शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

ओबीसींचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटणार

By admin | Updated: June 29, 2014 23:50 IST

चंद्रपूर आणि गडचिरोली या नक्षलग्रस्त जिल्ह्यातील ओबिसींच्या जिल्हानिहाय आरक्षणामध्ये ओबीसींवर अन्याय झाला आहे. हा अन्याय दूर करुन दोन्ही जिल्ह्यातील ओबीसी प्रवर्गातील जिल्हानिहाय आरक्षणात

चंद्रपूर : चंद्रपूर आणि गडचिरोली या नक्षलग्रस्त जिल्ह्यातील ओबिसींच्या जिल्हानिहाय आरक्षणामध्ये ओबीसींवर अन्याय झाला आहे. हा अन्याय दूर करुन दोन्ही जिल्ह्यातील ओबीसी प्रवर्गातील जिल्हानिहाय आरक्षणात वाढ करावी किंवा पूर्ववत आरक्षण ठेवावे, या मागणीसाठी दोन्ही जिल्ह्यातील ओबीसींचे शिष्टमंडळ आमदार विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्त्वात मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे. मागणी पुर्ण न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा वडेट्टीवार यांनी दिला आहे.काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस लोकशाही आघाडी सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुस्लिमांना ५ टक्के आणि मराठ्यांना १६ टक्के आरक्षण देवून ५२ टक्के आरक्षणावरुन ७३ टक्के आरक्षण करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला. हा निर्णय योग्य असून आता ओबीसींच्या जिल्हानिहाय आरक्षणातही वाढ करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यासाठी ओबीसींच्या सर्व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी १ जुलै रोजी मनोरा आमदार निवास मुंबई येथे सकाळी ११ वाजता एकत्रित यावे, अशी विनंती माजी राज्यमंत्री तथा आमदार विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात ओबीसींची संख्या ५५ टक्के असून नोकरीमध्ये पूर्वी १९ टक्के जिल्हानिहाय आरक्षण होते. परंतु यात मागील काही वर्षात बदल करून ११ टक्के आरक्षण करण्यात आले. तसेच गडचिरोली जिल्ह्यात ओबीसींची संख्या ३८ टक्के असून नोकरीमध्ये पूर्वी १९ टक्के जिल्हा निहाय आरक्षण होते. परंतु आता १९ टक्क्यांवरुन कमी करत पाच टक्के जिल्हानिहाय आरक्षण करण्यात आले आहे.विशेष म्हणजे, हे दोन्ही जिल्हे नक्षलग्रस्त आहेत. ओबिसीमधील बेरोजगार युवकांना पूर्वी दोन्ही जिल्ह्यात ओबीसी आरक्षणाद्वारे नोकरी मिळत होती. परंतु जिल्हा निहाय आरक्षणामध्ये ओबीसींचे आरक्षण कमी केल्याने ओबीसी प्रवर्गातील बेरोजगार युवकांना हक्काच्या नोकरीपासून वंचित राहावे लागत आहे. याप्रकारामुळे चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसी बांधवाची गळचेपी होत आहे. ज्याप्रमाणे मुस्लिम आणि मराठ्यांना आरक्षण दिले त्यापमाणे चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसींच्या जिल्हा निहाय आरक्षणात वाढ करण्याची मागणी करण्यात आली आहे. (नगर प्रतिनिधी).