांमध्ये चंद्रपूरचा समावेश झाल्यानंतर प्रदूषण नियंत्रणासाठी दोन वेळा कृती आराखडा तयार करण्यात आला. मात्र कृती आराखडा कागदावरच जिरला. या कृती आराखड्याची अंमलबजावणी करण्यासाठी उद्योगांसोबतच स्थानिक स्वराज्य संस्था व अन्य संबंधित शासकीय कार्यालयांवर जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्या प्रामुख्याने चंद्रपूर महानगर पालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाचाही समावेश आहे. शहरातील प्रदूषणात रस्त्यावरील धुळीने भर घातली आहे. शहरातील अंतर्गत रस्ते व बाहेरील रस्त्यावरील धूळ स्वच्छ करण्यात येत नसल्याने वाहनांच्या सततच्या वर्दळीमुळे ही धूळ रस्त्यावर उडत आहे. त्यामुळे शहरात धुळीचे प्रदूषण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. त्यातच शहरातील रस्त्यांवर वारंवार खोदकाम केले जात असल्याने ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. ते बुजविण्यासाठी मुरूमाचा वापर केला जात आहे. त्यामुळे धुळीच्या प्रदूषणात आणखी वाढ होत आहे. परिणामी या मार्गावरून प्रवास करणारे सामान्य नागरिक, फेरीवाले, रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या व्यावसायिकांना धूळ प्रदूषणाचा सामना करावा लागत आहे. रस्त्यावरील धुळीचे नियंत्रण करण्याची मागणी करण्यात येत असली तरी याकडे दुर्लक्ष केल्या जात आहे.(नगर प्रतिनिधी)